शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

राज्यातील दुष्काळाचे चित्र गंभीर; ८.३२ लाख जनावरे चारा छावण्यांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 03:31 IST

४ हजार ७७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील आकडेवारी

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असून तब्बल ८ लाख ३२ हजार जनावरे १ हजार २६४ चारा छावण्यांमध्ये दाखल झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचे संकट गहिरे बनले असून आताच ४ हजार ७७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि त्यानंतर दुष्काळ निवारणासंदर्भात असलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दुष्काळाची दाहकता अधोरेखित करणारी आकडेवारी गुरुवारी मांडण्यात आली. राज्यातील ३ हजार ६९९ गावे आणि ८ हजार ४१७ वाड्यांवर सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी ९३७ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. यंदा त्यात आतापर्यंत ३ हजार ८३७ टँकरची वाढ झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ४७१ छावण्या सुरू आहेत. पुणे विभागात सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात १११, औरंगाबाद विभागात औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात ६८२ छावण्या सुरू आहेत. चारा छावण्यांमधील मोठ्या जनावरांसाठी ९० रुपये तर छोट्या जनावरांसाठी प्रत्येकी ४५ रुपये अनुदान दिले जात आहे. वीज थकबाकी न भरल्याने बंद करण्यात आलेल्या ३ हजार ३२० पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट देण्यात आली. ही सवलत एकूण ६७३ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात ३४ हजार ४३१ कामे सुरू आहेत. त्यावर २ लाख ७४ हजार मजूर काम करीत आहेत.विम्याची रक्कम आठ दिवसांतराज्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेचे वाटप येत्या आठ दिवसात सुरू करण्यात येईल. त्या पोटी ३ हजार २०० कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांना मदतीसाठी केंद्र सरकारने ४ हजार ५६२ कोटी रुपयांची मदत राज्याला दिली आहे. राज्यातील ६७ लाख ३० हजार ८६५ शेतकºयांना आतापर्यंत ४ हजार ४१२ कोटी रुपये मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdroughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस