शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधाराला अटक; ५ महिन्यांनंतर सुरक्षा दलांना मोठं यश, ऑपरेशन महादेव यशस्वी!
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
4
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
5
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
6
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
7
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
8
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
9
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
10
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
11
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
12
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
13
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
14
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
15
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
16
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
18
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
19
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
20
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप

मातृभाषा आणि मातृभूमीला विसरू नका - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 20:35 IST

ब्रिटिश गेले परंतु, मनोवृत्ती आपल्याकडे ठेऊन गेले. इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर आजही आहे. माझ्या मते मातृभाषेतून भावना, विचार उत्तमपणे व्यक्त होतात, आणि त्याचा ठसा दुस-यांच्या मनावर उमटतो. त्यामुळे जन्मभूमी, मातृभूमी, मातृभाषा विसरू नये.

पिंपरी - ब्रिटिश गेले परंतु, मनोवृत्ती आपल्याकडे ठेऊन गेले. इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर आजही आहे. माझ्या मते मातृभाषेतून भावना, विचार उत्तमपणे व्यक्त होतात, आणि त्याचा ठसा दुस-यांच्या मनावर उमटतो. त्यामुळे जन्मभूमी, मातृभूमी, मातृभाषा विसरू नये. घर, कार्यालयात आणि सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मातृभाषेतच बोलावे, भाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी येथे आज केले.

पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या नवव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू पी. एन राजदान, अधिष्ठाता डॉ. ए. एन सुर्रेकर, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी गुरू सेवा मंडळाचे अ‍ॅड. विष्णू पारनेरकर, पुढारी वृत्तपत्र समूहाचे चेअरमन प्रतापसिंह जाधव यांनी डीलीट पदवी प्रदान करण्यात आली. तसेच  केआयआयटी भुवणेश्वरचे संस्थापक प्रा. अच्युत सामंता यांना डॉक्टर आॅफ सायन्य पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी १०५६ विद्यार्थ्यांना पदवी आणि १९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि बारा विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. 

‘‘विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पदवीदान हा अंत्यत महत्वाचा क्षण आहे. या सोहळ्यास उपस्थित असणा-या सर्वांना माझा नमस्कार. मराठी ही अत्यंत सुंदर भाषा आहे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मराठीतून बोलताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तीस मिनिटांच्या भाषणात मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून मनोगत व्यक्त केले. युवाशक्ती, शिक्षण प्रणाली, संस्कृती, पालकांची कर्तव्ये यावर भाष्य करून पुणेकरांना जिंकले. उपराष्ट्रपती म्हणाले, ‘‘शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. महाविद्यालयीन शिक्षण हा ज्ञानप्राप्तीचा महत्वाचा टप्पा आहे. मुलांनी नेत्रदीपक यश मिळविले सर्वांचे अभिनंदन. कुटुंब, समाज आणि देश विकासाची मोठी जबाबदारी तरूणांवर आहे. देशाचे भवितव्य तरूणांच्या हाती आहे. अतिथी देवो भव्, मातृदेवो, पितृदेवो भव्, वसुदेव कुटुंबम् आणि समधर्म समभाव ही आपली संस्कती आहे. संस्कृतीचे जतन करण्याचे काम करावे. त्यामुळे देशाच्या विकासात हातभार लावावा.’’ 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूmarathiमराठीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड