शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

ओवेसींनी लोकसभा निवडणुकीतच घेतला होता, पडळकरांच्या हालचालींचा वेध ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 17:59 IST

प्रकाश आंबेडकरांसोबत आरएसएसचे लोक असल्याचा आरोप करत जागा वाटपाच्या मुद्दावर एमआयएमने वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता पडळकरही भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आंबेडकरांना एमआयएमवर अविश्वास आणि पडळकरांवरचा अतिविश्वास नडला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - दलित, मुस्लीम आणि धनगर समाजाचा एकोपा करून लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या वंचित बहुजन आघाडीने लक्षवेधी मते मिळवली होती. वंचितमुळे आघाडीचे अनेक उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे वंचित विधानसभेला महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढेल अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, एमआयएम आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर सोडून गेल्याने वंचित आघाडीला जबर धक्का बसला आहे.

गोपींचद पडळकरांवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना मोठा विश्वास होतो. तर एमआयएमला पडळकरांचे वावडे होते. याचे इशारेही एमआयएमने दिले होते. खुद्द जलील यांनी आंबेडकरांसोबत आरएसएसमधील लोक असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या पडळकरांकडे बोट दाखवले. त्यानंतर वंचितला गळती लागली आहे.

वंचितसोबत एमआयएमने लोकसभा निवडणूक लढवली होती. राज्यात वंचितने 48 जागा लढवल्या होत्या. त्यात केवळ औरंगाबादमध्ये वंचितचा उमेदवार विजयी झाला. त्यावेळी असुद्दीन ओवेसी यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. मात्र पडळकरांच्या प्रचाराला जाण्याचे टाळले होते. त्यामुळे पडळकर पुन्हा भाजपमध्ये परत जाणार याची कुणकुण एमआयएमला लागली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान लोकसभेला दोन जागांवर पराभव झाल्यामुळे विधानसभेला आंबेडकरांना मुस्लीम मतांवर विश्वास राहिला नाही. तर पडळकरांवर आंबेडकरांचा अति विश्वास होता. आंबेडकरांसोबत आरएसएसचे लोक असल्याचा आरोप करत जागा वाटपाच्या मुद्दावर एमआयएमने वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता पडळकरही भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आंबेडकरांना एमआयएमवर अविश्वास आणि पडळकरांवरचा अतिविश्वास नडला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.