शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

वेळीच लक्ष न दिल्यास खेकड्यांचा उपद्रव महागात पडू शकतो : माधव चितळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 12:38 IST

कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर सावंत यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली.

ठळक मुद्देमातीची धरणे, कालव्यांना सर्वांधिक धोका

सुषमा नेहरकर- शिंदे 

पुणे : मातीची धरणे, कालव्यांमध्ये ओल शोधण्यासाठी खेकडे मोठ्या प्रमाणात लहान-मोठी बिळे तयार करतात. या बिळांमध्ये पाणी जाऊन कालवा, धरणाची गळती सुरु होते. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास खेकड्यांचा उपद्रव महागात पडून शकतो, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव चिळते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर सावंत यांच्यावर जोरदार टिका होत असून, त्याच्या या विधानाच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी खेकडा आंदोलने करण्यात आली. तसेच हे खेकडा प्रकरण सोशल मिडीयासह सर्वच स्तरावर चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्याची चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, मातीच्या ओल्यामध्ये, दलदलीत खेकडे घर करतात. यामुळेच प्रामुख्याने कोकण, भात शेती असलेल्या भागातील कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खेकड्यांचा उपद्रव होतो.

कालव्यांमध्ये, मातीचे धरण असलेल्या भागात हे खेकडे ओल शोधण्यासाठी सुमारे ५ ते ६ मिटरपर्यंत बोगदा तयार करतात. त्यानंतर पावसामध्ये पाण्याची पातळी वाढू लागल्यावर खेकड्यांनी केलेल्या बोगद्यांमध्ये पाणी शिरून गळती सुरु होते. परंतु याकडे वेळीच लक्ष न दिल्याने या गळतीमध्ये वाढ होऊन धरण, कालवे फुटण्याचा धोका निर्माण होतो.यामुळे खेकड्यांचा प्रदेश असलेल्या भागामध्ये मातीचे धरण, कालवे तयार करताना पाण्याच्या बाजूने सुरुवातील दगडचा थर दिला जातो. त्यानंतर मुरुम आणि नंतर वाळू टाकली जाते. यामुळे खेकड्यांनी बिळ केले तरी दगडाच्या थरामुळे काही प्रमाणात अडथळा निर्माण होता. आणि पाण्याची पातळी वाढल्यावर पाण्यासोबत मुरुम आणि वाळू देखील वाहून या बिळांमध्ये वाहून जाऊन हे बंद होण्यास मदत होत. त्यामुळे मातीची धरणे, कालवे करता या शास्त्राचा उपयोग करणे आवश्यक आहे. कोकणामध्ये बहुतेक सर्व धरणे बांधताना याचा पध्दतीने ती बांधली असून, सुरक्षित असल्याचे देखील चितळे यांनी स्पष्ट केले.------------------------------भात शेती असलेल्या भागात शेतक-यांना खेकड्यांचा मोठा त्रासखेकडामुळे कोकणातील तिवरे धरण फुटल्याचा दावा केल्याने ह्यखेकडेह्ण सर्वत्र चचेर्चा विषय ठरत आहेत. परंतु भात शेती असलेल्या तालुक्यांमध्ये शेतक-यांना खेकड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. खेकड्यांकडून भात शेतींच्या बांधाला छिंद्रे पाडल्याने पावसाळ्यामध्ये  पाणी वाढल्यास संपूर्ण बांध वाहून जाण्याचे अनेक प्रकार नियमित होतात. परंतु स्थानिक उपाययोजना करून खेकड्यांचा बंदोबस्त केला जातो. - रामचंद्र शिंदे, शेतकरी, आंबोली, खेड ----------------------असा केला जातो खेकड्यांचा बदोबस्तधरण, कालव्याला खेकडे जागोजागी बिळ करतात. या बिळामध्ये पाणी गेल्यावर पाण्याच्या रंगावरून येथे खेकड्यांचे बिळ असल्याचे लक्षात येते. त्यानंतर या बिळांमध्ये इथेलीन डायब्रोमाईड रसायन शिजवलेला भात आणि गुळ यांचे मिश्रण करुन याचे गोळे टाकले जातात. हे औषधी गोळे खाल्यानंतर खेकडे मरतात. अनेक भागामध्ये असे विविध प्रयोग करुन खेकड्यांचा बदोबस्त केला जातो.--------------------प्रजनन कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास अधिक फायदाखेकड्यांचा प्रजनन कालावधी साधारण एप्रिल ते जून असा तीन महिन्यांचा कालावधी असतो. त्यापूर्वी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात हे खेकडे सहसा बिळाच्या बाहेर येत नाहीत. यामुळे त्यांच्या प्रजनन कालावधीमध्येच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास अधिक फायद्याच्या ठरतात.---------------------------              देखील खेकड्याचा धोकापुणे जिल्ह्यात प्रामुख्याने पश्चिम पट्ट्यामध्ये शेतक-यांनी लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या शेततळ््यांना खेकड्यांचा मोठा धोका असतो. शेततळ््यातील माती पोखरुन हे खेकडे जागोजागी छिद्रे पाडतात. तसेच शेततळ्याच्या  अस्तरीकरणासाठी वापरलेल्या मलचिंगचा कागदाला देखील खेकडे बिळे पाडतात. यामुळे कागत फाडल्याने शेततळ्यातील पाण्याचा निचरा होतो. शेततळ्याना देखील खेकड्यांचा चांगलाच उपद्रव होतो.- सुनिल खैरनार, कृषी अधिकारी, पुणे उपविभाग---------------------------खेकड्यांमध्ये कमालीची ताकदमहाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्सिट्यूट (मेरी) मध्ये काम करत असताना सन २००४ मध्ये नाशिक येथील वाघेरे या छोट्या धरणावर ह्यखेकड्याह्ण संदर्भात संशोधन केले होते. खेकड्यांमुळे या धरणाला धोका निर्माण झाला होता. खेकड्यांमध्ये कमालीती ताकद असते. त्याच्या नांग्या इतक्य टणक असतात की मुरमट दगड देखील पोखरु शकतात. त्यामुळे धरणाची पाण्याची पातळी कमी झाली का ओल्याव्यासाठी भिंतीला छिंदे्र करतात. एकाच वेळी अनेक खेकडे अशी छिंद्रे करतात. त्यानंतर पावसाळ््यामध्ये पाण्याची पातळी वाढू लागल्यावर या छिंद्रांमध्ये पाणी जाऊन गळती सुरु होती. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास कालवा, धरण फुटू शकते. केमिकल प्रयोग करुन खेकड्यांचा बदोबस्त करता येतो, हे आमच्या संशोधनामध्ये स्पष्ट झाले.- नामदेव पठाडे, निवृत्त संशोधक ,मेरी  

   

टॅग्स :PuneपुणेDamधरणAccidentअपघातGovernmentसरकार