शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis: 'औरंगाबादचे संभाजीनगर अन् उस्मानाबादचे धाराशीव होणारच', देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 17:35 IST

'नामांतराच्या निर्णयाला आमचा विरोध नाही, गेल्या सरकारच्या कुठल्याही निर्णयाला स्थगिती दिली नाही.'

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अखेरच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या तीन महत्वाच्या निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याची माहिती समोर आली होती. पण, आता या निर्णयांना स्थगिती दिली नसल्याची स्पष्टोक्ती स्वत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी औरंगाबाद(Aurangabad), उस्मानाबाद (Osmanabad) आणि नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली.

'...तेव्हा कॅबिनेटला निर्णय घेता येत नाही'माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''आमच्या सरकारने त्या निर्णयांना स्थगिती दिलेलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने सभागृहाचा विश्वास गमावला होता. नियम आणि परंपरा अशी आहे की, ज्यावेळी राज्यपाल विश्वादर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र देतात, तेव्हा कुठलाही कॅबिनेट निर्णय देता येत नसतो. एखाद्या सरकारला राज्यपाल सांगायचे, तुमचे बहुमत सिद्ध करा, तेव्हा ते कॅबिनेट बोलावून विधानसभा भंग करण्याचा निर्णय घ्यायचे. त्यामुळेच अशाप्रकारचा नियम आणला गेला.'' 

'आमचा या निर्णयांना पाठिंबा'''औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव किंवा नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव, हे ठराव चुकीच्या पद्धतीने केले गेले. त्यांचे सरकार अडीच वर्षे सत्तेत होतं, तेव्हा यांनी या विषयात हात घातला नाही. पण, जेव्हा यांनी बहुमत गमावलं, तेव्हा अखेरच्या क्षणी त्यांच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला. या निर्णयाला आमचाही पाठिंबा आहे, पण आता जे सरकार बहुमतात आहे, ते याबाबत निर्णय घेईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले की, ही नावे महत्वाची आहेत, अस्मितेची आहेत. कुठल्याही अवैध बैठकीत ती देण्यात येऊ नयेत. ज्यांचे सरकार आहे, त्यांच्या बैठकीत ही ठेवण्यात यावीत. त्यामुळे आमच्या कॅबिनेटसमोर ही नावे ठेवण्यात येतील आणि हे तिन्ही निर्णय आमचे सरकार घेईल,'' असेही फडणवीस म्हणाले.

'औरंगाबाद-उस्मानाबादचे नामांतर होणारच'ते पुढ म्हणतात की, 'त्या सरकारला सभागृहात बहुमत नव्हतंच, पण कॅबिनेटमध्येही बहुमत नव्हतं. त्यांची काही लोक एका बाजुने बोलली, तर काही लोक दुसऱ्या बाजुने बोलली. त्यामुळे नेमका यांचा निर्णय काय होता, हे पूर्णपणे अस्पष्ट होतं. आजही कोणाच्या मनात काय आहे, हे समजू शकत नाही. अनेक लोकं दोन्ही बाजुने बोलत आहेत. पण, आमचं निश्चित झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर होईल, उस्मानाबादचे नाव धाराशिव होईल आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्यात येईल,'' अशी स्पष्टोक्ती फडणवीसांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAurangabadऔरंगाबादUsmanabad S Pपोलीस अधीक्षक, उस्मानाबाद