शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पंतप्रधान मोदींच्या सूचक इशाऱ्यानंतर शिवसेना नरमली ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 2:32 PM

शिवसेना-भाजपा युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला भाजपच्या कोट्यातील 162 मधील जागा देणार येणार आहेत. मात्र या मित्रपक्षांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी दबाव टाकला जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेली नुरा कुस्ती अखेर संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेने भाजपचा 126-162 असा फॉर्म्युला मान्य केल्याचे सुत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून दिलेल्या सूचक इशाऱ्यानंतर शिवसेनेने नरमईची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं असताना गुरुवारी रात्री उशिरा भाजपा-शिवसेनेची मॅरेथॉन बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात ही बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा 162 जागा तर उर्वरित 126 जागा शिवसेना लढवणार असल्याचं निश्चित झालं असल्याची सूत्रांची माहिती आहे.  

शिवसेना-भाजपा युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला भाजपच्या कोट्यातील 162 मधील जागा देणार येणार आहेत. मात्र या मित्रपक्षांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी दबाव टाकला जाणार असल्याची माहिती आहे. जागावाटपाबाबत आणि युतीची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे समजते.

तत्पूर्वी मंत्री दिवाकर रावते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना 'फिफ्टी-फिफ्टी'च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपनेते गिरीश महाजन यांनी जागा वाटपाचा निर्णय अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच निश्चित करणार असून कोण काय म्हणतं याला महत्त्व नसल्याचे सांगत राऊत आणि खासदार यांना टोला लागवला होता. त्यामुळे युती तुटणार की, राहणार यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरवारी महाराष्ट्रात होते. त्यावेळी त्यांनी भाजपला स्पष्ट बहुमत देण्याची मागणी करून शिवसेनेला एकप्रकारे इशाराच दिला होता. तसेच राममंदिराच्या मुद्दावरून शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या पुनरोच्चाराचा देखील मोदींनी समाचार घेतला होता. तसेच राममंदिराच्या मुद्दावर वायफळ बडबड करू नका अशी विनंती करत न्यायालयावर विश्वास ठेवा असंही सुनावले. मोदींच्या या इशाऱ्यानंतरच जागा वाटपावरून शिवसेनेने एक पाऊल मागे घेतले का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.