शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 11:25 IST

Shirdi News : शिर्डीपासून २७५ किलोमीटर अंतरावर परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला असा दावा पाथरीकरांनी केला आहे.

अहमदनगर - राज्य सरकारने पाथरी येथील साईबाबा जन्मस्थानाच्या विकास आराखड्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर केल्यानंतर शिर्डी आणि पाथरी असा वाद उफाळून आला आहे. याबाबत शिर्डीकरांनासाईबाबा यांचा जन्म पाथरीत झाला नसल्याचा दावा करत या निर्णयाविरोधात बेमुदत बंदचं हत्यार उपसलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर हा बंद मागे घेण्यात आला असून मंत्रालयात याबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. 

शिर्डी फक्त भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण नसून याठिकाणी साईबाबांना मिळणाऱ्या देणगीचंही विशेष महत्त्व आहे. भारतातील श्रीमंत देवस्थानामध्ये शिर्डीचा तिसरा नंबर लागतो. अनेक भक्त शिर्डीच्या साईबाबांना सोने-चांदीपासून कोट्यवधी रुपये दान करत असतात. शिर्डीच्या साईबाबांचा खजिना कधीही रिकामा होत नाही तर दिवसेंदिवस यामध्ये भर होताना दिसत असते. 

उभं आयुष्य फकिर म्हणून साईबाबा जीवन जगले. ते कोणत्या जातीचे न धर्माचे होते याची कल्पना कोणालाही नाही. मात्र साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरी यांच्यात विवाद निर्माण झाला आहे. श्री साईबाबा संस्थानच्या २०१७-१८ च्या ऑडिट रिपोर्टनुसार मंदिराची एकूण संपत्ती २ हजार ६९३ कोटी ६९ लाख रुपये आहे. शिर्डीमध्ये नेहमी भक्तांची गर्दी पाहायला मिळते. फक्त राज्यातून नव्हे तर देशविदेशातून भक्त साईंच्या दर्शनासाठी येतात. २०१९ मध्ये सरासरी दिवसाला ७८ कोटी रुपये दान म्हणून साईंच्या पेटीमध्ये जमा होतात. मागील वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत साईबाबांच्या देणगीमध्ये एकूण २८७ कोटींचे दान प्राप्त झाले. 

२०१८-१९ च्या आकडेवारीनुसार शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडे २ हजार २३७ कोटी रुपये संपत्ती आहे. २३ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२० पर्यंत ११ दिवसाच्या काळात साडेआठ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. या कालावधीत १७ कोटी ४२ लाख दान साईबाबांना अर्पण करण्यात आले. साईबाबांच्या १०० व्या पुण्यतिथीपूर्वी २०१७ मध्ये शिर्डी विमानतळाचं उद्धाटन करण्यात आलं. अनेक प्रसिद्ध हॉटेल्स या परिसरात उघडण्यात आले आहेत. 

शिर्डीपासून २७५ किलोमीटर अंतरावर परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला असा दावा पाथरीकरांनी केला आहे. तर या दाव्यात सत्य नाही असं शिर्डीकरांचे म्हणणं आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा शिर्डीकरांनी बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे.    

टॅग्स :shirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिरsaibabaसाईबाबा