शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळील जिल्ह्यांत 'धोक्याचा इशारा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 20:14 IST

महाराष्ट्रात ३ जून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता

ठळक मुद्देपश्चिम किनारपट्टीवर रेड अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबईत अतिवृष्टीची शक्यता

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होणार असून, ते बुधवारी दुपारनंतर पश्चिम किनारपट्टीवर हरिहरेश्वर आणि दमण दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक जिल्हा; तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात ३ जून रोजी काही ठिकाणी अतिवृष्टी (२२० मिमीहून अधिक) होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची इशारा देण्यात आला आहे.निसर्ग चक्रीवादळ मंगळवारी दुपारी अडीच वाजता पणजीपासून २९० किमी, मुंबईपासून ३८० किमी आणि सुरतपासून ६०० किमी अंतरावर होते. ते गेल्या ६ तासांमध्ये ताशी १३ किमी वेगाने किनार्‍याच्या दिशने पुढे सरकत आहे. मंगळवारी रात्री त्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होणार असून, ते पश्चिम किनारपट्टीला धडकेल, त्यावेळी वार्‍याचा वेग १०० ते ११० किमी इतका असण्याची शक्यता आहे. किनार्‍यावर धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम गुरुवारी दुपारपर्यंत राहण्याचीशक्यता आहे.कोकण, गोव्यात येत्या २४ तासांत सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ जून रोजी कर्नाटक किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. दक्षिण गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, दमण, दादरा आणि नगर हवेली व सुरत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर त्याचा परिणाम जमिनीवर अगदी धुळे, नंदुरबार, पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत जाणविणार आहे. महाराष्ट्र, गोव्याच्या किनारपट्टीवर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील, चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याच्या वेळी या वार्‍यांचा वेग ११० किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या काळात समुद्रात भरतीच्या वेळी १ ते २ मीटर इंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानेव्यक्त केला आहे. राज्यात मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कराड ४४, आजरा ४२, कोल्हापूर ३२, उस्मानाबाद २०, दाभोलीम १४, पणजी १३.६, औरंगाबाद १०, रत्नागिरी ८.३, जळगाव, सोलापूर ३.२ मिमी पावसाची नोंद झाली होती.

इशारा३ जून रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना, अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ४ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेGujaratगुजरातRainपाऊसCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ