शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले; सुरेश धस यांनी आतापर्यंतचं सगळेच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 20:30 IST

खंडणीत धनंजय मुंडेचे नाव आहेच, खूनामध्ये मी नाव घेतले नाही. वाल्मीक अण्णाने जे साम्राज्य तयार केले आहे ते मोडले पाहिजे. आका पॅटर्न संपवला पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली. 

मुंबई - धनंजय मुंडे, वाल्मीक कराड नाव असल्याने मी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय घेतला नाही. माझे आणि कराडचे संबंध फार तुटले नव्हते. त्याला हे रोखता आले असते. वाल्मीकमुळे धनंजय मुंडे गेल्या ५ वर्षात बिघडले. वाल्मीकने धनंजय मुंडेंचा पूर्ण विश्वास संपादन केला त्यामुळे वाल्मीक म्हणेल तेच धनंजय मुंडे ऐकायचे. वाल्मीकने धनंजय मुंडेच्या पाठिंब्यानेच हे केले असा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला. 'लोकमत' व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी धस यांची मुलाखत घेतली त्यात ते बोलत होते.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

या मुलाखतीत सुरेश धस म्हणाले की, मी खंडणीत धनंजय मुंडेंचं नाव घेतो, खूनाच्या प्रकरणात नाही. २८ मे २०२४ नंतर १४ जून, १९ जूनला अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. एसआयटीने चौकशी करावी. माझा कुणी जबाब नोंदवला नाही. मला जर एसआयटीची नोटीस आली तर मी चौकशीला जाईन. जो पोलीस अधिकारी निलंबित झालाय तो सहआरोपी झाला पाहिजे. वाल्मीक कराड डायरेक्ट फोन उचलून मारण्याची, तोडण्याची भाषा वापरतात. त्यामुळे मला नक्कीच माहिती होते, कराडचा फोन झाला असेल. आज ते समोर आले आहे असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय सुदर्शन घुले, प्रतिक घुले, आंधळे, विष्णू चाटे ही जी मुले आहेत ती कराडसोबत असतात. त्यामुळे कराडच्या सांगण्याशिवाय संतोष देशमुखला मारलं जाणार नाही हे मला कळले. जी वस्तूस्थिती मी मस्साजोगमध्ये ऐकली. संतोष देशमुखचा पोस्टमोर्टम रिपोर्ट वाचला तर इतकं बेक्कार त्याला मारले आहे. तो कुठल्याही समाजाचा असता तरी मी पाठपुरावा केला. हा जातीवादाचा विषय नाही. अतिशय अमानवीय पद्धतीने झालेल्या खूनाचा विषय आहे. सिव्हिल सर्जन यांनीही त्याची परिस्थिती सांगितली. इतकं डेंजर मृत्यू असू शकत नाही असं काही डॉक्टरांशी मी बोलल्यानंतर कळले. मी विधानसभेत या घटनेची संपूर्ण माहिती मांडली, तेव्हा पोलीस तपास सुरू झाला नव्हता. मी स्वत: सभागृहात या मारहाणीचे व्हिडिओ चित्रिकरण झाल्याचं बोलले. संतोष देशमुख याला ज्या पद्धतीने मारलं ते पाहता आरोपी सराईत असून त्यांना ड्रग्स दिले असावे त्यातून त्यांनी क्रूरपणे मारलेले आहे. मस्साजोगमधील ३० एकर जमीन अवादा कंपनीने भाड्याने घेतली होती. संतोष देशमुख याने गावातील पोरांना मारले म्हणून गेला. अवादा कंपनीचे सुरक्षारक्षक मस्साजोगचे होते. त्यांना खंडणीसाठी आलेल्या गुंडांनी मारले तेव्हा संतोष देशमुखला सरपंच म्हणून बोलावले तेव्हा ६ डिसेंबरला तिथे वाद झाला होता अशी माहिती सुरेश धस यांनी दिली. 

दरम्यान, ५-६ दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याशी फोनवर बोलणे झाले. काय चाललंय विचारलं तेव्हा माझं संतोष देशमुख एके संतोष देशमुख एवढेच चाललंय सांगितले. वाल्मीक कराडची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे. आज जो घटनाक्रम पोलिसांनी कोर्टात सांगितला. ९ डिसेंबरला संतोष देशमुखला धमकीचा फोन वाल्मीकचा आलेला आहे. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मीक कराड यांचं संभाषण पुढे सुरू राहिले हे पोलिसांनी सांगितले आहे. तपासात ते समोर आले आहे. ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आता खंडणीसह १२० ब, मकोका आणि ३०२ या गुन्ह्याखाली वाल्मीक कराड अटकेत आहे. अजून बऱ्याच जणांना मकोका लागायचा आहे. ६ आणि ९ डिसेंबर तारखेपुरते हे प्रकरण मर्यादित नाही. २८ मे २०२४ पासून सगळे तपासावे लागतील. अजूनही बरेच आरोपी बाहेर आहेत असं धस यांनी सांगितले. 

आका पॅटर्न संपला पाहिजे

वाल्मीक कराडची या हत्येच्या खटल्यातून सुटका होणार नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये गेले पाहिजे. वाल्मीक कराडच्या खंडणीच्या लालसेपोटीच ही हत्या झाला. कराड वजीर आहे बाकी त्याचे प्यादे आहेत. या हत्या प्रकरणात मुख्य वाल्मीक कराडच आहे.  वाल्मीक कराड खूप पुढे निघून गेला. धनंजय मुंडे यांचे सगळे मित्र बाजूला गेलेत फक्त वाल्मीक कराडसोबत, ४०० कोटीचा निधी जिल्हा विकास निधीतून वाल्मीकला दिला गेला. आता लोक हळू हळू पुढे येऊन वाल्मीकविरोधात गुन्हे दाखल करायला लागलेत.  डीपीसीसीमध्ये १४ कोटींचे बोगस बिले दिली गेली. बनावट कागदपत्रे वापरून बिल मंजूर करण्यात आली. खंडणीत धनंजय मुंडेचे नाव आहेच, खूनामध्ये मी नाव घेतले नाही. वाल्मीक अण्णाने जे साम्राज्य तयार केले आहे ते मोडले पाहिजे. आका पॅटर्न संपवला पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली. 

 ...म्हणून पंकजा मुंडेंसोबत दुरावा

गोपीनाथ मुंडे राजकारणातील चतुस्त्र व्यक्ती होते. ते सामान्यातून नेते झाले. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे ठराविक कार्यकर्ते आणि सोशल मिडिया इतक्या पुरतेच नेते राहिलेत. पंकजा मुंडे लोकसभेपासून दूर गेल्या. मी आदरणाने पंकुताई म्हटलं ते काहींना पटत नाही. विधानसभेला माझ्याविरोधात पंकजा मुंडेंनी अपक्ष उमेदवार उभा केला. धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचा उमेदवार उभा केला नाही. मराठा समाजाची मते फुटली पाहिजेत त्यासाठी काहींना उभे केले. पंकजा मुंडेंनी आमचे बुथ उघड्या डोळ्यांनी पाहावे. पंकजा मुंडेंना मानणाऱ्या बुथमध्ये २००  मते मला आणि अपक्ष उमेदवाराला ९०० मते गेली असं सांगत पंकजा मुंडे यांच्यासोबत दुरावा का झाला यावर सुरेश धस यांनी भाष्य केले. 

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण