शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ठिणगी; नाना पटोलेंचे फोन घेणंही उद्धव ठाकरेंनी टाळलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:41 IST

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी चारही जागांवर उमेदवार महाविकास आघाडीत काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. 

मुंबई - विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर जागांसाठी निवडणूक पार पडतेय. मात्र याच निवडणुकीवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. विधान परिषदेच्या सर्व जागांवर उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केले. त्यावरून काँग्रेस नेते प्रचंड नाराज आहेत. नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मागे घ्यावी अशी काँग्रेसनं ठाकरेंकडे मागणी केली आहे.

याबाबत नाना पटोले म्हणाले की, ज्यावेळी उद्धव ठाकरे लंडनमध्ये गेले, तेव्हा फोनवरून संवाद झाला. २ जागा तुम्ही लढा आणि २ जागा आम्ही लढतो असं म्हटलं. त्यांनी मला तुमचे उमेदवार कोण असं विचारले त्यावर उमेदवारांची नावे सांगितली. नाशिकमधले जे उमेदवार होते. त्यांना ठाकरेंनी बोलावून घेतले आणि उभे केले. चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित आहे. महाविकास आघाडीत चर्चा करून निर्णय घेतला असता तर या चारही जागा आम्हाला जिंकणे सोप्पे झाले असते असं त्यांनी सांगितले.

तसेच ठाकरेंनी चारही जागा घोषित केल्या आहेत. मी सकाळपासून त्यांना फोन लावतोय, पण त्यांचे ऑपरेटर साहेब तयार होतायेत असा निरोप देत होते. माझ्याशी त्यांचा फोनवर संपर्क झाला नाही. ठाकरेंच्या मनात नेमके काय हे भेटल्यावर कळेल. आम्ही मुंबईत उमेदवार दिले नाहीत. त्यांचा मुंबईत रस असतो हे आम्हाला माहिती आहे. परंतु परस्पर त्यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. आपण सर्वांनी महाविकास आघाडीत लढलं पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं.

सांगलीच्या जागेवरून वादंग

लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात वादंग निर्माण झालं होतं. सांगलीत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती. मात्र याठिकाणी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी कडाडून विरोध केला. मात्र ठाकरेंनी उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने येथील काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणुकीत अर्ज भरला. निकालात अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारली. याठिकाणी ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यातच निवडणुकीच्या निकालानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला. काँग्रेसनेही विशाल पाटलांचे कौतुक केले. मात्र या राजकीय खेळीमुळे ठाकरेंच्या उमेदवारावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की सहन करावी लागली. त्यामुळे सांगलीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक