शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही : रामदास आठवले

By appasaheb.patil | Updated: May 13, 2019 15:53 IST

१५ वर्षांत नद्याजोड प्रकल्प पूर्ण न केल्याचा आरोप; दुष्काळासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारच जबाबदार

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना पुन्हा संधी मिळाल्यास पाच वर्षांत नद्या जोड प्रकल्प होईल - रामदास आठवले दुष्काळी उपाययोजनेसाठी काही नियम जाचक ठरत असल्याने हे नियम शिथिल करण्याचा  प्रयत्न करण्यात येईल - रामदास आठवले

सोलापूर :   लोकसभा निवडणुकीत केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी व  भाजप-सेना अशा दोनच आघाडीचे उमेदवार निवडून येतात. अन्य तिसरी आघाडी मतदारांना मान्य नसून एक लाखापेक्षा जास्त मते या उमेदवारांना मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात ३८ तर  देशात २६0 जागा मिळतील असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

यावेळी त्यांच्यासमवेत महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, के. डी. कांबळे, बाबू बनसोडे, राजरत्न इंगळे, चंद्रकांत वाघमारे, राजू ओहोळ, सोमनाथ भोसले आदी उपस्थित होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता १५ वर्षे राज्यात होती. या काळात त्यांनी कामे केली असती तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होतेच कशी असा प्रश्न आठवले यांनी उपस्थित केला. कोकण परिसरात पडणाºया अतिरिक्त पावसाचे पाणी अडवून हे पाणी नद्या जोड करून उपलब्ध करणे आवश्यक होते, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी आठवले म्हणाले, विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी  परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ निवारणासाठी केंद्र  शासनाने दोन हजार कोटींची मदत राज्याला केली आहे. यासाठी आणखीन चार ते पाच हजार कोटींची गरज लागेल. दुष्काळी भागातील शेतकºयांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करून  देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समक्ष भेटून मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुष्काळ घालविण्यासाठी सिंचन व्यवस्थेचे योग्य नियोजन झाले नाही. त्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण होत आहे.विदर्भातील भंडारा जिल्ह्यात पाणी नसल्याने आठ दिवस आंघोळ होत नसल्याची परिस्थिती समोर दिसून आली.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना पुन्हा संधी मिळाल्यास पाच वर्षांत नद्या जोड प्रकल्प होईल. यासाठी नितीन गडकरी यांच्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. दुष्काळी उपाययोजनेसाठी काही नियम जाचक ठरत असल्याने हे नियम शिथिल करण्याचा  प्रयत्न करण्यात येईल. पाचपेक्षा जास्त जनावरे असणाºया शेतकºयांची जनावरेही छावणीत दाखल करून घेण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येईल. 

टॅग्स :SolapurसोलापूरRamdas Athawaleरामदास आठवलेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरsolapur-pcसोलापूर