शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

आठ वर्षांत चार वेळा दुष्काळ!, निम्मे राज्य कोरडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 06:24 IST

मागील आठ वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याच्या आकडेवारीवरून चार वर्षे दुष्काळाची असल्याचे स्पष्ट होत आहे. निम्मा महाराष्ट्र कायमच दुष्काळाच्या छायेत असल्याचे आकडेवारी सांगते.

- विशाल शिर्केपुणे : मागील आठ वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याच्या आकडेवारीवरून चार वर्षे दुष्काळाची असल्याचे स्पष्ट होत आहे. निम्मा महाराष्ट्र कायमच दुष्काळाच्या छायेत असल्याचे आकडेवारी सांगते. त्यातही मराठवाड्याकडे पाऊस सातत्याने पाठ फिरवत असून कोकण, पुणे आणि नाशिकचा भाग वगळता उर्वरीत राज्यात पाणीसाठा जेमतेमच असल्याचे चित्र आहे.जून ते सप्टेंबर या काळात राज्यात मान्सूनचा पाऊस पडतो. आॅक्टोबरमध्ये परतीचा पाऊस पडतो. क्वचित नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस होतो. सप्टेंबरअखेरीस पडलेल्या पावसाच्या आधारे वर्षभराचे पिण्याचे, शेती आणि उद्योगाच्या पाण्याचे नियोजन केले जाते. राज्यात जून ते ३१ आॅक्टोबर अखेरीस सरासरी १ हजार १९८ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत या वर्षी अवघ्या ८८१.७ (७३.६%) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये आॅगस्टच्या मध्यानंतर पाऊसच झालेला नाही, तर काही तालुक्यांमध्ये सप्टेंबर महिना पूर्ण कोरडा गेला.गेल्या आठ वर्षांचे नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याचे चित्र पाहिल्यास कमी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यातच जेमतेम साठा दिसत आहे. मराठवाडा, नागपूर आणि अमरावती विभागात नोव्हेंबर महिन्यात एकूण क्षमतेच्या ६० ते ७० टक्केच पाणीसाठा दिसून येत आहे. मराठवाड्यात २०११ मध्ये सर्वाधिक ८८ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर चार वर्षे दुष्काळाची आणि दोन वर्षे जेमतेम पाण्याची गेली.नागपूर विभागात आठ पैकी ३ वर्षे ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा होता. तर चार वर्षे ५८ ते ६५ टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागात ४० ते ७६ टक्के पाणीसाठा होता. नाशिक, पुणे आणि कोकण या प्रदेशात तुलनेने पाण्याचा सुकाळ दिसून येत आहे. राज्याचे एकूण चित्र पाहिल्यास ८ पैकी चार वर्षे निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असल्याचे आकडेवारी सांगते. तर २०१५ मध्ये आठ वर्षांतील दुष्काळाची तीव्रता अधिक नोंदविण्यात आली.मराठवाड्यावर संकटमराठवाड्यात नोव्हेंबर २०१५ मध्ये तर अवघा १४ टक्केच पाणीसाठा होता. त्यावेळी लातुरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ राज्य सरकारवर आली होती. 

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र