शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंमध्ये हितगुज अन् सुधीर मुनगंटीवारांची ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 07:16 IST

दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन बड्या नेत्यांमधून विस्तव जात नाही, असे चित्र गेले कित्येक महिने असताना आज अचानक दोघांच्या भेटीचा योग जुळून आला. दोघांनी हितगुजही साधले. त्यातच विधान परिषदेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजूनही काही बिघडलेले नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा झाड (युतीचे) वाढविण्याचा विचार शांततेत करा, या शब्दात उद्धव यांना साद घातली. त्यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नसली तरी दोन्ही प्रसंगांनी कटूतेचे गडद रंग फिके झाल्याचे जाणवले. 

विधान परिषदेचे सदस्य असलेले उद्धव ठाकरे सकाळी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर गाडीतून उतरले. त्यांचे काही आमदार त्यांना घ्यायला आले होते. त्यांच्याशी ते बोलत असतानाच फडणवीसांचा ताफा आला. ते गाडीतून उतरले तर समोर उद्धव. दोघांनी स्मित हास्य केले. नमस्कार झाला आणि बोलले देखील.

‘बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी’आठ महिन्यांपासून दोघांमध्ये साधी भेटही होऊ शकली नव्हती. पण, आजच्या भेटीत सहजता होती; कटूतेचा लवलेशही नव्हता. दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा आमच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका. पूर्वी खुलेपणा होता. पण, हल्ली बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरते, असे म्हटले.

परिषदेत झाड, खत, फळे आणि हास्यकल्लोळ विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत उद्धव ठाकरे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील टोले - प्रतिटोल्यांनी खसखस पिकविली. ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या उद्घाटनाला शरद पवार आले होते. आपणही होते. पवार साहेबांनी झाड लावले, असे मुनगंटीवार म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरेंनी ‘पण त्या झाडाला फळेच लागली  नाहीत’ असा टोला लगावला. त्यावर मुनगंटीवार म्हणाले - ‘उद्धवजी, मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो, की झाडाला फळे येतील. पण, तुम्ही झाडाशीच नाते तोडले. आता त्याला काय करणार? मी व्यक्तिगत येऊन सांगायचो की उद्धवजी, या झाडाला कोणते खत पाहिजे. तुम्ही ते खत न देता दुसरेच खत दिले. त्या झाडाला फळे कशी येतील? मी एकदा नाही, तीनदा विनंती केली होती’. यावर ठाकरे यांनी “त्या पाकिटात खत नव्हते, निरमा होते” असा टोला लगावला. तेव्हा मुनगंटीवार म्हणाले, खतच होते. पण ते निरमा पाकिटात आल्यामुळे तुमचा गैरसमज झाला आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसरं होतं ते झाड  जाळणारे होते, ते टाकले. अजूनही काही बिघडलेले नाही. उद्धवजी, ‘पुन्हा एकदा शांततेत विचार करा झाड वाढवण्याचा’, असे आवाहन मुनगंटीवार यांनी करताच पुन्हा हंशा पिकला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVidhan Parishadविधान परिषद