शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 11:25 IST

Shirdi News : शिर्डीपासून २७५ किलोमीटर अंतरावर परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला असा दावा पाथरीकरांनी केला आहे.

अहमदनगर - राज्य सरकारने पाथरी येथील साईबाबा जन्मस्थानाच्या विकास आराखड्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर केल्यानंतर शिर्डी आणि पाथरी असा वाद उफाळून आला आहे. याबाबत शिर्डीकरांनासाईबाबा यांचा जन्म पाथरीत झाला नसल्याचा दावा करत या निर्णयाविरोधात बेमुदत बंदचं हत्यार उपसलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर हा बंद मागे घेण्यात आला असून मंत्रालयात याबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. 

शिर्डी फक्त भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण नसून याठिकाणी साईबाबांना मिळणाऱ्या देणगीचंही विशेष महत्त्व आहे. भारतातील श्रीमंत देवस्थानामध्ये शिर्डीचा तिसरा नंबर लागतो. अनेक भक्त शिर्डीच्या साईबाबांना सोने-चांदीपासून कोट्यवधी रुपये दान करत असतात. शिर्डीच्या साईबाबांचा खजिना कधीही रिकामा होत नाही तर दिवसेंदिवस यामध्ये भर होताना दिसत असते. 

उभं आयुष्य फकिर म्हणून साईबाबा जीवन जगले. ते कोणत्या जातीचे न धर्माचे होते याची कल्पना कोणालाही नाही. मात्र साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरी यांच्यात विवाद निर्माण झाला आहे. श्री साईबाबा संस्थानच्या २०१७-१८ च्या ऑडिट रिपोर्टनुसार मंदिराची एकूण संपत्ती २ हजार ६९३ कोटी ६९ लाख रुपये आहे. शिर्डीमध्ये नेहमी भक्तांची गर्दी पाहायला मिळते. फक्त राज्यातून नव्हे तर देशविदेशातून भक्त साईंच्या दर्शनासाठी येतात. २०१९ मध्ये सरासरी दिवसाला ७८ कोटी रुपये दान म्हणून साईंच्या पेटीमध्ये जमा होतात. मागील वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत साईबाबांच्या देणगीमध्ये एकूण २८७ कोटींचे दान प्राप्त झाले. 

२०१८-१९ च्या आकडेवारीनुसार शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडे २ हजार २३७ कोटी रुपये संपत्ती आहे. २३ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२० पर्यंत ११ दिवसाच्या काळात साडेआठ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. या कालावधीत १७ कोटी ४२ लाख दान साईबाबांना अर्पण करण्यात आले. साईबाबांच्या १०० व्या पुण्यतिथीपूर्वी २०१७ मध्ये शिर्डी विमानतळाचं उद्धाटन करण्यात आलं. अनेक प्रसिद्ध हॉटेल्स या परिसरात उघडण्यात आले आहेत. 

शिर्डीपासून २७५ किलोमीटर अंतरावर परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला असा दावा पाथरीकरांनी केला आहे. तर या दाव्यात सत्य नाही असं शिर्डीकरांचे म्हणणं आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा शिर्डीकरांनी बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे.    

टॅग्स :shirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिरsaibabaसाईबाबा