शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

साई बाबांची प्रगटभूमी असलेल्या 'धुपखेडा'च्या विकासाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 17:12 IST

साक्षात्कार झाल्यांनतर सुरवातीचे काही काळ साई बाबा याच गावात राहिले असल्याचा दावा गावकरी करतात.

औरंगाबाद : साईबाबा यांच्या जन्मस्थानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साईंच्या कर्मभूमी आणि जन्मभूमीच्या मुद्यावरून वाद सुरु असतानाचं आता साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा मुद्दा समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील धुपखेडा हे साईबाबांची प्रगट भूमी असल्याचा इतिहास असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जन्मभूमीप्रमाणे साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा सुद्धा विकास करण्याची मागणी साई भक्तांकडून होत आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी असा साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी आहे. तर राज्य शासनाने पाथरी येथील साई जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर शिर्डी येथील काही भाविकांकडून जन्मभूमीबाबत वाद उकरून काढला जात असल्याचे म्हणत पाथरीतील भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

साईंच्या कर्मभूमी आणि जन्मभूमीच्या मुद्यावरून वाद सुरु असतानाचं आता साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा मुद्दा समोर आला आहे. साईबाबा यांची प्रगट भूमी म्हणून ओळखले जाणारे धुपखेडा गाव औरंगाबादेतील पैठण तालुक्यात आहे. मात्र हे गाव शिर्डीप्रमाणे मोठ होऊ शकले नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे राज्य शासनाने पाथरी येथील साई जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे, त्याचप्रमाणे साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा सुद्धा विकास करण्याची मागणी परिसरातील साई भक्तांकडून होत आहे.

धुपखेड्याच्या ग्रामस्थांचा नेमका दावा काय आहे?

साक्षात्कार झाल्यांनतर सुरवातीचे काही काळ साईबाबा याच गावात राहिले असल्याचा दावा गावकरी करतात. तर याच गावात त्यांचे मंदिर असून, बाबा जेव्हा भिक्षा मागून यायचे तेव्हा ते याच ठिकाणी झोपत असल्याचे सुद्धा गावकरी सांगतात. त्यांनतर बराच काळ बाबा याठिकाणी वास्तव्यास असल्याचे गावकरी सांगतात. तर शिर्डीप्रमाणे ईतेही मंदिरा शेजारी 2 कडू लिंबाचे झाड असून योगायोग म्हणजे शिर्डीप्रमाणेचं या झाडांची पाने सुद्धा गोड असल्याचेही गावकरी सांगतात.

काही वर्षांच्या वास्तव्यानंतर साईबाबा हे गावातील चांद पटेल यांच्या नातेवाईकाच्या लग्नात शिर्डीत गेले. त्यानंतर शिर्डीतील खंडोबा मंदिराचे पुजारी मालासापती यांनी बाबांना शिर्डीतंच थांबवून घेतले. कालांतराने साईंच्या चमत्काराने शिर्डीला मोठ केलं. तर साईबाबा या गावात राहिले म्हणून धुपखेड्यात त्यांचे मंदिर असून मोठ्याप्रमाणावर भक्त या गावाला भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे साईंच्या कर्मभूमी आणि जन्मभूमीप्रमाणे प्रगटभूमीचा विकास करण्याची मागणी येथील साईमंदिराचे अध्यक्ष पांडूरंग वाघचौरे यांनी केली आहे.