शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

"हा पैसा यांच्या बापाचा आहे का?", लाडकी बहीण योजनेवरील रवी राणांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:45 IST

Vijay Wadettiwar : रवी राणा यांनी हे शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं बोललं आहे. रवी राणांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे, त्याबद्दल सरकारनं माफी मागावी, अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे.

Vijay Wadettiwar : छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणारआहे. या योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. त्यामुळं राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

अशातच या योजनेवरुन अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यातून १५०० परत घेण्यात येतील, असं धक्कादायक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. रवी राणांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

रवी राणा यांनी हे शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं बोललं आहे. रवी राणांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे, त्याबद्दल सरकारनं माफी मागावी, अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, हा सरकारचा पैसा आहे. हा पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणा की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे? असा सवाल करत यांची निती दिसली. निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी योजना आणली. बहिणींना फसवण्यासाठी योजना आणली, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

रवी राणा जे बोलले ते सरकारच्या मनातील आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं रवी राणा बोलले आहेत. मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे. बहिणीचा अपमान आहे. ही योजना मतांसाठी आणली होती, सरकारनं राज्यातील बहिणीची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

रवी राणा नेमकं काय म्हणाले?आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे ३ हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, तर मी तुमचा भाऊ म्हणून ते १५०० रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असे वक्तव्य रवी राणांनी केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत  रवी राणा यांनी घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहतं, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असंही मत रवी राणा यांनी यावेळी मांडलं.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारRavi Ranaरवी राणाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण