शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

मातृभाषा आणि मातृभूमीला विसरू नका - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 20:35 IST

ब्रिटिश गेले परंतु, मनोवृत्ती आपल्याकडे ठेऊन गेले. इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर आजही आहे. माझ्या मते मातृभाषेतून भावना, विचार उत्तमपणे व्यक्त होतात, आणि त्याचा ठसा दुस-यांच्या मनावर उमटतो. त्यामुळे जन्मभूमी, मातृभूमी, मातृभाषा विसरू नये.

पिंपरी - ब्रिटिश गेले परंतु, मनोवृत्ती आपल्याकडे ठेऊन गेले. इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर आजही आहे. माझ्या मते मातृभाषेतून भावना, विचार उत्तमपणे व्यक्त होतात, आणि त्याचा ठसा दुस-यांच्या मनावर उमटतो. त्यामुळे जन्मभूमी, मातृभूमी, मातृभाषा विसरू नये. घर, कार्यालयात आणि सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मातृभाषेतच बोलावे, भाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी येथे आज केले.

पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या नवव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू पी. एन राजदान, अधिष्ठाता डॉ. ए. एन सुर्रेकर, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी गुरू सेवा मंडळाचे अ‍ॅड. विष्णू पारनेरकर, पुढारी वृत्तपत्र समूहाचे चेअरमन प्रतापसिंह जाधव यांनी डीलीट पदवी प्रदान करण्यात आली. तसेच  केआयआयटी भुवणेश्वरचे संस्थापक प्रा. अच्युत सामंता यांना डॉक्टर आॅफ सायन्य पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी १०५६ विद्यार्थ्यांना पदवी आणि १९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि बारा विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. 

‘‘विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पदवीदान हा अंत्यत महत्वाचा क्षण आहे. या सोहळ्यास उपस्थित असणा-या सर्वांना माझा नमस्कार. मराठी ही अत्यंत सुंदर भाषा आहे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मराठीतून बोलताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तीस मिनिटांच्या भाषणात मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून मनोगत व्यक्त केले. युवाशक्ती, शिक्षण प्रणाली, संस्कृती, पालकांची कर्तव्ये यावर भाष्य करून पुणेकरांना जिंकले. उपराष्ट्रपती म्हणाले, ‘‘शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. महाविद्यालयीन शिक्षण हा ज्ञानप्राप्तीचा महत्वाचा टप्पा आहे. मुलांनी नेत्रदीपक यश मिळविले सर्वांचे अभिनंदन. कुटुंब, समाज आणि देश विकासाची मोठी जबाबदारी तरूणांवर आहे. देशाचे भवितव्य तरूणांच्या हाती आहे. अतिथी देवो भव्, मातृदेवो, पितृदेवो भव्, वसुदेव कुटुंबम् आणि समधर्म समभाव ही आपली संस्कती आहे. संस्कृतीचे जतन करण्याचे काम करावे. त्यामुळे देशाच्या विकासात हातभार लावावा.’’ 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूmarathiमराठीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड