दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नेमका कसा झाला? यासंदर्भात अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आज त्यांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी, मुंबईत पत्रकार परिषद घेत, पीपीटीच्या माध्यमाने, अजित दादा यांच्या विमान अपघातासंदर्भात, "मला असे वाटते की, हा अपघात नाही, हा १०० टक्के घात असू शकतो," असे म्हणत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
जर टेक ऑफ पुण्याचे एअरपोर्ट बॅकअप पकडून केले असेल, तर तेथे लँड करण्याचा प्रयत्न का झाला? -त्यामुळे दादांचा दौरा का बदलला? विमानाची वेळ बदलली गेली का? पायलट खरंच बदलले का? का बदलले? असे काही प्रश्न आहे. मग त्यानंतर, केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आलाय का आणि या अहवालामध्ये विसंगती आली का? त्याच्यामध्ये फरक आलेला आहे. मधील वेळेची विसंगती का आली? पायलट रडाच्या एक मिनिट आधीच तो ट्रान्सपॉन्डर का बंद झाला? की बंद केला गेला? व्हिजिबिलिटी कमी असताना सुद्धा टेक ऑफ का झाले? जर टेक ऑफ पुण्याचे एअरपोर्ट बॅकअप पकडून केले असेल तर तेथे लँड करण्याचा प्रयत्न का झाला? असे अनेक गंभीर प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले.
रनवे ११ च का मागितला? -दरम्यान, रनवे एकोणतीस असताना, सुरक्षित असताना, फ्लॅट असताना, कुठलेही टेन्शन तेथे नसताना, तेथे सूर्याचा पण त्रास नसताना सारखे सारखे 'मला रनवे ११ पाहिजेल,' असे त्याठिकाणी सांगण्यात आले. असेही रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
'हा अपघात नाही, हा १०० टक्के घात असू शकतो -आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात जो मुख्य पायलट आहे, एवढी घटना, जमीन जवळ येतीये, विमान टिल्ट होतेय, तिथे बंद पडतेय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ काढ गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून नाहीतर सामान्य व्यक्ती ज्याचे कुठलेट टेक्निकल बॅग्राउंड नाही, मला असे वाटते की 'हा अपघात नाही, हा १०० टक्के घात असू शकतो आणि हीच माहिती आम्हाला सगळ्या तपास संस्थांकडून हवी आहे.