शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

ओवेसींनी लोकसभा निवडणुकीतच घेतला होता, पडळकरांच्या हालचालींचा वेध ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 17:59 IST

प्रकाश आंबेडकरांसोबत आरएसएसचे लोक असल्याचा आरोप करत जागा वाटपाच्या मुद्दावर एमआयएमने वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता पडळकरही भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आंबेडकरांना एमआयएमवर अविश्वास आणि पडळकरांवरचा अतिविश्वास नडला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - दलित, मुस्लीम आणि धनगर समाजाचा एकोपा करून लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या वंचित बहुजन आघाडीने लक्षवेधी मते मिळवली होती. वंचितमुळे आघाडीचे अनेक उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे वंचित विधानसभेला महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढेल अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, एमआयएम आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर सोडून गेल्याने वंचित आघाडीला जबर धक्का बसला आहे.

गोपींचद पडळकरांवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना मोठा विश्वास होतो. तर एमआयएमला पडळकरांचे वावडे होते. याचे इशारेही एमआयएमने दिले होते. खुद्द जलील यांनी आंबेडकरांसोबत आरएसएसमधील लोक असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या पडळकरांकडे बोट दाखवले. त्यानंतर वंचितला गळती लागली आहे.

वंचितसोबत एमआयएमने लोकसभा निवडणूक लढवली होती. राज्यात वंचितने 48 जागा लढवल्या होत्या. त्यात केवळ औरंगाबादमध्ये वंचितचा उमेदवार विजयी झाला. त्यावेळी असुद्दीन ओवेसी यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. मात्र पडळकरांच्या प्रचाराला जाण्याचे टाळले होते. त्यामुळे पडळकर पुन्हा भाजपमध्ये परत जाणार याची कुणकुण एमआयएमला लागली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान लोकसभेला दोन जागांवर पराभव झाल्यामुळे विधानसभेला आंबेडकरांना मुस्लीम मतांवर विश्वास राहिला नाही. तर पडळकरांवर आंबेडकरांचा अति विश्वास होता. आंबेडकरांसोबत आरएसएसचे लोक असल्याचा आरोप करत जागा वाटपाच्या मुद्दावर एमआयएमने वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता पडळकरही भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आंबेडकरांना एमआयएमवर अविश्वास आणि पडळकरांवरचा अतिविश्वास नडला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.