शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

काळजी नको, अजितदादांशी 'युती'चं कारण योग्य वेळी सांगेन; फडणवीसांनी वाढवला 'सस्पेन्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:05 IST

निवडणूक प्रचारापुरता जरी हा मुद्दा असला तरीही फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवारांना मिळालेली क्लिनचिट कळीचा मुद्दा ठरली आहे. 

मुंबई : राज्यपालांनी पहिल्यावेळी सत्तास्थापनेला बोलविल्यानंतर भाजपाने बहुमत नसल्याचे सांगत सरकार बनविण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीही सरकार स्थापनेस अपयशी ठरल्याने भाजपाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या साथीने शनिवारी राज्याच्या राजकारणात भूकंप आणला होता. दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याने अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला होता. 

या घडामोडींनंतर फडणवीसांवर टीका सुरू झाली होती. कारण फडणवीस, किरिट सोमय्या आणि एकनाथ खडसे यांनी आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या विरोधात 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करत बैलगाड्या भरून पुरावे आणले होते. तसेच गेली सहा वर्षांतील आणि मुख्यमंत्री काळातही फडणवीस यांनी पवार तुरुंगात चक्की पिसतील, तुरुंगात टाकणार अशी वक्तव्ये केली होती. निवडणूक प्रचारापुरता जरी हा मुद्दा असला तरीही फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवारांना मिळालेली क्लिनचिट कळीचा मुद्दा ठरली आहे. 

सोशल मिडीयावरही यावरून फडणवीस आणि भाजपा ट्रोल होऊ लागली आहे. अजित पवारांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे, ज्यांनी आरोप केले त्यांच्या हातूनच घोटाळ्याचे डाग पुसल्याचे यामध्ये म्हटले जात आहे. तसेच भाजपमधूनही दबक्या आवाजात अजित पवारांसोबत गेल्यामुळे टीका होत आहे. एकनाथ खडसे यांनी तर नुकतेच ते पुरावे रद्दीचा दर जास्त होता म्हणून रद्दीत विकल्याचा टोला लगावला आहे. यावर माजी मुख्यमंत्र्यांनी चुप्पीच साधली आहे. 

फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत का गेलो हे योग्य वेळ आल्यावरच योग्य गोष्टी सांगेन असे म्हणत सस्पेन्स वाढविला आहे. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस