शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus : शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर - सीताराम कुंटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 09:35 IST

"ज्या जिल्ह्यात किंवा शहरात रुग्ण संख्या कमी झाली आहे, किंवा पूर्णपणे नाहीशी झाली आहे, अशा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचे नियोजन करता येईल."

अतुल कुलकर्णी 

मुंबई : राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर गेला आहे. याविषयीचे विस्तृत आदेश लवकरच काढले जातील, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (Decision to start school postponed says Sitaram Kunte)लहान मुलांसाठीचा टास्क फोर्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली तयार केला आहे. त्याशिवाय डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक टास्क फोर्स कार्यरत आहे. या दोघांसह टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदींसह ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत चाललेली आहे त्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांची एक बैठक मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. रात्री उशिरा ही बैठक संपली. त्यानंतर लोकमतशी बोलताना कुंटे म्हणाले, बंगळुरूमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळत आहेत. तसेच इंडोनेशियामध्येही लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होत असल्याची माहिती पेडियाट्रिक टास्क फोर्सने बैठकीत दिली आहे. त्यांनी काही कागदपत्रे आणि फॉर्म देखील तयार करून बैठकीत दाखवले. लहान मुलांसाठी या आजारावर उपयुक्त औषधे नाहीत. शिवाय लहान मुलांना आपण लसीकरण ही सुरू केलेले नाही. त्यामुळे एकदम शाळा उघडल्या तर ते अडचणीचे होईल, अशी प्रतिक्रिया सर्व तज्ञ डॉक्टरांनी दिल्याचे कुंटे यांनी स्पष्ट केले. 

ज्या जिल्ह्यात किंवा शहरात रुग्ण संख्या कमी झाली आहे, किंवा पूर्णपणे नाहीशी झाली आहे, अशा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचे नियोजन करता येईल. नंदुरबार, धुळे, लातूर, अशा काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण कमी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करता येतील. पण हे जिल्हे किंवा अशी शहरे अपवाद असतील. ज्या ठिकाणी रुग्ण संख्या अद्यापही कमी होत नाही, किंवा नियंत्रणात येत नाही, असे आकडेवारीवरून समोर येत असेल त्या जिल्ह्यांमध्ये सरसकट शाळा सुरू करता येणार नाहीत, असे सांगून मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले, १७ तारखेपासून शाळा सुरू करण्यासाठी जे आदेश काढले होते, त्यात कशा पद्धतीने सुधारणा करता येतील यावरही तातडीने निर्णय घेतला जाईल. मात्र लगेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेता येणार नाही.

 ज्या जिल्ह्यात सलग तीन आठवडे एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही, असे शहर किंवा जिल्हे शाळा सुरू करण्यासाठी पात्र धरावेत, अशी ही चर्चा आजच्या बैठकीत झाली. पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या प्रमुखांनी जी उदाहरणे दिली आहेत, त्यांचाही अभ्यास करून तातडीने त्याची माहिती गोळा करण्याचे आदेश आपण दिल्याचे कुंटे यांनी सांगितले. शहर आणि जिल्ह्याची परिस्थिती पाहूनच शाळा सुरू केल्या जातील. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली जाईल. शालेय शिक्षण विभागाचे सचिव आणि अन्य अधिकारीही आजच्या बैठकीला उपस्थित होते असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसStudentविद्यार्थीSchoolशाळा