शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडे बरसले; "फक्त सनसनाटी निर्माण करून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:25 IST

माझं चॅलेंज आहे अंजली दमानियांनी बदनामिया करण्यापलीकडे एकतरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात, देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

मुंबई - माझ्यावर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाचं मी खंडन करतो. त्यांनी केलेले आरोप पूर्णत: खोटे आहेत. त्यांनी आत्मचिंतन करायला हवं. आजपर्यंत दमानिया यांनी केलेल्या आरोपांचे पुढे काय झाले ते त्यांनी पाहावे. केवळ स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यापलीकडे यात काही नाही. ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला ती संपूर्ण प्रक्रिया शासकीय नियम आणि धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आली आहे. मागील ५० दिवस त्या वेगवेगळ्या आरोप करतायेत. दुसऱ्याला बदनाम करणे, स्वत:ची प्रसिद्धी यासाठी केलेले हे आरोप आहेत असा पलटवार मंत्री धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केला. 

पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी दमानियांनी केलेले आरोप खोडून काढले. धनंजय मुंडे म्हणाले की, डीबीटी कोणत्या गोष्टी समाविष्ट करायच्या आणि वगळायचा अधिकार कृषीमंत्री, मुख्यमंत्री यांचे असतात. या निविदा प्रक्रियेतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मान्यतेने प्रक्रिया अंतिम केली आहे. अंजली दमानिया शेतकरी आहेत की नाही माहिती नाही. पेरणी आणि त्यानंतरच्या कार्यासाठी लागणाऱ्या बाबी मान्सूनपूर्व तयारी करून ठेवाव्या लागतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, जून महिन्यातील पेरणी हंगाम लक्षात घेता सदर प्रक्रिया मार्च महिन्यात केली असं त्यांनी सांगितले.

तसेच नॅनोच्या खताच्या किंमती देशभरात एकच आहे. त्यापेक्षा कमी दरात इथं खरेदी केली गेली. नॅनोमुळे शेतीच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते. त्यात कुठलाही खोटेपणा, भ्रष्टाचार झाला नाही. मला बदनाम करण्याचं काम केले जातेय. जी निविदा प्रक्रिया राबवली ती पूर्वमान्यतेने राबवली गेली. जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावं यासाठी निविदा प्रक्रियेला २ वेळा मुदतवाढ दिली. स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी यासाठी हे केले. नॅनो खताच्या किंमती देशभरात एकच असल्याने यात तफावत असणे म्हणणं हे फसवणुकीसारखं आहे. अंजली दमानिया यांच्या आरोपांवर आता विश्वासर्हता राहिली नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत दमानिया यांना ठरवून सरकारने करायची? त्यांनी ठरवलेली किंमत आणि खरेदी यात तफावत आढळली तर भ्रष्टाचार असं म्हणायचं का असा सवाल धनंजय मुंडे यांनी अंजली दमानियांना विचारला.

दरम्यान, आज ५९ वा दिवस आहे. मीडियात फक्त मी आणि मी आहे. त्यात अंजली दमानिया यांनी बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न केले. बीड जिल्ह्याला बदनाम केले, जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले. एवढेच नाही तर मला त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झालाय म्हणणं हा खोटेरडापणा समोर आला. माझं चॅलेंज आहे अंजली दमानियांनी बदनामिया करण्यापलीकडे एकतरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात, देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

पुन्हा राजकारणात यायचं असेल तर...

अंजली दमानियांना बहुतेक पुन्हा राजकारणात यायचं असेल, त्यासाठी न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी ते अशाप्रकारचे आरोप करतायेत. खोटे धादांत आरोप करू नका. आम्ही शांत बसलो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, आमच्याकडे काहीच नाही असं समजू नका. मीडियात यायचं, स्वत:चा प्रभाव निर्माण करणे अवघड नाही. बीड जिल्ह्यात अतिसंवेदनशील घटना घडलीय. त्या घटनेतील दोषींना फासावर लटकवणे ही आमची जबाबदारी आहे. अंजली दमानियांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचं काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना आणि अंजलीताईंना माझ्या शुभेच्छा आहेत असा खोचक टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेanjali damaniaअंजली दमानिया