शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार - विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 5:10 PM

रिफायनरी प्रकल्प वादग्रस्त होऊ लागल्यामुळे तो कोणी आणला यावरुन भाजप-शिवसेनेत शाब्दिक ढकलाढकली सुरू झाली आहे.

रत्नागिरी - एखादा प्रकल्प आणला कोणी, याचे श्रेय लाटण्यासाठीचा वाद होणे, ही तशी नेहमीचीच गोष्ट. पण आता राजापूर तालुक्यातील नियोजित रिफायनरी प्रकल्प वादग्रस्त होऊ लागल्यामुळे तो कोणी आणला यावरुन भाजप-शिवसेनेत शाब्दिक ढकलाढकली सुरू झाली आहे. शिवसेनेचे कोकणातील दोन्ही खासदार या प्रकल्पासाठी आग्रही असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर येथे केल्यानंतर आज खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार करत हा प्रकल्प फडणवीस यांनीच आणल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तरहा प्रकल्प आपण आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुरावे दिले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध हक्कभंग ठराव करण्याचा इशाराही दिला आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे अशा १४ गावांमध्ये देशातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला परिसरातील एका गटाने पाठिंबा तर एका गटाने विरोध दर्शविला आहे. लोकांचा विरोध वाढल्यामुळे आता शिवसेनेनेही प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. सेनेच्या या भूमिकेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना काल मंगळवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत प्रश्न केला गेला. या प्रकल्पासाठी रत्नागिरी तसेच रायगडचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अनंत गीते आग्रही होते, आता त्यांची भूमिका बदलली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

शिवसेनेनेच हा प्रकल्प आणल्याचा संदेश सर्वत्र गेल्यामुळे त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे विनायक राऊत यांनी आपली भूमिका मांडत हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनीच आणला असल्याचा पलटवार केला आहे. आपण कधी मागणी केली, कोणाकडे मागणी केली, पंतप्रधान किंवा पेट्रोलियम मंत्र्यांना कधी भेटलो, याचा पुरावा त्यांनी द्यावा, नाहीतर आपले चारित्र्यहनन केल्याचा हक्कभंग ठराव आपण संसदेत आणू, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा