शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"कधीतरी लक्षात घ्या की तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय"; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:56 IST

DCM Ajit Pawar : विधानसभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

Maharashtra Legislative Assembly Special Session 2024 : विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राहुल नार्वेकर यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. तसेच बोलताना मारकडवाडीतील घटनेवरूनही अजित पवार यांनी भाष्य केलं. मारकडवाडीमध्ये बॅलेट पेपरमध्ये मतदान घेण्यावरुन महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. शरद पवार यांनीही मारकडवाडीला भेट देत ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली. त्यावरुन बोलताना तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे. आमची बाजू खरी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराला विरोध करत सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. निवडणुकीत ईव्हीएमवर शंका घेत माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या गटाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली. मात्र ही मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला. त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे शरद पवार यांनी मारकडवाडीत जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. उगीच काहीतरी स्टंटबाजी केली जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

"निवडणुकीच्या काळात अनेकजण स्टेजवर संविधान हातात घ्यायचे. संविधान हातात घेतलं तरच संविधानाबद्दल आदर वाटतो का तर असं नाही. एकनाथ शिंदे म्हणाले की ते कोरं होतं. संविधानाच्या तरतुदी त्यांनी वाचलेल्या नाहीत असं माझं मत आहे. किंवा वाचून ते त्याचे उल्लंघन करत आहेत असं म्हणावं लागेल. संविधानाच्या अनुच्छेद १८८ मधील तरतुदीनुसार प्रत्येक निवडून आलेल्या सदस्याने त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणे आवश्यक आहे. शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळसरळ भंग आहे. जरा कळ काढल्यानंतर शपथ घेण्यात आल्या," असं अजित पवार यांनी म्हटलं.

"संविधानाच्या अनुच्छेद कलम ३२४ नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे. कायद्याने, नियमाने आणि देशाने हा अधिकार दिलेला आहे. सामान्य जनतेला हा अधिकार नाही. अनुच्छेद ३२९ मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पीटिशन दाखल करुन द्यावं लागतं. उगीच काहीतरी स्टंटबाजी करायची. मारकडवाडीकरता आम्हालाही आपलेपणा आणि प्रेम आहे. पण कारण नसताना एक असा बाऊ केला जातोय. कधीतरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे. आमची बाजू खरी आहे," असंही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी