शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

ओवेसींनी लोकसभा निवडणुकीतच घेतला होता, पडळकरांच्या हालचालींचा वेध ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 17:59 IST

प्रकाश आंबेडकरांसोबत आरएसएसचे लोक असल्याचा आरोप करत जागा वाटपाच्या मुद्दावर एमआयएमने वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता पडळकरही भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आंबेडकरांना एमआयएमवर अविश्वास आणि पडळकरांवरचा अतिविश्वास नडला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - दलित, मुस्लीम आणि धनगर समाजाचा एकोपा करून लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या वंचित बहुजन आघाडीने लक्षवेधी मते मिळवली होती. वंचितमुळे आघाडीचे अनेक उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे वंचित विधानसभेला महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढेल अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, एमआयएम आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर सोडून गेल्याने वंचित आघाडीला जबर धक्का बसला आहे.

गोपींचद पडळकरांवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना मोठा विश्वास होतो. तर एमआयएमला पडळकरांचे वावडे होते. याचे इशारेही एमआयएमने दिले होते. खुद्द जलील यांनी आंबेडकरांसोबत आरएसएसमधील लोक असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या पडळकरांकडे बोट दाखवले. त्यानंतर वंचितला गळती लागली आहे.

वंचितसोबत एमआयएमने लोकसभा निवडणूक लढवली होती. राज्यात वंचितने 48 जागा लढवल्या होत्या. त्यात केवळ औरंगाबादमध्ये वंचितचा उमेदवार विजयी झाला. त्यावेळी असुद्दीन ओवेसी यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. मात्र पडळकरांच्या प्रचाराला जाण्याचे टाळले होते. त्यामुळे पडळकर पुन्हा भाजपमध्ये परत जाणार याची कुणकुण एमआयएमला लागली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान लोकसभेला दोन जागांवर पराभव झाल्यामुळे विधानसभेला आंबेडकरांना मुस्लीम मतांवर विश्वास राहिला नाही. तर पडळकरांवर आंबेडकरांचा अति विश्वास होता. आंबेडकरांसोबत आरएसएसचे लोक असल्याचा आरोप करत जागा वाटपाच्या मुद्दावर एमआयएमने वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता पडळकरही भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आंबेडकरांना एमआयएमवर अविश्वास आणि पडळकरांवरचा अतिविश्वास नडला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.