कर्जमुक्त नव्हे, कर्जबाजारी केले!

By Admin | Updated: June 3, 2014 02:19 IST2014-06-03T01:11:23+5:302014-06-03T02:19:30+5:30

नाशिक महापालिकेत खूप कामे केली; परंतु ती लोकांसमोर नीट मांडता आली नाही, असे सांगणा:या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेवरील साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज फेडल्याचा दावा केला

Debt-free, not debt-free! | कर्जमुक्त नव्हे, कर्जबाजारी केले!

कर्जमुक्त नव्हे, कर्जबाजारी केले!

>चुकीचा दावा : नाशिक मनपाबाबत राज यांचाच गैरसमज
नाशिक : नाशिक महापालिकेत खूप कामे केली; परंतु ती लोकांसमोर नीट मांडता आली नाही, असे सांगणा:या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेवरील साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज फेडल्याचा दावा केला खरा; परंतु मनसे सत्तेवर आली तेव्हा अशा प्रकारचे कोणतेही कर्ज पालिकेवर नव्हते. उलट गेल्या दोन वर्षात मनसेच्या कारकिर्दीत तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे लोकांचा गैरसमज दूर करता करता प्रत्यक्षात राज ठाकरे यांचाच गैरसमज झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांनी शनिवारी सोमय्या मैदान येथे प्रथमच जाहीर सभा घेतली आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी नाशिकमध्ये मनसेचे काम समाधानकारक नसल्याने वेळोवेळी होणा:या प्रश्नांच्या सरबत्तीला राज यांनी उत्तर दिले. महापालिकेवर साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज होते, ते फेडले आणि इतकेच नव्हे तर यामुळे मोठी विकासकामे करता आली नाही, असा अप्रत्यक्ष दावा राज ठाकरे यांनी केल्याने पालिका वर्तुळातील सारेच जण बुचकळ्यात पडले आहेत. 
मनसेची सत्ता आली तेव्हा महापालिकेवर साडेसहाशे कोटी रुपयांचे कोणतेही कर्ज नव्हते. महापालिकेने आजवर सर्वाधिक शंभर कोटी रुपयांचे कर्ज काँग्रेसच्या शोभा बच्छाव महापौर असताना काढले होते. कर्जरोख्याच्या माध्यमातून काढलेले हे कर्ज शिवसेनेचे दशरथ पाटील महापौर असताना फेडले होते. त्यानंतर पालिकेवर कोणतेही कर्ज नाही.
 
गेल्या दोन वर्षात मनसेची सत्ता आल्यानंतर आधी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास महापालिकेला राज्य शासनाने मान्यता दिली. त्यानंतर अलीकडेच आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास मान्यता दिली. त्यानुसार कर्ज काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 
 
तो स्पील ओव्हर होता..
राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा स्पील ओव्हरचा असू शकेल. पालिकेत निधीचा विचार न करता नागरी कामे मंजूर केली जातात; परंतु निधीची अडचण आली की ही कामे कार्यवाहीत अडकतात. अंदाजपत्रकात त्याचे आर्थिक दायित्व दर्शविले जाते. त्यालाच स्पील ओव्हर म्हणतात. ही कामे केली असल्याचा दावा कदाचित मनसेचा असू शकेल; परंतु त्यात विशेष असे काहीच नसते. मनसेने दायित्व कमी केले याचाच अर्थ असा की, शिवसेना-भाजपाच्या गेल्या पंचवार्षिकमधील साडेसहाशे कोटी रुपयांची कामे मार्गी लागली आणि त्या बदल्यात मनसेने नवीन कामेच केली नाहीत असा होतो. त्यामुळे मनसेने काढलेला मुद्दा प्रचाराचा की अपप्रचाराचा, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Web Title: Debt-free, not debt-free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.