शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

'सामनातील राज्यपालांवरील टीकेवरुन त्यांची मळमळ आणि तळमळ दिसते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 19:23 IST

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर जहरी टीका करण्यात आली होती.

नागपूर: आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर स्वाक्षरी केली. यामुळे आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, आजच्या स्वाक्षरीपूर्वी शिवसेनेनं सामनामधून कोश्यारींवर बोचरी टीका केली होती. आता त्या टीकेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

मीडियाशी संवाद साधताना फडणवीसांनी सामनातील टीकेवर भाष्य केलं. ते म्हणाले, 'राज्यपालांवर सामनातून करण्यात आलेली टीका दर्जाहीन आहे. राज्यपाल पदाचा सन्मान समजुन घ्यायला पाहिजे होता. महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांनी चूक दाखवून दिली होती. ही चूक राज्य सरकारला सुधारावी लागली, त्यामुळे त्यांची मळमळ आणि तळमळ सामनातील टीकेवरुन दिसतेय', असं फडणवीस म्हणाले.

...नाहीतर अध्यादेशाला स्थगिती मिळाली असतीफडणवीस पुढे म्हणाले, राज्य सरकारकडून सुरुवातीला आलेल्या अध्यादेशात काही त्रुटी होत्या. तो अध्यादेश राज्यपालांनी मंजूर केला असता, तरी न्यायालयाकडून त्यावर स्थगिती आली असती. ही चूक राज्यपालांनी सरकारच्या लक्षात आणून दिली', असं फडणवीस म्हणाले. तसेच,' सुप्रीम कोर्टात केंद्रानं वेळ वाढवून मागितली नसून राज्य सरकारनंच वेळ वाढवून घेतलीय', अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी