शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

राज्यातील दुष्काळाचे चित्र गंभीर; ८.३२ लाख जनावरे चारा छावण्यांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 03:31 IST

४ हजार ७७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील आकडेवारी

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असून तब्बल ८ लाख ३२ हजार जनावरे १ हजार २६४ चारा छावण्यांमध्ये दाखल झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचे संकट गहिरे बनले असून आताच ४ हजार ७७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि त्यानंतर दुष्काळ निवारणासंदर्भात असलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दुष्काळाची दाहकता अधोरेखित करणारी आकडेवारी गुरुवारी मांडण्यात आली. राज्यातील ३ हजार ६९९ गावे आणि ८ हजार ४१७ वाड्यांवर सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी ९३७ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. यंदा त्यात आतापर्यंत ३ हजार ८३७ टँकरची वाढ झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ४७१ छावण्या सुरू आहेत. पुणे विभागात सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात १११, औरंगाबाद विभागात औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात ६८२ छावण्या सुरू आहेत. चारा छावण्यांमधील मोठ्या जनावरांसाठी ९० रुपये तर छोट्या जनावरांसाठी प्रत्येकी ४५ रुपये अनुदान दिले जात आहे. वीज थकबाकी न भरल्याने बंद करण्यात आलेल्या ३ हजार ३२० पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट देण्यात आली. ही सवलत एकूण ६७३ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात ३४ हजार ४३१ कामे सुरू आहेत. त्यावर २ लाख ७४ हजार मजूर काम करीत आहेत.विम्याची रक्कम आठ दिवसांतराज्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेचे वाटप येत्या आठ दिवसात सुरू करण्यात येईल. त्या पोटी ३ हजार २०० कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांना मदतीसाठी केंद्र सरकारने ४ हजार ५६२ कोटी रुपयांची मदत राज्याला दिली आहे. राज्यातील ६७ लाख ३० हजार ८६५ शेतकºयांना आतापर्यंत ४ हजार ४१२ कोटी रुपये मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdroughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस