शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

आठ वर्षांत चार वेळा दुष्काळ!, निम्मे राज्य कोरडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 06:24 IST

मागील आठ वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याच्या आकडेवारीवरून चार वर्षे दुष्काळाची असल्याचे स्पष्ट होत आहे. निम्मा महाराष्ट्र कायमच दुष्काळाच्या छायेत असल्याचे आकडेवारी सांगते.

- विशाल शिर्केपुणे : मागील आठ वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याच्या आकडेवारीवरून चार वर्षे दुष्काळाची असल्याचे स्पष्ट होत आहे. निम्मा महाराष्ट्र कायमच दुष्काळाच्या छायेत असल्याचे आकडेवारी सांगते. त्यातही मराठवाड्याकडे पाऊस सातत्याने पाठ फिरवत असून कोकण, पुणे आणि नाशिकचा भाग वगळता उर्वरीत राज्यात पाणीसाठा जेमतेमच असल्याचे चित्र आहे.जून ते सप्टेंबर या काळात राज्यात मान्सूनचा पाऊस पडतो. आॅक्टोबरमध्ये परतीचा पाऊस पडतो. क्वचित नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस होतो. सप्टेंबरअखेरीस पडलेल्या पावसाच्या आधारे वर्षभराचे पिण्याचे, शेती आणि उद्योगाच्या पाण्याचे नियोजन केले जाते. राज्यात जून ते ३१ आॅक्टोबर अखेरीस सरासरी १ हजार १९८ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत या वर्षी अवघ्या ८८१.७ (७३.६%) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये आॅगस्टच्या मध्यानंतर पाऊसच झालेला नाही, तर काही तालुक्यांमध्ये सप्टेंबर महिना पूर्ण कोरडा गेला.गेल्या आठ वर्षांचे नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याचे चित्र पाहिल्यास कमी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यातच जेमतेम साठा दिसत आहे. मराठवाडा, नागपूर आणि अमरावती विभागात नोव्हेंबर महिन्यात एकूण क्षमतेच्या ६० ते ७० टक्केच पाणीसाठा दिसून येत आहे. मराठवाड्यात २०११ मध्ये सर्वाधिक ८८ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर चार वर्षे दुष्काळाची आणि दोन वर्षे जेमतेम पाण्याची गेली.नागपूर विभागात आठ पैकी ३ वर्षे ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा होता. तर चार वर्षे ५८ ते ६५ टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागात ४० ते ७६ टक्के पाणीसाठा होता. नाशिक, पुणे आणि कोकण या प्रदेशात तुलनेने पाण्याचा सुकाळ दिसून येत आहे. राज्याचे एकूण चित्र पाहिल्यास ८ पैकी चार वर्षे निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असल्याचे आकडेवारी सांगते. तर २०१५ मध्ये आठ वर्षांतील दुष्काळाची तीव्रता अधिक नोंदविण्यात आली.मराठवाड्यावर संकटमराठवाड्यात नोव्हेंबर २०१५ मध्ये तर अवघा १४ टक्केच पाणीसाठा होता. त्यावेळी लातुरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ राज्य सरकारवर आली होती. 

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र