शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

मेघे बंधूंचे भाजपात सन्मानजनक पुनर्वसन

By admin | Updated: June 22, 2014 01:07 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. दत्ता मेघे हे पुत्र सागर व समीर यांच्यासह लवकरच भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. त्यांच्या दोन्ही पुत्रांचे भाजपमध्ये सन्मानजनक पुनर्वसन केले जाणार आहे.

श्रेष्ठींपुढे नवा फॉर्म्युला : सागर देवळीतून, समीर परिषदेसाठी लढणार ?कमलेश वानखेडे - नागपूरकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. दत्ता मेघे हे पुत्र सागर व समीर यांच्यासह लवकरच भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. त्यांच्या दोन्ही पुत्रांचे भाजपमध्ये सन्मानजनक पुनर्वसन केले जाणार आहे. सूत्रानुसार सागर यांनी देवळीतून विधानसभेची तर समीर यांनी पुढील वर्षी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढावी, असा पर्याय पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात भाजप नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे पश्चिम नागपूर मतदारसंघात आ. सुधाकरराव देशमुख व मध्य नागपुरात आ. विकास कुंभारे यांचे समर्थक काहीसे रिलॅक्स झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत वर्धेतून काँग्रेसकडून लढलेले सागर मेघे यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दत्ता मेघे यांना ‘मैत्री’चा हात पुढे करताच मेघेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हे करीत असताना त्यांनी पुत्रांच्या राजकीय पुनर्वसनाला प्राधान्य दिले. मेघे पुत्रांच्या एन्ट्रीमुळे भाजपमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. येत्या विधानसभा निवडणुकीत सागर व समीर हे कुठून लढतील, याबाबत तर्कवितर्क लावले गेले. त्याचवेळी समीर यांच्या पुनर्वसनासाठी आपल्या नेत्यावर तर गंडांतर येणार नाही, अशी धास्ती आ. सुधाकरराव देशमुख व आ. विकास कुंभारे यांच्या समर्थकांनी घेतली. पश्चिममध्ये दीड हजारावरील लिड ३८ हजारावर नेणाऱ्या सुधाकररावांना थांबविणे कितपत योग्य, असा सवाल पश्चिमचे कार्यकर्ते करू लागले. कुंभारे यांना थांबविले तर हलबा समाजात प्रतिक्रिया उमटण्याचा धोका आहे. दक्षिणच्या इच्छुकांमध्येही धुसफूस सुरु आहे. यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर आळवला जाऊ लागला आहे. सत्तासुख घेण्याच्या काळात पक्षांतर्गत असी धुसफूस नको म्हणून भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेत पक्षश्रेष्ठींसमोर हा विषय मांडला. सागर यांना देवळीतून विधानसभेचे तिकीट द्यावे. दत्ताभाऊंचे शिष्य व वर्धेचे नवनिर्वाचित खासदार रामदास तडस हे सागर यांना सहज निवडून आणतील. समीर यांना नागपुरातून विधानसभेचे तिकीट न देता पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरवावे. या महागड्या निवडणुकीसाठी पक्षाला सक्षम उमेदवार मिळेल. काँग्रेसकडे असलेली ही जागा भाजपला खेचता येईल. याच जागेवर सागर हे भाजपकडून जिंकले होते. या अडजेस्टमेंटमुळे विद्यमान आमदांरावर गदा येणार नाही. मेघे बंधूंचे राजकीय पुनर्वसन होईल व पक्षातील अस्वस्थताही कमी होईल. हा फॉर्म्युला पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात नेत्यांना यश आले आहे. मेघे-मुळक राजकीय संघर्ष टळणार !मेघे- मुळक यांचे कौटुंबिक संबंध आहेत. राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी पश्चिममधून लढण्याची तयारी चालविली आहे. अशात समीर मेघे यांनीही भाजपकडे पश्चिमसाठी दावेदारी केली.दोघांनीही माघार घेतली नाही तर या दोन कुटुंबात राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे होती. नव्या फार्म्युल्यानुसार समीर थांबले तर मेघे-मुळक यांच्यातील राजकीय संघर्षही टळू शकतो.