शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दुष्काळासाठी मुहूर्त पाहू नका; काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 2:05 AM

शनिवारी सकाळपासून काँग्रेसतर्फे दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती.

औरंगाबाद : ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त न पाहता संपूर्ण मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये अनुदान द्या, अन्यथा काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शनिवारी सकाळपासून काँग्रेसतर्फे दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कार्यकर्त्यांशी चर्चा झाली व दुष्काळाची माहिती घेण्यात आली.

मराठवाड्यात ७६ पैकी ५६ तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, उडीद ही पिके वाया गेली आहेत. पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे. चाºयाचा प्रश्न गंभीर होणार आहे. शेतीचा व्यवसाय कोलमडणार आहे. रब्बीचा हंगामसुद्धा धोक्यात आला आहे. मराठवाड्यातील तीन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक काढण्यात आलेली आहे. आता या जिल्ह्यांना काहीच सवलती मिळणार नाहीत, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली.‘या’ राज्यांकडे जातो कोळसाकोळशाचे नीट नियोजन केले नसल्याने राज्यात विजेचे भारनियमन करण्याची वेळ आलेली आहे. निवडणुका जाहीर झालेल्या राज्यांमध्ये कोळसा वळविण्यात येत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. लवकरच जल आराखडा जाहीर होईल. त्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी निर्देशित करण्यात आले पाहिजे. या संदर्भात मी शासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस