शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र म्हणती येतो, तात्याबाळे म्हणती पळतो

By admin | Updated: February 26, 2015 02:12 IST

अगं बाबो, काय करावं या परधानाला ना त्येला आवतन, ना बिवतन पन सोताच कसा म्हंतो, येऊ का, येऊ का? नगं बाबा येवू तू

हेमंत कुलकर्णी, नाशिकबया बया माझ्या गावी, आज परधान आलापरधान कशी म्हणू, राजा तोच रयतेला।।अशा डौलडांगोऱ्यात, त्येची झाली गावफेरीअसा दादला देरे द्येवा, मनी म्हणतात पोरी।।-कुसुमाग्रजअगं बाबो, काय करावं या परधानाला ना त्येला आवतन, ना बिवतन पन सोताच कसा म्हंतो, येऊ का, येऊ का?नगं बाबा येवू तू ,पाहत्यात ना शरदबाबू -कुसुमाग्रजांची स्वयंघोषित बाळे शुक्रवारी कविश्रेष्ठ कुसमाग्रजांचा जन्मदिन, म्हणूनच राजभाषा दिन आणि म्हणूनच यंदा जनस्थान साहित्य पुरस्कार वितरण दिन. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अनिवासी नाशिककर अध्यक्ष (ही परंपरा अखंडित सुरू आहे़) मधु मंगेश कर्णिक यांच्या हातांनी अरुण साधू यांना जनस्थानाची बाहुली द्यायची आणि कार्यक्रम उरकून घ्यायचा, हा तूर्तास प्रतिष्ठानात मांड ठोकून बसलेल्या आणि कुसुमाग्रजांशी वा त्यांच्या साहित्याशी दूरान्वयानेही संबंध न आलेल्या वा त्यांनीच तो कटाक्षाने येऊ न दिलेल्या कारभाऱ्यांचा मानस. तात्यांनी स्वत:च जनस्थान आणि गोदावरी गौरव या दोन आडसाली पुरस्कार योजना आखून दिलेल्या असल्याने व कुसुमाग्रज स्मारकात संध्याकालीन शीत हवा खाण्याची सोय अबाधित राखायची असल्याने पुरस्कारांचे लोढणे ओढत राहण्याखेरीज कारभाऱ्यांना गत्यंतर नाही. त्यामुळं पटापटा आवरून मोकळे होऊन घ्या, हा त्यांचा व्यावहारिक विचार. पण कसचं काय, यंदा मोठी गडबडच झाली. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून डायरेक्ट फोन. कार्यक्रम कोणत्या वेळी आहे, (सायंकाळी सहा म्हणजे सहानंतर कधीही) शीएमसाहेबांना यायचं आहे, जरा वेळ अ‍ॅडजस्ट करता येईल तर बघा. साऱ्या कारभाऱ्यांचे हात कपाळाला. ह्ये काय आता नवंच! अशी काही परंपरा नाय! आम्ही गावभर निमंत्रणं पाठवली, तसं एक मंत्रालयातही पाठवलं. परवाच्या शनिवारी शीएम नाशकात आले, तेव्हा काही लुभ्य्रांनी मधी तोंड घातलं म्हणून टाकणं टाकल्यागत एक पत्र देऊन टाकलं. एरव्ही नाही का, एखाद्यानं येऊ नये असं वाटत असतं, त्याला ऐन वक्ताला आवतन द्यायचं म्हंजे तो यायला नको आणि आपल्यावर बोल नको, तसंच काहीसं. आता आपण टाकलेलं टाकणं हा गडी इतकं मनाला लावून घेईल याची काय कल्पना हो? तिकडं मंत्रालयातही असंच काहीसं झालं असणार. सांस्कृतिक कार्यक्रमांना हल्ली विनोद तावडे भसाभसा जात असतात, तेव्हां मुख्यमंत्र्यांनीही अधूनमधून गेलं पाहिजे, असा सल्ला कोणीतरी दिला असणार. त्यातून तात्यासाहेब ठाऊक नसले तरी उगाच त्यांचं नाव कुणी घेतलं की दोन्ही हातांनी कानाच्या पाळ्या पकडायच्या. मागे मनोहरराव जोशी नाही, वीस वेळा येऊन गेल्यानंतर एकविसाव्या वेळी आल्यावर योगायोगानं तात्यांना भेटले, पण जाहीर भाषणात म्हणाले, नाशकात येऊन तात्यांचं दर्शन घेतल्याखेरीज नाशकातून पायच बाहेर निघत नाही! सांगायचा मुद्दा फडणवीसांना कुणीतरी भरीस घातलं. मुख्यमंत्री वा कोणीही तत्सम व्यक्ती पायी चालली तरी फटके खाणार आणि घोड्यावरून चालली तरी फटके खाणार. तात्यांच्या कार्यक्रमाला फडणवीस आले नाहीत? हेच का त्यांचे साहित्यप्रेम आणि हाच का त्यांना मराठीचा अभिमान? नकोच ते. नाशकात जाऊनच येऊ. यजमान मात्र कपाळाला हात लावून बसलेले. पाव्हण्याला कसं सांगावं, की बाबा, नको भलत्या फंदात पडू. त्यांचे हात कपाळाला असतानाच ज्यांची बैठक टिळक भवनात आणि उठबैस बारामतीत असते असे एक साहित्यप्रेमी राजकारणी (अस्तंगत होत चाललेली जमात नाही?) तिथे अवतरले. म्हणाले, अरे येड्यांनो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे रयतेचा राजा, तो स्वत:हून येतो म्हणतो आहे ना, मग नाट का लावता? ‘पण पत्रिका तर छापून आणि वाटूनही झाल्या’, एक कारभारी कळवळला. उठबैसवाल्याने सांगितले, नव्या छापा, नव्याने वाटा, नाही तर राहू द्या, लोकाना कळेलच की. पण आता नाट नको. इतके झाल्यावर बहुधा सारे रडतराऊ घोड्यावर स्वार झाले. कुसुमाग्रजांनी ‘राजा आला’ ही कविता प्रसवली, तेव्हां पंतप्रधान राजीव गांधी यांचा झालेला नाशिक दौरा त्यांच्या नजरेसमोर होता, असे म्हणतात. या कवितेचा एकूणच भाव (एकूण कडवी १७) तसा गोड नव्हे, तो कडवटच. पण कवितेच्या बाहेरील आणि विशेषत: पुरस्कार वितरण समारंभांच्या आयोजनामागील मुख्य प्रेरक तात्यासाहेब शिरवाडकर वेगळेच होते. प्रतिष्ठानचा असा प्रत्येक कार्यक्रम जुन्या जमान्यातील पाचअंकी संगीत नाटकांसारखा ऐसपैस तर असलाच पाहिजे़ पण तो चित्तचक्षुचमत्कारिकही असला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असे. त्यापायीच की काय कोण जाणे, कार्यक्रमात एखादा व्हीव्हीआयपी असावा़ त्याच्या मागेपुढे कार्बाइनधारींचे कोंडाळे असावे, याची त्यांना आवड होती. त्यामुळे कार्यक्रमाला भारदस्तपणा येतो, अशी काहीतरी त्यांची भावना असावी. मतलब, मुख्यमंत्री आपणहून येत आहेत म्हटल्यावर त्यांनी जातीने लक्ष घालून प्रत्येक व्यवस्थेच्या चोखपणाची खातरजमा करून घेतली असती. पण आपली बाळं आपल्यासारखी कर्तबगार निघत नाहीत, हे साऱ्याच बापांच शल्य असतं, तेव्हां त्याला तात्यांचा तरी अपवाद का असावा?