शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू; शेतकऱ्यांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 20:55 IST

१५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला विसर्ग.

ठळक मुद्दे१५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला विसर्ग.

लोहारा : लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत रविवारी १५ ऑगस्ट रोजी पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यांचा लोहारा,उमरगा,औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मागील एक महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्या लगत असलेल्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी लोहारा - उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मागच्याच आठवड्यात लातूर विभागाचे अधीक्षक अभियंता,उपकार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करून संपर्क साधला होता. या अनुषंगाने रविवारी १५ ऑगस्ट रोजी माकणी निम्न तेरणा  प्रकल्प येथे खासदार ओमराजे निंबाळकर,लोहारा - उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, औश्याचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या उपस्थितीत उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

सध्या सदर प्रकल्पात एकूण ७९.५२५ दलघमी उपलब्ध पाणीसाठा असून यापैकी एकूण ओपन पॉईंट ३३ टक्के म्हणजेच ४९.५५८ दलघमी एवढा उपलब्ध पाणीसाठा आहे. सदर पाणीसाठा पैकी उजव्या कालव्याद्वारे ३.०४ घमी पर सेकंद व डाव्या कालव्याद्वारे ३.०४ घमी पर सेकंद इतका विसर्ग होत असून सदरचे पुढील पंधरा दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उजव्या कालव्या लगतच्या लोहारा - उमरगा तालुक्यातील माकणी, सास्तूर, राजेगाव, पेठसांगवी,होळी ,कवठा यासह एकूण २३ गावातील शेतकऱ्यांना व डाव्या कालव्याला लगतच्या औसा तालुक्यातील सारणी मंगरूळ आदी २० गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीWaterपाणी