शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या घरात आया-बहिणी, सुना नाहीत का?; अजित पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:54 IST

प्रियंका गांधींवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना सुनावले खडेबोल

कागल/ गारगोटी : प्रियंका गांधी राजकारणात आल्यावर तुमचं काय बिघडलं? इशा कोप्पीकर नावाच्या अभिनेत्री भाजपमध्ये गेल्या. त्या भगिनीला वाटलं म्हणून त्या तुमच्या पक्षात आल्या. म्हणून काय टीका करायची आहे. छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राने हे शिकविले नाही. प्रियंका गांधींचा उल्लेख ‘चॉकलेटी चेहरा’ म्हणून करता? तुमच्या घरात आया-बहिणी, लेकी-सुना नाहीत का? असा परखड सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने काढण्यात आलेली निर्धार परिवर्तन यात्रा सोमवारी सकाळी कागलमध्ये आली. त्यानिमित्त येथील श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संग्रामसिंह कोलते-पाटील, माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, संगीता खाडे, वसंतराव धुरे, आदिल फरास, युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, सभापती राजश्री माने, नविद मुश्रीफ, भैया माने, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्षा नूतन गाडेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजता सभा असूनही मोठी गर्दी झाली होती.अजित पवार म्हणाले, थापा मारणाºयांमध्ये मोदी-फडणवीस यांचे हात कोण पकडू शकत नाही. समाजसेवक आण्णा हजारे म्हणतात की, ढवळ्याजवळ पवळ्या बांधला वाण नाही गुण तरी लागला. आज केंद्र आणि राज्यातील या भाजप सरकारवर समाजातील सर्वच घटक नाराज आहेत. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहे. आम्हीही काही वर्षे अर्थमंत्री होतो. अंगात धमक असली तरच नडलेल्यांना मदत करता येते. या सरकारमध्ये ती धमक नाही.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ६० वर्षे उभ्या असलेल्या देशातील महत्त्वाच्या संस्था मोडण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. राफेल प्रकरणात आपल्यावर केस दाखल करतील म्हणून मध्यरात्री सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना काढून टाकले गेले. हे देशहिताचे सरकार नाही. बहुजनासाठी घातक असणारे हे सरकार आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ यांचीही भाषणे झाली. स्वागत तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, सूत्रसंचालन प्रवीण काळबर, तर नगराध्यक्षा माणिक माळी यांनी आभार मानले.राज्यावर कर्जाचा डोंगरपाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. ते आता पाच लाख कोटी रुपये झाले आहे. लाखो कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर जनतेच्या डोक्यावर ठेवणाºया युती सरकारने विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला आहे. भाजप मंत्र्यांनी नव्वद हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी मुधाळ येथील सभेत केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा