शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

आठ वर्षांत चार वेळा दुष्काळ!, निम्मे राज्य कोरडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 06:24 IST

मागील आठ वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याच्या आकडेवारीवरून चार वर्षे दुष्काळाची असल्याचे स्पष्ट होत आहे. निम्मा महाराष्ट्र कायमच दुष्काळाच्या छायेत असल्याचे आकडेवारी सांगते.

- विशाल शिर्केपुणे : मागील आठ वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याच्या आकडेवारीवरून चार वर्षे दुष्काळाची असल्याचे स्पष्ट होत आहे. निम्मा महाराष्ट्र कायमच दुष्काळाच्या छायेत असल्याचे आकडेवारी सांगते. त्यातही मराठवाड्याकडे पाऊस सातत्याने पाठ फिरवत असून कोकण, पुणे आणि नाशिकचा भाग वगळता उर्वरीत राज्यात पाणीसाठा जेमतेमच असल्याचे चित्र आहे.जून ते सप्टेंबर या काळात राज्यात मान्सूनचा पाऊस पडतो. आॅक्टोबरमध्ये परतीचा पाऊस पडतो. क्वचित नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस होतो. सप्टेंबरअखेरीस पडलेल्या पावसाच्या आधारे वर्षभराचे पिण्याचे, शेती आणि उद्योगाच्या पाण्याचे नियोजन केले जाते. राज्यात जून ते ३१ आॅक्टोबर अखेरीस सरासरी १ हजार १९८ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत या वर्षी अवघ्या ८८१.७ (७३.६%) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये आॅगस्टच्या मध्यानंतर पाऊसच झालेला नाही, तर काही तालुक्यांमध्ये सप्टेंबर महिना पूर्ण कोरडा गेला.गेल्या आठ वर्षांचे नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याचे चित्र पाहिल्यास कमी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यातच जेमतेम साठा दिसत आहे. मराठवाडा, नागपूर आणि अमरावती विभागात नोव्हेंबर महिन्यात एकूण क्षमतेच्या ६० ते ७० टक्केच पाणीसाठा दिसून येत आहे. मराठवाड्यात २०११ मध्ये सर्वाधिक ८८ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर चार वर्षे दुष्काळाची आणि दोन वर्षे जेमतेम पाण्याची गेली.नागपूर विभागात आठ पैकी ३ वर्षे ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा होता. तर चार वर्षे ५८ ते ६५ टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागात ४० ते ७६ टक्के पाणीसाठा होता. नाशिक, पुणे आणि कोकण या प्रदेशात तुलनेने पाण्याचा सुकाळ दिसून येत आहे. राज्याचे एकूण चित्र पाहिल्यास ८ पैकी चार वर्षे निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असल्याचे आकडेवारी सांगते. तर २०१५ मध्ये आठ वर्षांतील दुष्काळाची तीव्रता अधिक नोंदविण्यात आली.मराठवाड्यावर संकटमराठवाड्यात नोव्हेंबर २०१५ मध्ये तर अवघा १४ टक्केच पाणीसाठा होता. त्यावेळी लातुरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ राज्य सरकारवर आली होती. 

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र