शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

नेत्रदानासाठी इच्छापत्र नव्हे तर इच्छाशक्ती महत्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 12:52 IST

जगातील अंधांच्या २० टक्के अंध भारतात आहेत. या अंधांना नवीन जीवन देणे हे आपले कर्तव्य आहे.

ठळक मुद्देनेत्रपेढीच्या डॉक्टरांचे मत : नेत्रदान करण्यासाठी मनात भीती व गैरसमज नकोमृत्यूनंतर चार तासाच्या आत डोळे काढता येतात.नेत्रपेढीस कळवल्यास नेत्रपेढीचे कर्मचारी घरी येऊन डोळे घेऊन जातातनेत्रदान करण्यासाठी वयाचे बंधन नाही. नेत्रदानास कायद्याने घातलेली काही बंधने   

अतुल चिंचलीपुणे : जगातील अंधांच्या २० टक्के अंध भारतात आहेत. या अंधांना नवीन जीवन देणे हे आपले कर्तव्य आहे. नेत्रदानासाठी इच्छापत्राची गरज नसते. आपण नेत्रदान केल्यावर ज्यांना नेत्ररोपणाने दृष्टीलाभ होणार यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, असे नेत्रपेढीच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. मृत्यूनंतर ताबडतोब आपले डोळे नेत्रपेढीस दान करणे म्हणजे नेत्रदान होय. मृत्यूच्या अगोदर नेत्रदान करता येत नाही. मृत्यूनंतर चार तासाच्या आत डोळे काढता येतात. नेत्रपेढीस कळवल्यास नेत्रपेढीचे कर्मचारी घरी येऊन डोळे घेऊन जातात.  नेत्रदानाची इच्छा असल्यास इच्छापत्र मृत्युपूर्वी नेत्रपेढीत भरून देता येते. त्यावर जवळचे नातेवाईक आणि फॅमिली डॉक्टरच्या सह्या असणे गरजेचे आहे. परंतु नेत्रदान इच्छापत्र भरले नाही. तरी मृत्यूनंतर नातेवाईकांच्या इच्छेनुसार डोळे काढून घेतले जाऊ शकतात. डोळे काढल्यावर पापण्या अशा रीतीने शिवल्या जातात की मृत व्यक्तीच्या चेहऱ्यास विद्रूपता येत नाही.रेबीज, एड्स, व्हायरस, एनकेफेलायटीस, धनुर्वात, पसरलेला कर्करोग, सिफिलस, गॅस गँग्रीन, रक्तात पू येणे, कुष्ठरोग, विषबाधा, पाण्यात बुडून आलेला मृत्यू , काचबिंदू, डोळ्याचे पारदर्शक खराब असणे, असे काही ठराविक विकार असणाऱ्या व्यक्तींना नेत्रदान करता येत नाही. पण डोळ्याला चष्मा आणि मोतिबिंदू असणाऱ्या व्यक्तींना नेत्रदान करता येते. नेत्रदान करण्यासाठी वयाचे बंधन नाही. एक वर्षापेक्षा जास्त वय असणारी व्यक्ती नेत्रदान करू शकते. परंतु नेत्रपेढीत पंधरा वर्षांवरील व्यक्तींचे डोळे घेतले जातात. डोळे काढून आणल्यावर नेत्रपेढीत डोळ्यांची तपासणी केली जाते. डोळ्यातील पारदर्शक पटल चांगले असल्यास ते नेत्ररोपणासाठी वापरले जाते. डोळे नेत्ररोपणास योग्य नसल्यास त्यांचा नेत्रसंशोधनासाठी उपयोग केला जातो. ..............नेत्रदानास कायद्याने घातलेली काही बंधने   नेत्रदान ऐच्छिक असावे. मृत्यूअगोदर नेत्रदान करता येत नाही. मृत्यूचे प्रमाणपत्र असल्याशिवाय डोळे काढता येत नाहीत. कोणाचे डोळे कोणास बसवले यासंबंधी गुप्तता राखली जाते. नेत्रदान सुलभ व्हावे या दृष्टीने मृत्यूनंतर नेत्रदात्याच्या नातेवाईकांनी ही काळजी घ्यावी. मृत्यूनंतर ताबडतोब नेत्रपेढीस कळवावे. फोनवरून कळविताना घरचा पूर्ण पत्ता जवळच्या खुणेसहित द्यावा. मृत्यूचे कारण व केव्हा मृत्यू झाला हे कळवावे. मृत्यूचे प्रमाणपत्र असल्याशिवाय डोळे काढून घेतले जाऊ शकत नाहीत. मृत शरीराचे डोळे बंद करून त्यावर बर्फ किंवा थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. अँटीबायोटिक्स थेंब घालणे असल्यास डोळ्यात घालावेत. खोलीतील पंखा किंवा एअरकंडिशनर बंद करावा. डोक्याखाली उशी ठेवावी. .............जगातील विविधतेने नटलेल्या सृष्टीची जाणीव करून देणारा अवयव नेत्र आहे. दृष्टी नसलेल्या लोकांना जग पाहता येत नाही. जन्मापासून डोळे नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. पण जन्म झाल्यावर जागी काळाने विकारामुळे डोळे जाणे, अपघातात डोळे जाणे अशा व्यक्तींना नेत्ररोपण करता येते. नेत्ररोपण करता येते. नेत्रदान करण्यासाठी आपण बहुमोल मदत केली पाहिजे. जगात नेत्रदान हे एकमेव असे पुण्यकर्म आहे. - डॉ. मिलिंद भोई, भोई प्रतिष्ठान .................भारतात मोठ्या प्रमाणावर अंधांचे प्रमाण आहे. आपण नेत्रदान केल्याने अंध व्यक्तीला त्याचा फायदा होऊ शकतो. नेत्ररोपणाने दृष्टी येऊ शकते. आता नवीन रुग्ण वाढत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावे. समाजात विविध संस्था आणि नेत्रपेढी यासाठी जनजागृती करत आहेत. - डॉ. रवींद्र कोलते, जनकल्याण नेत्रपेढी ..............

टॅग्स :PuneपुणेHealth Tipsहेल्थ टिप्स