शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दुष्काळाचे चित्र गंभीर; ८.३२ लाख जनावरे चारा छावण्यांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 03:31 IST

४ हजार ७७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील आकडेवारी

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असून तब्बल ८ लाख ३२ हजार जनावरे १ हजार २६४ चारा छावण्यांमध्ये दाखल झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचे संकट गहिरे बनले असून आताच ४ हजार ७७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि त्यानंतर दुष्काळ निवारणासंदर्भात असलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दुष्काळाची दाहकता अधोरेखित करणारी आकडेवारी गुरुवारी मांडण्यात आली. राज्यातील ३ हजार ६९९ गावे आणि ८ हजार ४१७ वाड्यांवर सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी ९३७ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. यंदा त्यात आतापर्यंत ३ हजार ८३७ टँकरची वाढ झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ४७१ छावण्या सुरू आहेत. पुणे विभागात सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात १११, औरंगाबाद विभागात औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात ६८२ छावण्या सुरू आहेत. चारा छावण्यांमधील मोठ्या जनावरांसाठी ९० रुपये तर छोट्या जनावरांसाठी प्रत्येकी ४५ रुपये अनुदान दिले जात आहे. वीज थकबाकी न भरल्याने बंद करण्यात आलेल्या ३ हजार ३२० पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट देण्यात आली. ही सवलत एकूण ६७३ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात ३४ हजार ४३१ कामे सुरू आहेत. त्यावर २ लाख ७४ हजार मजूर काम करीत आहेत.विम्याची रक्कम आठ दिवसांतराज्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेचे वाटप येत्या आठ दिवसात सुरू करण्यात येईल. त्या पोटी ३ हजार २०० कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांना मदतीसाठी केंद्र सरकारने ४ हजार ५६२ कोटी रुपयांची मदत राज्याला दिली आहे. राज्यातील ६७ लाख ३० हजार ८६५ शेतकºयांना आतापर्यंत ४ हजार ४१२ कोटी रुपये मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdroughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस