शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'मी पुन्हा येईन'चा अर्थ; शरद पवारांना दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 18:47 IST

'मी पुन्हा येईन' मागची भूमिका स्पष्ट करत आता देवेंद्र यांनी पवारांची टीका खोडून काढली आहे.

ठळक मुद्दे'मी पुन्हा येईन' मधला 'मी' देवेंद्र फडणवीसांना भारी पडला, असं अनेकांचं मत आहे.देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेला 'मी'पणाचा दर्प जनतेला सहन झाला नाही, असं शरद पवार म्हणाले होते.मी पुन्हा येईन ते लोकांची सेवा करण्यासाठी असंच मी म्हटलं होतं - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दोन गोष्टींची सगळ्यात जास्त चर्चा झाली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची 'मी पुन्हा येईन' ही कविता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भर पावसात केलेलं भाषण. त्या भाषणामुळे शरद पवारांनी मनं आणि मतं जिंकली, तर 'मी पुन्हा येईन' मधला 'मी' देवेंद्र फडणवीसांना भारी पडला, असं अनेकांचं मत आहे. अलीकडेच, पवारांनीही त्या 'मी'पणावरून फडणवीसांचे कान खेचले होते. मात्र, 'मी पुन्हा येईन' मागची भूमिका स्पष्ट करत आता देवेंद्र यांनी पवारांची टीका खोडून काढली आहे.    

'मी म्हणजेच महाराष्ट्र. मी म्हणेन तो महाराष्ट्र. माझ्या आसपास कुणीच नाही... हा देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेला 'मी'पणाचा दर्प जनतेला सहन झाला नाही आणि त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली,' अशी टिप्पणी शरद पवार यांनी 'एबीपी माझा'च्या मुलाखतीत केली होती. त्याला अत्यंत सविस्तर असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी आज 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत दिलं.   देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राजकारणात मला माझ्या क्षमता आणि मर्यादा माहीत आहेत. सत्ता कधीच माझ्या डोक्यात गेली नाही, जाऊ शकत नाही. ज्या दिवशी सत्तेवर आलो तेव्हा एकच गोष्ट सांगितली होती की, माझ्याकडे गमावण्यासारखं काही नाही. चांगलं काम करून नाव कमावणं हेच ध्येय होतं. मी काही फार मोठा माणूस नाही.'

'मी पुन्हा येईन' या वाक्यावरून बरीच टीका झाली. परंतु, ती एक साधी कविता होती. अनेकांना ती फार आवडली. आठ भाषांमध्ये तिचं भाषांतर झालं. ती व्हायरल झाली. त्यात गर्वाचा दर्प नव्हता. मी पुन्हा येईन ते लोकांची सेवा करण्यासाठी असंच मी म्हटलं होतं. पाच वर्षं त्या पदावर बसूनही मी कधी राजा झालो नाही, सेवक राहिलो. सुट्टी घेतली नाही, कुटुंबाला वेळ दिला नाही. जे काम सोपवलं होतं, ते करायाचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याबद्दल मला समाधान वाटतं, गर्व वगैरे विषयच नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.   मी कधीही स्वतःच्या नावावर मतं मागितली नाहीत. आमचे नेते नरेंद्र मोदी हेच आहेत. कामाकडे बघून मतदान करा असंच सांगितलं. म्हणूनच जनतेनं आम्हाला मतं दिली. १९९० नंतर कुठल्याही एका पक्षाला १०० च्या वर जागा मिळवता आल्या नाहीत. पण, भाजपानं सलग दोन निवडणुकीत मिळवल्या. भाजपा हरलाय असं चित्र निर्माण केलं जातंय. पण, जनतेच्या मनात आम्हीच होतो. लोकांनी ज्यांना नाकारलं ते एकत्र आल्यानं आम्ही सत्ता स्थापन करू शकलो नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना