शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: 'ठाकरे सरकारमध्ये अजितदादा सर्वात फायद्यात!', असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 19:07 IST

राज्यातील गुन्हेगारी, बेरोजगारी, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि पोलीस दलातील बदल्यांचं रॅकेट अशा विविध मुद्द्यांवरुन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील आजच्या भाषणात सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.

मुंबई-

राज्यातील गुन्हेगारी, बेरोजगारी, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि पोलीस दलातील बदल्यांचं रॅकेट अशा विविध मुद्द्यांवरुन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील आजच्या भाषणात सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. महाराष्ट्र राज्य आज गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची आकडेवारी सादर करत फडणवीसांनी राज्याचं गृहखातं झोपा काढत असल्याचा आरोप केला. गुन्ह्यांचं प्रमाण अधिक असलं तरी दोषसिद्ध करण्याचं प्रमाण देखील कमी असल्याचा मुद्द्यावर फडणवीसांना यावेळी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात दोषसिद्ध होण्याचं प्रमाण बिहारपेक्षाही कमी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. 

ठाकरे सरकारवर चौफेर हल्लाबोल करत असताना फडणवीसांनी आपल्या भाषणात निधी वाटपावरही भाष्य केलं. यात ठाकरे सरकारमध्ये अजित पवार सर्वात फायद्यात असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं पाहायला मिळालं. 

नेमकं काय घडलं?फडणवीस आपलं म्हणणं मांडत असताना त्यांनी निधी वाटपावरुन शिवसेनेला खोचक टोला लगावताना राष्ट्रवादीला कसा सर्वाधिक निधी मिळाला याची आकडेवारी मांडली. "सरकारमध्ये अजितदादा तुम्ही सर्वात फायद्यात आहात असं माझ्या लक्षात आलं आहे. कारण जो निधी वाटप झाला त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अखत्यारितील खात्यांना सर्वाधिक निधी मिळाला. हा आकडा २ लाख ५० हजार ३८८ कोटी इतका आहे. काँग्रेसवाले पण हुशार निघाले. रोज तक्रार करुन करुन त्यांनी १ लाख १ हाजर ७६६ कोटी रुपये निधी प्राप्त केला. पण शिवसेनेवाले हातवर करुन फसले. सर्वात जास्त आमदार असूनही केवळ ५४ हजार ३४३ कोटी निधी मिळाला", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

अमरावती, नांदेडमध्ये दंगलीचा 'प्रयोग' अमरावती आणि नांदेडमध्ये झालेल्या दंगली हा राज्यात दंगल घडवली जाऊ शकते यासाठीचा प्रयोग होता, असा खळबळजनक दावा यावेळी फडणवीसांनी केला. एका रात्रीत चाळीस-चाळीस हजाराचा जमाव रस्त्यावर येतोच कसा? या मोर्चाच्या माध्यमातून दंगल घडवली जाऊ शकते असा प्रयोग राज्यात केला गेला आहे. यात जाणीवपूर्वक हिंदूंच्या दुकांना लक्ष्य केलं गेले. हिंदुच्याच दुकानांची तोडफोड केली गेली, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ज्यादिवशी अमरावतीत संबंधित प्रकार घडला त्यादिवशीच्या घटनेबाबत कुणी बोलायला मागत नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याचे परिणाम उमटले त्यावरच सगळे बोलू लागले आणि त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे हे अतिशय दुर्दैवी असल्याचं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार