शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मविआत खटके ! विधानसभेतील पराभवानंतर दरी वाढली, महाआघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 06:04 IST

तीनही पक्षांच्या नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वाद विकोपाला जाऊन काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीत बिघाडी निर्माण झाली असतानाच, आता राज्यातील महाविकास आघाडीतही वादाची ठिणगी पडली आहे. ‘मविआ’तील तीनही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केल्याने विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर निर्माण झालेली दरी वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे आघाडीच्या भवितव्यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शरद पवार गट : ठाकरे गट झोपलेला, काँग्रेस मोडलेली पाठ

ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, अशी टीका करत आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे, असे विधान शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत केले.

काँग्रेस : तुम्ही पक्षाकडे लक्ष द्या

त्याला उत्तर देताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, या सरकारने ईव्हीएमच्या भरवशावर सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे थोडे अधिक लक्ष द्यावे आणि आम्हाला सल्ला कमी द्यावा. जागावाटपाचा तिढा जर दोन दिवसांत संपला असता, तर प्रचारासाठी आणि नियोजनासाठी आम्हांला १८ दिवस मिळाले असते. त्यामुळे जागावाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ हे पराभवाचे मुख्य कारण आहे. 

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही ऊर्मी आहे. आजही ते पक्ष उभा करू शकतात, ही ताकद आहे. त्यामुळे कोण काय बोलते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगत काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी अमोल कोल्हेंना लक्ष्य केले.

उद्धवसेना : दोघांनीच  आत्मचिंतन करावे

उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अमोल कोल्हे आणि वडेट्टीवार या दोघांच्या वक्तव्याचा समाचार घेत निशाणा साधला आहे. जागावाटपाच्या चर्चेत वडेट्टीवार होतेच. विदर्भातील काही जागा वडेट्टीवारांनी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सोडल्या असत्या तर बरे झाले असते. त्या जागा ते हरलेले आहेत. काही लोकांना असे वाटत होते, आता फक्त आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, देशातील वातावरण बदललेले आहे वगैरे वगैरे, असा टोला राऊत यांनी काँग्रेसला लगावला. कोल्हेंना ठाकरे गटावर टीका करण्याचा काय अधिकार आहे? तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा, असा सल्ला उद्धवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

तर अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहेत. त्यांच्या पक्षाची काय स्थिती आहे ती सगळ्यांनी बघितली आहे, असा टोला उद्धवसेनेचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

एकीचे बळ...?

दुसरीकडे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आहे. शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात सामील होऊन सत्तेची उब घ्यावी, अशी मागणी बैठकीत जाहीरपणे व्यक्त केल्याने भविष्यात ‘एकीचे बळ’ दिसणार का, याबाबत उलटसुलट चर्चा आहे.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSanjay Rautसंजय राऊतAmbadas Danweyअंबादास दानवेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार