शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'मी पुन्हा येईन'चा अर्थ; शरद पवारांना दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 18:47 IST

'मी पुन्हा येईन' मागची भूमिका स्पष्ट करत आता देवेंद्र यांनी पवारांची टीका खोडून काढली आहे.

ठळक मुद्दे'मी पुन्हा येईन' मधला 'मी' देवेंद्र फडणवीसांना भारी पडला, असं अनेकांचं मत आहे.देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेला 'मी'पणाचा दर्प जनतेला सहन झाला नाही, असं शरद पवार म्हणाले होते.मी पुन्हा येईन ते लोकांची सेवा करण्यासाठी असंच मी म्हटलं होतं - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दोन गोष्टींची सगळ्यात जास्त चर्चा झाली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची 'मी पुन्हा येईन' ही कविता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भर पावसात केलेलं भाषण. त्या भाषणामुळे शरद पवारांनी मनं आणि मतं जिंकली, तर 'मी पुन्हा येईन' मधला 'मी' देवेंद्र फडणवीसांना भारी पडला, असं अनेकांचं मत आहे. अलीकडेच, पवारांनीही त्या 'मी'पणावरून फडणवीसांचे कान खेचले होते. मात्र, 'मी पुन्हा येईन' मागची भूमिका स्पष्ट करत आता देवेंद्र यांनी पवारांची टीका खोडून काढली आहे.    

'मी म्हणजेच महाराष्ट्र. मी म्हणेन तो महाराष्ट्र. माझ्या आसपास कुणीच नाही... हा देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेला 'मी'पणाचा दर्प जनतेला सहन झाला नाही आणि त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली,' अशी टिप्पणी शरद पवार यांनी 'एबीपी माझा'च्या मुलाखतीत केली होती. त्याला अत्यंत सविस्तर असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी आज 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत दिलं.   देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राजकारणात मला माझ्या क्षमता आणि मर्यादा माहीत आहेत. सत्ता कधीच माझ्या डोक्यात गेली नाही, जाऊ शकत नाही. ज्या दिवशी सत्तेवर आलो तेव्हा एकच गोष्ट सांगितली होती की, माझ्याकडे गमावण्यासारखं काही नाही. चांगलं काम करून नाव कमावणं हेच ध्येय होतं. मी काही फार मोठा माणूस नाही.'

'मी पुन्हा येईन' या वाक्यावरून बरीच टीका झाली. परंतु, ती एक साधी कविता होती. अनेकांना ती फार आवडली. आठ भाषांमध्ये तिचं भाषांतर झालं. ती व्हायरल झाली. त्यात गर्वाचा दर्प नव्हता. मी पुन्हा येईन ते लोकांची सेवा करण्यासाठी असंच मी म्हटलं होतं. पाच वर्षं त्या पदावर बसूनही मी कधी राजा झालो नाही, सेवक राहिलो. सुट्टी घेतली नाही, कुटुंबाला वेळ दिला नाही. जे काम सोपवलं होतं, ते करायाचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याबद्दल मला समाधान वाटतं, गर्व वगैरे विषयच नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.   मी कधीही स्वतःच्या नावावर मतं मागितली नाहीत. आमचे नेते नरेंद्र मोदी हेच आहेत. कामाकडे बघून मतदान करा असंच सांगितलं. म्हणूनच जनतेनं आम्हाला मतं दिली. १९९० नंतर कुठल्याही एका पक्षाला १०० च्या वर जागा मिळवता आल्या नाहीत. पण, भाजपानं सलग दोन निवडणुकीत मिळवल्या. भाजपा हरलाय असं चित्र निर्माण केलं जातंय. पण, जनतेच्या मनात आम्हीच होतो. लोकांनी ज्यांना नाकारलं ते एकत्र आल्यानं आम्ही सत्ता स्थापन करू शकलो नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना