शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

दाभोलकर, पानसरेंची हत्या करणा-या गोडसेंच्या वारसदार प्रवृत्तीचा निषेध - श्रीपाल सबनीस

By admin | Published: January 16, 2016 2:55 PM

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व कलबुर्गी यांची हत्या नथुराम गोडसेच्या वारसदारां प्रवृत्तींनी केली असून या ह्त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो

ऑनलाइन लोकमत
ग्यानबा तुकाराम नगरी (पिंपरी चिंचवड) दि. १६ - नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व कलबुर्गी यांची हत्या नथुराम गोडसेच्या वारसदारां प्रवृत्तींनी केली असून या ह्त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असे ८९व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. प्रदीर्घ भाषण पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आल्याचेही ते म्हणाले, व त्यांनी छोटेखानी उत्स्फूर्त भाषण यावेळी केले.
सबनीस यांच्या ताज्या वक्तव्यांवर टीकेची झोड उठली होती, काही प्रसारमाध्यमांनीही त्यांना लक्ष्य केले होते. याचा संदर्भ देताना प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा खांब मानली जातात, परंतु हीच प्रसारमाध्यमे तिरडीची ताटी होतात की काय असं वाटावं अशी स्थिती असल्याचंही मत खेदानं व्यक्त केलं.
 
सबनीस यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे:
 
- जात संपल्यावर तटस्थ इतिहास लिहिता येतो.
- राज्य व देश सहिष्णू असल्याचं सांगत श्रीपाल सबनीसांनी साहित्य हे अभिजनांप्रमाणेच बहुजनांचंही
- सगळे ब्राह्मण गोडसे असतात का, असं विचारत वैचारिक मर्यादा न घालण्याचं आवाहन श्रीपाल सबनीसांनी केलं आहे.
- सत्तेच्या सोयीनुसार सत्य साहित्यिकांच्या तोंडी येईल अशी अपेक्षा राजकीय नेत्यांनी बाळगू नये.
- शिवाजी महाराजांचं राज्य जातिधर्म निरपेक्ष होतं. आपण कधी शिवाजी महाराजांना ब्राह्मणाविरोधात उभं केलं, कधी मराठ्यांविरोधात उभं केलं, कधी मुसलमानांविरोधात उभं केलं, ही दुर्दैवी बाब आहे.
- अध्यक्षपदाच्या निवडीवरून मला विरोधकांनी प्रचंड घेरलं.
- संतांच्या वाटणीमुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालं.
- देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने महाराष्ट्राला अत्यंत बुद्धीवादी, प्रामाणिक व हुषार मुख्यमंत्री लाभला आहे.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गींची हत्या नथुराम गोडसेंच्या वारसदारांनी केल्याचे सांगत अशा प्रवृत्तींचा निषेध साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषण करताना केला.