शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Nisarga: चक्रीवादळ अलिबागच्या किना-यावर धडकले; पुढचे २-३ तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 16:50 IST

Cyclone Nisarga: मुंबई जवळून जाताना वादळाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे पुढचे २-३ तास महत्वाचे आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. 

मुंबईः राज्यावर कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचं संकटही आलं आहे. या वादळामुळे अलिबाग, रायगड, मुंबई, ठाण्याच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचणार आहे. राज्य सरकारने या संकटाचा सामना करत अनेकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दलाच्या टीम तैनात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला सतर्कतेचा आवाहन केलं आहे. रायगड जिल्ह्यातून वादळ पुढे सरकत असून, मुंबईच्या जवळून नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबई जवळून जाताना वादळाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे पुढचे २-३ तास महत्वाचे आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. निसर्ग वादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडलेली आहे, बऱ्याच इमारतींवरील छपरे उडून गेली आहेत. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आत्तापर्यंत जीवितहानी कुठेही झालेली नाही. परिस्थिती या क्षणापर्यंत नियंत्रणात आहे. अलिबागजवळ समुद्र किना-यावर धडकले असून, त्याचा वेग ताशी १०० - ११० किमी आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. स्थानिक प्रशासन व NDRF मदत, बचावकार्यासाठी सज्ज आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे. मी जिल्हाधिका-यांच्या संपर्कात असून प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे.  चक्रीवादळानं काही तासांपूर्वीच महाराष्ट्राच्या भूमीवर प्रवेश केलेला आहे. अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातून ते वादळ पुढे जात आहे. या वादळाचा  ताशी वेग १०० किलोमीटरपेक्षा जास्त असून, ११० किमी  असल्याचा सांगितला जातो आहे. झाडं कोसळतायत, काही छतांचे पत्रे उडतायत ही स्थिती आहे. पण प्रशासन अलर्ट आहे. एनडीआरएफचे जवान बचावकार्य करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची आताच बोललो, तेसुद्धा चांगलं काम करत आहेत. वादळ जात असताना जीवितहानी होऊ नये, याची पूर्ण काळजी आपण  घेतो आहोत, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण 

लडाख भारताचा अविभाज्य भाग, सीमेवर शांती महत्त्वाची; तिबेटच्या निर्वासित पीएमचा चीनवर हल्लाबोल

Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र 

Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका

Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा पावणे दाेन लाख लोकांना फटका बसणार?; 60 हजार जणांना स्थलांतरित करणार

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळcycloneचक्रीवादळ