शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

दहावीची परीक्षा नकाेच; पालक दाखल करणार हस्तक्षेप याचिका, उच्च न्यायालयात घेणार धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 09:12 IST

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्दचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा विचार आहे.

मुंबई : शिक्षण विभागाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे दहावी परीक्षेसंदर्भातील तिढा वाढला असून विद्यर्थी, पालक संभ्रमात आहेत. त्यामुळेच आता दहावीची परीक्षा नकाेच, असा पवित्रा घेत परीक्षा रद्दविरोधातील जनहित याचिकेविराेधात लवकरच हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तयारी पालक संघटनेने केली आहे.काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्दचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा विचार आहे. दहावीची परीक्षा हाेणार नसेल तर सीईटी कशी हाेणार, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने हा निर्णय घातक असून, पुढील प्रवेशांना आडकाठी आणणारा आहे, असा दावा करत पुण्याचे धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दहावी परीक्षा रद्दच्या निर्णयाविरोधात जनहित याचिका दाखल केली. मात्र, अनेक पालकांनी याला विराेध केला.एकदा दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर पुन्हा त्यांच्या नियोजनाचा घाट घालून लाखो विद्यार्थी, त्यांचे कुटुंब, शिवाय शिक्षकांना कोणत्या संकटात ढकलायचे आहे, असा प्रश्न इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनच्या ॲड. अनुभा सहाय यांनी उपस्थित केला. तर, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने इतर मंडळांप्रमाणे राज्य मंडळाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे पालक संघटनांनी सांगितले.कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. तिसऱ्या लाटेमध्ये १८ वर्षांखालील मुलांना अधिक धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. अशा स्थितीत परीक्षा रद्दच्या निर्णयाला विरोध करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या जनहित याचिकेविरोधात लवकरच हस्तक्षेप याचिका दाखल करू, अशी माहिती ॲड. सहाय यांनी दिली. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळाHigh Courtउच्च न्यायालय