शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

तुम्ही, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याचा इशारा दिला होता? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:37 IST

Devendra Fadnavis on Munde Resignation: धनंजय मु्ंडेंनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबद्दल अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

धनंजय मुंडेंनी मंगळवारी (४ मार्च) राजीनामा दिला. पण, त्यापूर्वीच्या रात्री एक बैठक झाली. याच बैठकीत 'तुम्ही राजीनाम्याचा निर्णय न घेतल्यास, मला तुमची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल', असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंना दिल्याचे म्हटले गेले. याबद्दलच देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी काय उत्तर दिले वाचा...

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संतोष देशमुख यांची हत्या कशा पद्धतीने करण्यात आली, याचे फोटो समोर आले. राज्याभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली, त्याचबरोबर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणीही झाली. त्याच रात्री म्हणजे ३ मार्च रोजी मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाली. 

या बैठकीत काय चर्चा झाली, याबद्दलचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले गेले. 'धनंजय मुंडेंनी राजीनामा न दिल्यास, याबद्दल राज्यपालांना पत्र लिहावं लागेल आणि मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल', असा इशारा फडणवीसांनी या बैठकीत दिला होता, अशी चर्चा आहे. 

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कसा झाला? 

एका मुलाखतीमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, "आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्य वेळी झाला की, चुकीच्या वेळी झाला? या वादात मी जाणार नाही. बघा, राजकारणात तुम्ही पहिल्या दिवशी घ्या, दुसऱ्या दिवशी घ्या किंवा शेवटच्या दिवशीही घेतला, तरी लोक बोलतातच."

"आम्ही खूप स्पष्ट भूमिका आम्ही यामध्ये घेतली की, ज्या प्रकारचे फोटो समोर आले आहेत. ज्या प्रकारे ही हत्या झाली आहे आणि हत्येमध्ये ज्याला मास्टरमाईंड ठरवण्यात आले आहे, तो जर मंत्र्याच्या इतका जवळचा आहे, तर मग मंत्र्यांने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

मुंडेंच्या निर्णयाला विलंब का झाला?

"मला वाटतं की, महायुतीचं राजकारण, कधी कधी निर्णयाला वेळही लागतो. पण, आम्ही ठामपणे भूमिका घेतली आणि त्यांनी राजीनामा दिला", अशी भूमिका फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याला झालेल्या विलंबाबद्दल मांडली.

मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याची धमकी दिली?

मुलाखतकाराने फडणवीसांना प्रश्न केला की, माझ्या प्रश्नाचं आपण उत्तर दिलं नाही. मी आपल्याला विचारलं होतं की, तुम्ही धनंजय मुंडेंना धमकी दिली की, मंत्रिमंडळातून काढून टाकू आणि त्यानंतर हा निर्णय झाला?

या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "बघा, मला जे सांगायचं होतं, ते खूप स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगितलं आहे. त्यापुढे जाऊन काही सांगणं योग्य नाही."

त्यावर त्यांना विचारण्यात आलं की, म्हणजे तुम्ही हे नाकारत नाही आहात? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'या पुढे काही सांगणे योग्य नाहीये.'

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणResignationराजीनामाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र