शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मविआत खटके ! विधानसभेतील पराभवानंतर दरी वाढली, महाआघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 06:04 IST

तीनही पक्षांच्या नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वाद विकोपाला जाऊन काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीत बिघाडी निर्माण झाली असतानाच, आता राज्यातील महाविकास आघाडीतही वादाची ठिणगी पडली आहे. ‘मविआ’तील तीनही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केल्याने विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर निर्माण झालेली दरी वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे आघाडीच्या भवितव्यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शरद पवार गट : ठाकरे गट झोपलेला, काँग्रेस मोडलेली पाठ

ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, अशी टीका करत आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे, असे विधान शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत केले.

काँग्रेस : तुम्ही पक्षाकडे लक्ष द्या

त्याला उत्तर देताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, या सरकारने ईव्हीएमच्या भरवशावर सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे थोडे अधिक लक्ष द्यावे आणि आम्हाला सल्ला कमी द्यावा. जागावाटपाचा तिढा जर दोन दिवसांत संपला असता, तर प्रचारासाठी आणि नियोजनासाठी आम्हांला १८ दिवस मिळाले असते. त्यामुळे जागावाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ हे पराभवाचे मुख्य कारण आहे. 

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही ऊर्मी आहे. आजही ते पक्ष उभा करू शकतात, ही ताकद आहे. त्यामुळे कोण काय बोलते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगत काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी अमोल कोल्हेंना लक्ष्य केले.

उद्धवसेना : दोघांनीच  आत्मचिंतन करावे

उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अमोल कोल्हे आणि वडेट्टीवार या दोघांच्या वक्तव्याचा समाचार घेत निशाणा साधला आहे. जागावाटपाच्या चर्चेत वडेट्टीवार होतेच. विदर्भातील काही जागा वडेट्टीवारांनी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सोडल्या असत्या तर बरे झाले असते. त्या जागा ते हरलेले आहेत. काही लोकांना असे वाटत होते, आता फक्त आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, देशातील वातावरण बदललेले आहे वगैरे वगैरे, असा टोला राऊत यांनी काँग्रेसला लगावला. कोल्हेंना ठाकरे गटावर टीका करण्याचा काय अधिकार आहे? तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा, असा सल्ला उद्धवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

तर अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहेत. त्यांच्या पक्षाची काय स्थिती आहे ती सगळ्यांनी बघितली आहे, असा टोला उद्धवसेनेचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

एकीचे बळ...?

दुसरीकडे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आहे. शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात सामील होऊन सत्तेची उब घ्यावी, अशी मागणी बैठकीत जाहीरपणे व्यक्त केल्याने भविष्यात ‘एकीचे बळ’ दिसणार का, याबाबत उलटसुलट चर्चा आहे.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSanjay Rautसंजय राऊतAmbadas Danweyअंबादास दानवेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार