शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

धम्मचक्र प्रवर्तन : आधुनिक काळातील शस्त्रहीन क्रांती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:26 IST

विजयादशमीनिमित्त आज नागपूरच्या दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न होत आहे. त्यानिमित्त एका वैचारिक परिवर्तनाचे हे शब्दचित्र !

डॉ. प्रदीप आगलावेसदस्य सचिव, डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील एक महान विचारवंत आणि क्रांतिकारी नेते होते. ते आधुनिक भारताचे शिल्पकार. त्यांचे क्रांतिकारी विचार आणि चळवळीमुळे शतकानुशतके गुलामीच्या निद्रेत असलेल्या समाजगटाने शेकडो वर्षाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक शृंखला तोडल्या. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे १४  ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांनी बौद्ध धम्माचे थांबलेले चक्र पुन्हा गतिमान केले आणि भारतात ‘बुद्धमं शरणं गच्छामि!’चा मधुर स्वर निनादला. दीक्षाभूमी ही या देशातील आणि जगभरातील करोडो लोकांची प्रेरणाभूमी ठरली. 

१७७९च्या फ्रेंच आणि १९१७च्या रशियन क्रांतीमुळे त्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रचंड परिवर्तन झाले. आधुनिक काळातील या दोन क्रांती महत्त्वपूर्ण मानल्या जातात, तर भारतात डॉ. आंबेडकरांनी मानवी अधिकारापासून वंचित आठ  लाख अस्पृश्यांची हिंदूंच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गुलामीतून मुक्त केले.  ही जगातील  एक महान क्रांती आहे. ती हिंसेच्या बळावर नाही तर वैचारिक परिवर्तनाच्या आधारे झाली. ही शस्त्रविरहित क्रांती होती. कोणत्याही प्रकारचा रक्तपात न होता एवढी मोठी क्रांती झाली. शोषणाचे बळी ठरलेल्या अस्पृश्यांना  ‘माणूस’ म्हणून जगण्यासाठी बाबासाहेब यांनी बुद्ध धम्म दिला. बुद्ध धम्माचा स्वीकार ही त्यांच्या जीवनातील अत्यंत  क्रांतिकारी घटना ठरली. 

बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर धर्मांतरित बौद्धांना आपल्या उत्थानाचा आणि विकासाचा मार्ग मिळाला. कालचा अस्पृश्य समाज बौद्ध म्हणून  बुद्ध धम्माच्या मार्गाने वाटचाल करू लागला. बुद्ध धम्मामुळे बौद्धांना  नवीन विचारसरणी मिळाली. ही विचारसरणी त्यांच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी होती. कालपर्यंत हिंदू धर्मग्रंथाच्या आदेशानुसार निमुटपणे वागणारा हा अस्पृश्य  समाज  विवेकबुद्धीने विचार करून पाऊल टाकू लागला. बुद्ध धम्माच्या स्वीकारानंतर धर्मांतरित बौद्ध समाजात प्रचंड वैचारिक परिवर्तन घडून आले. कोणत्याही परिवर्तनाचा आरंभ हा विचारातून होत असतो. आता बौद्ध समाज विचारपूर्वक कृती करू लागला. समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात हे परिवर्तन घडून आले. 

बुद्ध धम्म हा निरीश्वरवादी आहे. म्हणून धर्मांतरित बौद्धांनी देव, ईश्वर ही संकल्पना नाकारली.  देव, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक या धार्मिक गोष्टींच्या माध्यमातून आपले मानसिक, सामाजिक शोषण झाले आहे हे लक्षात घेऊन बौद्ध लोकांनी जाणीवपूर्वक या सर्व परंपरागत धार्मिक संस्कारांना आपल्या जीवनातून हद्दपार  केले. कोणताही देव आपले भविष्य  घडवू शकत नाही तर आपल्यालाच आपले उज्ज्वल भविष्य घडवायचे आहे. असा विचार  करून ते नव्या दिशेने मार्गस्थ झाले. बुद्ध धम्म हा माणुसकीचा धम्म. त्यात प्रकारची विषमता नाही. बुद्ध धम्मानुसार आचरण केल्यास आपण आपली आणि राष्ट्राची प्रगती करू शकतो, असा विश्वास निर्माण झाल्याने धर्मांतरित बौद्धांनी आपली पारंपरिक सांस्कृतिक व्यवस्था नाकारली आणि बुद्ध धम्मावर आधारित आपले नवे सांस्कृतिक विश्व निर्माण केले. 

परंपरागत धर्मव्यवस्थेने व्यक्तीचे विचारस्वातंत्र्य नाकारल्यामुळे  वर्षानुवर्षे भारतीय समाजात वैचारिक परिवर्तन होऊ शकले नाही. धर्मांतरित बौद्धांनी  वैचारिक गुलामीतून स्वत:ची मुक्तता करून घेतली. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला.  शिक्षणाशिवाय आपले अस्तित्व नाही याची जाणीव झाली. शिक्षण हाच विकासाचा मार्ग आहे, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून शेकडो वर्षांपासून शिक्षणापासून वंचित असलेला समाज आपली शैक्षणिक भूक भागविण्यासाठी शिक्षणाकडे वळला. बौद्धांनी आपल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकविले. धर्मांतरित बौद्धांमध्ये शैक्षणिक क्रांती झाली. इतर धर्माच्या तुलनेत बौद्धांमध्ये शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे. २०११ च्या जनगणनेनुसार बौद्ध समाजात शिक्षणाचे प्रमाण ८१.२९ टक्के होते.  बौद्धांचा  शैक्षणिक विकास  हा धम्मक्रांतीचा परिणाम होय.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhamma Chakra Pravartan: A Bloodless Revolution in Modern Times

Web Summary : Dr. Ambedkar's conversion to Buddhism in 1956 sparked a socio-cultural revolution, liberating millions from oppression. This bloodless transformation empowered the marginalized, fostering education, equality, and a new cultural identity based on Buddhist principles, marking a significant shift in Indian society.
टॅग्स :nagpurनागपूर