शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस : त्यागाचे काय होईल?

By यदू जोशी | Updated: March 30, 2024 11:07 IST

सारा महाराष्ट्र आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे समजत असताना स्वत: फडणवीस यांनीच राजभवनवर घोषणा केली की, शिंदे मुख्यमंत्री होतील आणि ते स्वत: मंत्रिमंडळात नसतील. सारेच अवाक् झाले.

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. रा. स्व. संघाचा स्वयंसेवक, अ. भा. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, भाजपचा नगरसेवक, महापौर, भाजयुमोचा प्रदेशाध्यक्ष, आमदार, मुख्यमंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री असा वयाच्या ५२ वर्षांपर्यंतचा विलक्षण प्रवास. २०२२ मध्ये राज्यात उद्धव ठाकरे सरकार पडले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीला शह देत महायुती सत्तेत आली. त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत चमत्कार घडवला तो देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीने. त्यातून मग सुरत, गुवाहाटीचा प्रवास घडला.

सारा महाराष्ट्र आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे समजत असताना स्वत: फडणवीस यांनीच राजभवनवर घोषणा केली की, शिंदे मुख्यमंत्री होतील आणि ते स्वत: मंत्रिमंडळात नसतील. सारेच अवाक् झाले. क्लायमॅक्स बाकी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना फोन केला, ‘मंत्रिमंडळात न जाण्याचा निर्णय तुम्ही नेता म्हणून घेतला आहे पण मी आज तुमचा नेता म्हणून तुम्हाला आदेश देतोय की, तुम्ही मंत्रिमंडळात राहिलेच पाहिजे.’ फडणवीस ‘सागर’ बंगल्यातील एका खोलीत मोदींशी बोलून बाहेर आले अन् त्यांनी काहीच वेळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जुलै २०२३ मध्ये आणखी एक चमत्कार घडला. राष्ट्रवादी फुटली; अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री झाले. लोकसभेचे गणित बसविण्यासाठी दोन मित्र जोडण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करताना फडणवीस यांनी दरवेळी त्याग केला. 

अत्यंत अभ्यासू, प्रचंड आवाका असलेले फडणवीस यांच्यातील चाणाक्ष राजकीय नेत्याचे नवे दर्शन शरद पवार यांच्यासह सर्वांनाच गेल्या काही वर्षांत झाले. पण पक्षासाठी सगळे काही करताना त्यांच्या पदाचा संकोच होत गेला. त्याबाबतच्या अनेक थिअरी अनेकांनी दिल्या. मात्र, त्यासंबंधीची कोणतीही अस्वस्थता कधीही चेहऱ्यावर येऊ न देता ते काम करत राहिले. स्वत:विषयी ते अबोल आहेत. त्यांच्या मनातील खंत, व्यथा, दु:ख कधीही बाहेर येत नाही; अगदी जवळच्यांपाशीसुद्धा. ते चालत राहतात, कामे करत राहतात, अभ्यास करत राहतात आणि अविचल पक्षनिष्ठेच्या मार्गावर पुढे जात राहतात.

या हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला समजू द्यायची नसते म्हणतात. फडणवीस त्यांच्या पुढे आहेत. ज्या हाताने लोकांना मदत केली त्या हातालाही ते कळू देत नाहीत. छटाकभर मदतीचा बभ्रा करणारे अनेक नेते आहेत. पण फडणवीस विरळेच. श्रेयवादाच्या लढाईतही ते पडत नाहीत. स्वत:चे नेतृत्व जातीपातींच्या संदर्भांपलीकडे त्यांनी कधीच नेऊन ठेवले आहे. २०१४ पासूनचे महाराष्ट्राचे राजकारण फडणवीसांभोवती फिरत आहे. ‘यू कॅन लव्ह हिम ऑर यू कॅन हेट हिम बट यू कान्ट इग्नोर हिम...’ फडणवीसांबाबत हे वाक्य चपखल बसते. पक्षात काही नेत्यांविषयी त्यांचा दुरावा निर्माण झाला; ते बहुभानी फडणवीसांना टाळता आले असते, असे बरेचदा वाटते. 

फडणवीस दोन मित्रांना सोबत घेऊन लोकसभेच्या लढाईवर निघाले आहेत. ज्या विदर्भातून येतात, त्याचा अनुशेष आजही बाकी आहे. सत्तेच्या समीकरणात फडणवीसांचा पदाचा अनुशेष वाढत चालला आहे. त्यागाचा सव्याज परतावा त्यांना मिळावा, ही भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ती त्यांचे श्रेष्ठी पूर्ण करतील का? या प्रश्नाचे उत्तर काळ देईलच. तोवर फडणवीस यांच्या संयमाचा कस लागेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४