शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

पीक विमा राफेलपेक्षा मोठा घोटाळा : पी साईनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 5:45 AM

नागपूर : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेत ‘राफेल’पेक्षा मोठा घोटाळा झाला आहे, असा ...

नागपूर : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेत ‘राफेल’पेक्षा मोठा घोटाळा झाला आहे, असा दावा ज्येष्ठ पत्रकार व कृषितज्ज्ञ पी. साईनाथ यांनी शनिवारी येथे केला.

ते म्हणाले, योजनेची तीन वर्षाची फलनिष्पत्ती निराशाजनकच राहिली. पहिल्या दोनच वर्षांत विमा घेणाऱ्या कंपन्यांनी या योजनेतून १५,७९५ कोटी रुपयांचा फायदा प्राप्त केला. या पीक योजनेत शेतकरीच फसले. फायदा कंपन्यांचाच झाला. मुळात सरकारने ही योजना शेतकºयांसाठी नव्हे तर विम्याचा व्यवसाय करणाºया कंपन्या व बँकांसाठी आणली.

‘नेशन फॉर फार्मर्स’तर्फे’ शेतकरी, शेतमजूर संघटनांतर्फे दिल्लीला जाणाºया मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरात बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी अभ्यासक विजय जावंधिया उपस्थित होते.

पी. साईनाथ म्हणाले, जीएसटी व नोटाबंदीमुळे लघु उद्योजक व कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. सरकार मोठमोठे दावे करीत असले तरी शेतकºयांची स्थिती आधीपेक्षा अधिक वाईट झाली आहे. महाराष्टÑ शासनाने जवळपास १५० गावांमध्ये दुष्काळ असल्याचे जाहीर केले. वास्तविक राज्यात २५० पेक्षा जास्त गावात भीषण दुष्काळाची स्थिती आहे. सरकारला हे माहीत आहे व म्हणूनच केंद्राकडे ७,००० कोटी दुष्काळ निधीची मागणी करण्यात आली. मात्र सर्वेक्षणाच्या निकषामुळे सरकारी मदतीचा हवा तसा लाभ शेतकºयांना मिळणार नाही. महाराष्टÑासह देशाच्या अनेक भागात दुष्काळाची स्थिती अतिशय विदारक आहे. भविष्यातही अधिकच भीषण होणार आहे. पुढच्या दोन महिन्यानंतरच या स्थितीचा सामना करावा लागणार असून, पिण्यासाठीही पाण्याचे दुर्भिक्ष्य सहन करावे लागेल.‘शेतकºयांसाठी राष्टÑ’ आंदोलन २९ व ३० लादुष्काळ आणि शेती समस्येवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलावून चर्चा करण्याच्या मागणीसाठी येत्या २९ व ३० नोव्हेंबरला ‘नेशन फॉर फार्मर्स’ ची घोषणा करीत दिल्ली येथे मोर्चा काढला जाणार आहे. देशभरातून लाखो शेतकरी, कार्यकर्ते, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरवर्ग यात सहभागी होणार असल्याचे पी. साईनाथ यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी