शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

'फोडा-फोडीचे मंत्रालय स्थापन करून गिरीश महाजनांकडे त्याचा कारभार द्यावा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 11:20 AM

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक मंत्र्यांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, आज ६ मंत्री यांना वगळले, मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व दीड डझन मंत्री यांना काढायला हवे होते, असंही मुंडे म्हणाले.

मुंबई - प्रशासकीय आणि पोलीस बळाच्या जोरावर दबाव टाकणे आणि फोडाफोडी करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. फोडा-फोडीचे नवे खाते काढुन गिरीश महाजन यांना त्याचे मंत्री करावे, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक मंत्र्यांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, आज ६ मंत्री यांना वगळले, मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व दीड डझन मंत्री यांना काढायला हवे होते, असंही मुंडे म्हणाले.

गिरीश महाजन यांची भाजपमध्ये तारणहार म्हणून ओळख आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी महाजन नेहमीच प्रयत्नशील असतात. तोच धागा पकडच धनंजय मुंडे यांनी महाजन यांना टोला लागवला. मुख्यमंत्र्यांनी फोडा-फोडीचे मंत्रालय स्थापन करून त्याचा कारभार महाजन यांच्याकडे द्यावा, असं मुंडे यांनी म्हटले.

यावेळी मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. सत्तेत येण्यापूर्वी फडणवीस यांनी अनेक आश्वसने दिली होती. त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ आहे. या सरकारच्या काळात केवळ आभासी विकास झाल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी वातानुकूलीत खोलीत बसून दुष्काळाचा आढावा घेतला. तर सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना परदेश दौरा केल्यानंतर दुष्काळ आठवला. राज्यात दुष्काळ असून शेतकऱ्यांना कर्जाच्या अडचणी येत आहे. सरकारने केलेली कर्जमाफी पूर्णपणे फसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.