शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

तुमच्या घरात आया-बहिणी, सुना नाहीत का?; अजित पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:54 IST

प्रियंका गांधींवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना सुनावले खडेबोल

कागल/ गारगोटी : प्रियंका गांधी राजकारणात आल्यावर तुमचं काय बिघडलं? इशा कोप्पीकर नावाच्या अभिनेत्री भाजपमध्ये गेल्या. त्या भगिनीला वाटलं म्हणून त्या तुमच्या पक्षात आल्या. म्हणून काय टीका करायची आहे. छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राने हे शिकविले नाही. प्रियंका गांधींचा उल्लेख ‘चॉकलेटी चेहरा’ म्हणून करता? तुमच्या घरात आया-बहिणी, लेकी-सुना नाहीत का? असा परखड सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने काढण्यात आलेली निर्धार परिवर्तन यात्रा सोमवारी सकाळी कागलमध्ये आली. त्यानिमित्त येथील श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संग्रामसिंह कोलते-पाटील, माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, संगीता खाडे, वसंतराव धुरे, आदिल फरास, युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, सभापती राजश्री माने, नविद मुश्रीफ, भैया माने, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्षा नूतन गाडेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजता सभा असूनही मोठी गर्दी झाली होती.अजित पवार म्हणाले, थापा मारणाºयांमध्ये मोदी-फडणवीस यांचे हात कोण पकडू शकत नाही. समाजसेवक आण्णा हजारे म्हणतात की, ढवळ्याजवळ पवळ्या बांधला वाण नाही गुण तरी लागला. आज केंद्र आणि राज्यातील या भाजप सरकारवर समाजातील सर्वच घटक नाराज आहेत. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहे. आम्हीही काही वर्षे अर्थमंत्री होतो. अंगात धमक असली तरच नडलेल्यांना मदत करता येते. या सरकारमध्ये ती धमक नाही.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ६० वर्षे उभ्या असलेल्या देशातील महत्त्वाच्या संस्था मोडण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. राफेल प्रकरणात आपल्यावर केस दाखल करतील म्हणून मध्यरात्री सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना काढून टाकले गेले. हे देशहिताचे सरकार नाही. बहुजनासाठी घातक असणारे हे सरकार आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ यांचीही भाषणे झाली. स्वागत तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, सूत्रसंचालन प्रवीण काळबर, तर नगराध्यक्षा माणिक माळी यांनी आभार मानले.राज्यावर कर्जाचा डोंगरपाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. ते आता पाच लाख कोटी रुपये झाले आहे. लाखो कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर जनतेच्या डोक्यावर ठेवणाºया युती सरकारने विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला आहे. भाजप मंत्र्यांनी नव्वद हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी मुधाळ येथील सभेत केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा