शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 07:41 IST

loksabha Election 2024 - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठा दावा करत राजनाथ सिंह यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाल्याचं म्हटलं आहे.

मुंबई - Prakash Ambedkar on Sharad Pawar ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठा दावा केला आहे. ४ दिवसांपूर्वी शरद पवार आणि भाजपा नेते राजनाथ सिंह यांच्यात फोनवरून काय चर्चा झाली याचा खुलासा पवारांनी करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ४ दिवसांपूर्वी शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला, त्याचे कारण काय? राजनाथ सिंह यांच्यासोबत काय चर्चा झाली, याचा खुलासा करावा. राष्ट्रवादीच्या ५ जागांबाबत शरद पवारांचे बोलणे झाले का? की एकनाथ शिंदे मुंबईतील ३ जागा लढवतायेत त्यावर बोलणं झालं?, उद्धव ठाकरेंबाबत काय बोलणं झालं याबाबत लोकांना शरद पवारांनी माहिती द्यायला हवी असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच जेव्हा आमच्याशी चर्चा सुरू होती. तेव्हा आम्ही बैठकीत मागणी केली होती, जर आपण पुरोगामी मतदारांकडून मते घेत असू तर त्यांना कुठेतरी आपल्याला आश्वासित करावे लागेल. आपण पुढील ५ वर्ष जोवर लोकसभा, विधानसभा बरखास्त होत नाही तोवर भाजपासोबत जाणार नाही असं सार्वजनिकरित्या जनतेला सांगायला हवे असं आश्वासन जनतेला द्यायला हवे असंही प्रकाश आंबेडकरांनी आठवण करून दिली. 

दरम्यान, या निवडणुकीत अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहे. ऐन निवडणुकीत शरद पवारांकडून फोन का करण्यात आला याचा खुलासा व्हावा. २०१४ मध्ये आपण निवडणूक होऊ नये यासाठी बाहेरून पाठिंबा दिला तसं राजनाथ सिंह आजारी होते, त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं उत्तर देऊ नये. हा बालबोध आम्हाला सांगू नका. नेमकी काय चर्चा झाली हे सांगावे अशी प्रकाश आंबेडकरांनी मागणी केली. बारामतीच्या मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही उशिरा दिली असंही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSharad Pawarशरद पवारRajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४