शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वेळीच लक्ष न दिल्यास खेकड्यांचा उपद्रव महागात पडू शकतो : माधव चितळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 12:38 IST

कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर सावंत यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली.

ठळक मुद्देमातीची धरणे, कालव्यांना सर्वांधिक धोका

सुषमा नेहरकर- शिंदे 

पुणे : मातीची धरणे, कालव्यांमध्ये ओल शोधण्यासाठी खेकडे मोठ्या प्रमाणात लहान-मोठी बिळे तयार करतात. या बिळांमध्ये पाणी जाऊन कालवा, धरणाची गळती सुरु होते. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास खेकड्यांचा उपद्रव महागात पडून शकतो, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव चिळते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर सावंत यांच्यावर जोरदार टिका होत असून, त्याच्या या विधानाच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी खेकडा आंदोलने करण्यात आली. तसेच हे खेकडा प्रकरण सोशल मिडीयासह सर्वच स्तरावर चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्याची चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, मातीच्या ओल्यामध्ये, दलदलीत खेकडे घर करतात. यामुळेच प्रामुख्याने कोकण, भात शेती असलेल्या भागातील कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खेकड्यांचा उपद्रव होतो.

कालव्यांमध्ये, मातीचे धरण असलेल्या भागात हे खेकडे ओल शोधण्यासाठी सुमारे ५ ते ६ मिटरपर्यंत बोगदा तयार करतात. त्यानंतर पावसामध्ये पाण्याची पातळी वाढू लागल्यावर खेकड्यांनी केलेल्या बोगद्यांमध्ये पाणी शिरून गळती सुरु होते. परंतु याकडे वेळीच लक्ष न दिल्याने या गळतीमध्ये वाढ होऊन धरण, कालवे फुटण्याचा धोका निर्माण होतो.यामुळे खेकड्यांचा प्रदेश असलेल्या भागामध्ये मातीचे धरण, कालवे तयार करताना पाण्याच्या बाजूने सुरुवातील दगडचा थर दिला जातो. त्यानंतर मुरुम आणि नंतर वाळू टाकली जाते. यामुळे खेकड्यांनी बिळ केले तरी दगडाच्या थरामुळे काही प्रमाणात अडथळा निर्माण होता. आणि पाण्याची पातळी वाढल्यावर पाण्यासोबत मुरुम आणि वाळू देखील वाहून या बिळांमध्ये वाहून जाऊन हे बंद होण्यास मदत होत. त्यामुळे मातीची धरणे, कालवे करता या शास्त्राचा उपयोग करणे आवश्यक आहे. कोकणामध्ये बहुतेक सर्व धरणे बांधताना याचा पध्दतीने ती बांधली असून, सुरक्षित असल्याचे देखील चितळे यांनी स्पष्ट केले.------------------------------भात शेती असलेल्या भागात शेतक-यांना खेकड्यांचा मोठा त्रासखेकडामुळे कोकणातील तिवरे धरण फुटल्याचा दावा केल्याने ह्यखेकडेह्ण सर्वत्र चचेर्चा विषय ठरत आहेत. परंतु भात शेती असलेल्या तालुक्यांमध्ये शेतक-यांना खेकड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. खेकड्यांकडून भात शेतींच्या बांधाला छिंद्रे पाडल्याने पावसाळ्यामध्ये  पाणी वाढल्यास संपूर्ण बांध वाहून जाण्याचे अनेक प्रकार नियमित होतात. परंतु स्थानिक उपाययोजना करून खेकड्यांचा बंदोबस्त केला जातो. - रामचंद्र शिंदे, शेतकरी, आंबोली, खेड ----------------------असा केला जातो खेकड्यांचा बदोबस्तधरण, कालव्याला खेकडे जागोजागी बिळ करतात. या बिळामध्ये पाणी गेल्यावर पाण्याच्या रंगावरून येथे खेकड्यांचे बिळ असल्याचे लक्षात येते. त्यानंतर या बिळांमध्ये इथेलीन डायब्रोमाईड रसायन शिजवलेला भात आणि गुळ यांचे मिश्रण करुन याचे गोळे टाकले जातात. हे औषधी गोळे खाल्यानंतर खेकडे मरतात. अनेक भागामध्ये असे विविध प्रयोग करुन खेकड्यांचा बदोबस्त केला जातो.--------------------प्रजनन कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास अधिक फायदाखेकड्यांचा प्रजनन कालावधी साधारण एप्रिल ते जून असा तीन महिन्यांचा कालावधी असतो. त्यापूर्वी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात हे खेकडे सहसा बिळाच्या बाहेर येत नाहीत. यामुळे त्यांच्या प्रजनन कालावधीमध्येच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास अधिक फायद्याच्या ठरतात.---------------------------              देखील खेकड्याचा धोकापुणे जिल्ह्यात प्रामुख्याने पश्चिम पट्ट्यामध्ये शेतक-यांनी लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या शेततळ््यांना खेकड्यांचा मोठा धोका असतो. शेततळ््यातील माती पोखरुन हे खेकडे जागोजागी छिद्रे पाडतात. तसेच शेततळ्याच्या  अस्तरीकरणासाठी वापरलेल्या मलचिंगचा कागदाला देखील खेकडे बिळे पाडतात. यामुळे कागत फाडल्याने शेततळ्यातील पाण्याचा निचरा होतो. शेततळ्याना देखील खेकड्यांचा चांगलाच उपद्रव होतो.- सुनिल खैरनार, कृषी अधिकारी, पुणे उपविभाग---------------------------खेकड्यांमध्ये कमालीची ताकदमहाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्सिट्यूट (मेरी) मध्ये काम करत असताना सन २००४ मध्ये नाशिक येथील वाघेरे या छोट्या धरणावर ह्यखेकड्याह्ण संदर्भात संशोधन केले होते. खेकड्यांमुळे या धरणाला धोका निर्माण झाला होता. खेकड्यांमध्ये कमालीती ताकद असते. त्याच्या नांग्या इतक्य टणक असतात की मुरमट दगड देखील पोखरु शकतात. त्यामुळे धरणाची पाण्याची पातळी कमी झाली का ओल्याव्यासाठी भिंतीला छिंदे्र करतात. एकाच वेळी अनेक खेकडे अशी छिंद्रे करतात. त्यानंतर पावसाळ््यामध्ये पाण्याची पातळी वाढू लागल्यावर या छिंद्रांमध्ये पाणी जाऊन गळती सुरु होती. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास कालवा, धरण फुटू शकते. केमिकल प्रयोग करुन खेकड्यांचा बदोबस्त करता येतो, हे आमच्या संशोधनामध्ये स्पष्ट झाले.- नामदेव पठाडे, निवृत्त संशोधक ,मेरी  

   

टॅग्स :PuneपुणेDamधरणAccidentअपघातGovernmentसरकार