शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मुंबई शहरात पाण्याचे दुर्भिक्ष गडद

By admin | Updated: September 13, 2015 02:46 IST

महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत २६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यामुळे सर्व सेवा जलाशयांमध्ये दैनंदिन स्वरूपात जेवढे पाणी पुरविण्यात

मुंबई : महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत २६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यामुळे सर्व सेवा जलाशयांमध्ये दैनंदिन स्वरूपात जेवढे पाणी पुरविण्यात येत होते; त्यात १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे. याबाबत जल अभियंता खात्याने संनियंत्रण (मॉनिटरिंग) करावयाचे असून, त्याबाबतचा अहवाल नियमितपणे सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.मुंबईत असलेल्या सेवा जलाशयांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात लागू असलेली १५ टक्के पाणीपुरवठा कपात ही निश्चित स्वरूपाची आहे, तर पाणीपुरवठ्याच्या कालावधीमध्ये २० टक्के कालावधी कपात लागू आहे. परंतु तांत्रिक आवश्यकतेनुसार कालावधीमध्ये बदल करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. म्हणजेच उंचावरील परिसर किंवा सखल परिसर, अशा परिसरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे नागरिकांना पाणी मिळण्यास अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये विभागीय स्तरावर बदल करता येऊ शकतो, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.पालिकेच्या सर्व २४ विभागांचे सहायक आयुक्त त्यांच्या विभागातील सहायक अभियंत्यांशी समन्वय साधून विभागातील ज्या परिसरांमध्ये अत्यंत कमी पाणीपुरवठा होत असेल ती ठिकाणे निश्चित करतील. तसेच संबंधित ठिकाणास पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा वेळेमध्ये आवश्यक तो बदल करू शकणार आहेत. उंच भाग व सखल भागांना आवश्यकतेनुसार वेगळ्या स्वरूपातील पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने जल अभियंता खात्याद्वारे कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)बैठका नकोत : सहायक अभियंत्यांना त्यांच्या विभागातील पाणीपुरवठा विषयक समस्यांचे निवारण करण्यासाठी अधिक वेळ देता यावा, यासाठी त्यांना विविध बैठकांना, पाहणी दौऱ्यांना बोलाविण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.सोसायट्यांना नोटीसज्या सोसायट्यांना नियमानुसार मलनि:सारण प्रक्रिया संयंत्र उभारणे व त्याद्वारे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कामांसाठी करणे बंधनकारक आहे त्यांच्याकडून अशा प्रकारे पुनर्वापर करण्यात येत नसेल तर अशा सोसायट्यांना संबंधित सहायक आयुक्तांनी नोटीस द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.विहिरींची यादी तयार करा : उप आयुक्त व सहायक आयुक्तांनी संबंधित विभागातील खासगी व सार्वजनिक जागांवरील कूपनलिका, विहिरीसारख्या पाणीसाठ्यांची यादी तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या यादीमध्ये संबंधित पाणीसाठ्याच्या ठिकाणांचे पत्ते, मालकीबाबतचा तपशील व पाणी गोडे आहे अथवा खारे या माहितीचा तपशील असणे आवश्यक असणार आहे.युद्धस्तरावर कार्यवाही करादूषित पाणीपुरवठ्याच्या समस्यांबाबत जल अभियंता खात्याने युद्धस्तरावर कार्यवाही करावी आणि आवश्यक ती उपाययोजना तत्काळ अंमलात आणावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.