शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महाराष्ट्राला मुर्ख बनविण्याचा 'हा' नवा उद्योग; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 5:42 PM

सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन तर हवेतच विरले

नंदूरबार - विश्वासघाताने तयार झालेल्या या सरकारने पहिला विश्वासघात अवकाळी पावसाने त्रस्त शेतकर्‍यांचा केला. त्यांना मदत दिली नाही. दुसरा विश्वासघात कर्जमाफीतून त्यांना वगळून केला आणि आता 10 रूपयांत भोजन देण्याचे सांगून त्यालाही अटी लावल्या. महाराष्ट्राला मुर्ख बनविण्याचा हा नवा उद्योग आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. 

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन तर हवेतच विरले. आता 10 रूपयांत किती लोकांना भोजन याचे जिल्हाश: आकडेच दिले जात आहेत. संपूर्ण नंदूरबार जिल्हा मिळून केवळ 300 लोकांना हे जेवण मिळू शकेल असा आरोप त्यांनी केला. 

तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी अनन्वित अत्याचार सहन केले. दोनवेळा जन्मठेप भोगणारे ते एकमेव स्वातंत्र्यसेनानी. ज्या कुटुंबाने राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांचा अपमान शिवसेना कितीवेळा सहन करणार, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नंदूरबार जिल्ह्यांमधील सभांमध्ये बोलताना उपस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी अवमानजनक उदगार काढल्यानंतर शिवसेना गप्प होती. काल काँग्रेस पक्षाने एक पुस्तक वितरित केले. ज्या वीर सावरकरांनी देशासाठी संपूर्ण जीवन दिले, त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या दर्जाचे लिखाण त्यात करण्यात आले आहे. ते समलैंगिक होते, असे हे विकृत लिखाण आहे. यावर आम्ही गप्प बसणार नाही. इतक्या खालच्या दर्जाचे लिखाण करीत असाल, तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला. 

दरम्यान, वीर सावरकरांचा हा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. वीर सावरकर हे या देशाचे आराध्य आहेत. शिवसेना सत्तेसाठी मूग गिळून बसली असली तरी आता त्यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल. अशांचा नायनाट आता भारताची जनता केल्याशिवाय राहणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. धुळे जिल्ह्यात रवाना होण्यापूर्वी नंदूरबार जिल्ह्यात आज धडगाव आणि बोरद येथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी दोन सभांना त्यांनी संबोधित केले. गरिब आणि आदिवासींसाठी गेल्या 5 वर्षांच्या काळात सरकारच्या वतीने केलेल्या कामांची माहिती यावेळी त्यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार