शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

राष्ट्रवादीने आमच्यासोबत का यावे? कारण दिसत नाही; फडणवीसांचे चार दिवस आधीचे वक्तव्य अन् आज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 18:42 IST

Devendra Fadnavis ANI Interview: ड्रायव्हिंग सीटवर शरद पवारच आहेत, नेतृत्व हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा, दोनदा नाही तर तिसऱ्यांदा राजकीय भूकंप आणणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एएनआयला स्फोटक मुलाखत दिली आहे. यामध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंबाबत खुलासे, शरद पवार यांच्याबाबत मत व्यक्त केले आहे. स्मिता प्रकाश य़ांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये चार दिवस आधीच राष्ट्रवादी भाजपसोबत येण्याचा कारण दिसत नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.  

पारिवारीक पक्षांमध्ये आपला उत्तराधिकारी निवडला जातो. शरद पवारांनी इथे सुप्रिया सुळेंना निवडले आहे. राजकारणाला जाणणारे म्हणून त्यांना ओळखले जाते. शरद पवारांना जर मागच्या सीटवर जायचे असते तर त्यांनी सुळेंना अध्यक्ष बनविले असते. राज्याचा बनविला असता, प्रफुल्ल पटेलांनाही बनविले आहे. त्यांनी नेतृत्व हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ड्रायव्हिंग सीटवर पवारच आहेत, विरोधकांना एकत्र आणण्यात पवारच आहेत आणि जे एकमेकांची तोंडं पाहू शकत नाहीत त्यांनाही समोरासमोर आणण्याची हिंमत पवार साहेबांमध्ये आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी पवारांचे राजकारण कसे असते ते सांगितले.  

राष्ट्रवादी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयोग सोडून तुमच्यासोबत आली तर असा सवाल स्मिता प्रकाश यांनी केला. यावर फडणवीस यांनी का येणार, काही कारण दिसत नाही. राष्ट्रवादी ही शरद पवारांची मालकी आहे. त्यांनी त्यांचे मन बनविले आहे की विरोधकांसोबत जावे, असे फडणवीस म्हणाले. 

कोणा राजकारण्याचा मुलगा किंवा मुलगी राजकारणी व्हावा यास आमचा विरोध नाहीय. परंतू, राजकारण्याचा मुलगा आहे म्हणून तो वरच्या पदावर जावा, त्याच्यात नेतृत्व गुण नसले, समजूतदारपणा नसला तरी त्याला हे सर्व मिळावे याला आमचा विरोध आहे. मोदींच्या येण्यानंतर हे कमी होऊ लागले आहे. लोकांची सेवा करणार त्यांचेच परिवारवाद चालणार असे फ़डणवीस म्हणाले. 

ठाकरेंवर खुलासा...ठाकरे आणि आमच्यात कटुता नाही. २०१९ पर्यंत नव्हते. मी त्यांच्या घरी देखील जायचो. मला सर्वात मोठे दु:ख वाटते, राजकीय दृष्ट्या तुम्हाला वाटले की वेगळे व्हावे तर फोन करून ते सांगण्याची हिंमत असावी. देवेंद्र माझे विचार वेगळे आहेत. मला वेगळ्या मार्गाने जायचे आहे, असे सांगायला हवे होते. पाच वर्षे जो व्यक्ती मला मध्य रात्री फोन करायचा, जो मी केल्यावर घ्यायचा त्या व्यक्तीने माझे फोन उचलले नाहीत. त्यांच्या पीएने साहेब बोलणार नाहीत, असे सांगितले. थोडा आत्मसन्मान असलेल्यांसाठी ते चुकीचे वाटते. मी कुठेतरी बदल्याचा शब्द वापरला होता, पण तो चुकीचा होता. मी शिवसेनेवर सूड उगवला नाही. परंतू, पलटवार करायचा होता, तो मी केला, अशी कबुली फडणवीस यांनी दिली. 

मी त्यांच्या कुटुंबावर कधीही वार केला नाही. ते मुख्यमंत्री होते, चार्जशीटवर ज्या गोष्टी नोंद आहेत, ते काही लिप्स चॅट नव्हते. पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ते केले गेले होते. त्यांनी माझ्यावर वार केला म्हणून मी त्यांना ओपन चॅलेंज दिले. एक जरी गोष्ट असेल तर त्यांनी समोर आणावी, असे फडणवीस म्हणाले. मी असे म्हणत नाही की मी जगातील सर्वात इमानदार आहे. मी माझ्या आयुष्यात तेव्हाच क़ॉम्प्रोमाईज केले जेव्हा गरजेचे होते. जसे अजित पवारांसोबत केले. कारण मला जिवंत रहायचे होते. जिवंत राहिलो तर राजकारणात राहिन, मी कोणाच्या गोष्टीत घुसत नाही. आणि घुसलो तर सोडत नाही, असे फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवार