शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माणसांच्या पदानुसार शब्दही बदलतात का? ठाकरेंचा सवाल; ओला दुष्काळ जाहीर करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:30 IST

मुख्यमंत्री जाहिराती करण्यात मग्न आहेत. एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात मग्न, तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेही नाहीत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ नियमात बसत नसल्याचे सांगत आहेत. मात्र, २०२० मध्ये विरोधी पक्षनेते असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसेच शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली होती, असा दाखल देत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त, शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. माणसाकडे पद आले की त्यानुसार त्याचे शब्दही बदलतात का, असा टोलाही त्यांनी लगावला.

पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १० रुपये असे टनामागे १५ रुपये कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला. शेतकऱ्यांचाच खिसा कापून त्यांनाच मदत करण्याचा हा प्रकार आहे. साखर संघानेदेखील या निर्णयाला विरोध केला आहे. शेतकरी अतिशय उद्विग्न झाले असून आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. परंतु, मुख्यमंत्री जाहिराती करण्यात मग्न आहेत. एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात मग्न, तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेही नाहीत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. 

भाजपत आल्यावरच मिळेल कर्जमुक्ती? भाजपमध्ये गेलेल्या काही साखरसम्राटांच्या कर्जाची परतफेड सरकार करणार आहे. साखरसम्राटांना भाजप सरकारने कर्जमाफी दिली. पीक नष्ट झाल्याने शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबले आहेत. जमीन, मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.  शेतकरी भाजपमध्ये गेल्यानंतरच त्यांना कर्जमुक्त करणार का? भाजप त्यासाठीच थांबला आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला.

पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधाकेंद्राचे पथक अजूनही राज्यात आलेले नाही. नुकसानीची पाहणी होणार कधी? पंचनामे होणार कधी? तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचे? घरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्याची मागणीही ठाकरे यांनी केली.

कागदी घोडे नाचवू नकापूरग्रस्त भागातील शाळा तत्काळ सुरू करा. रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा येत आहेत. बी-बियाणे कोण उपलब्ध करणार? शेतकरी पुढच्या हंगामाची तयारी कशी करणार? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे नियमांचे कागदी घोडे नाचवू नका. तातडीने लक्ष देऊन संकटात असलेल्या महाराष्ट्रासाठी तरी दिल्ली गाठा, असे ठाकरे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Demands Declaration of Wet Drought, Questions Changing Stance

Web Summary : Uddhav Thackeray urges the government to declare a wet drought and aid flood-affected farmers. He criticized the government's decision to deduct funds from sugarcane farmers for relief efforts and questioned their focus on advertisements amidst farmer distress. Thackeray also demanded assistance for rebuilding homes.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रfloodपूर