शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

कोर्टाचे समन्स आता स्पीड पोस्ट,ई मेल आणि एसएमएसवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 19:40 IST

समन्स, नोटीसा संबंधितांना वेळेत पोहचण्यासाठी आता हायटेक व इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर केला जाणार

जमीर काझी,मुंबई: न्यायालयात दाखल असलेल्या विविध खटल्यात वेळोवेळी लागू करण्यात येणाऱ्या समन्स, नोटीसा संबंधितांना वेळेत पोहचण्यासाठी आता हायटेक व इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे.स्पीड पोस्टबरोबरच ई-मेल व एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे खटल्यातील पंच,साक्षीदारांना सुनावणीसाठी मुदतीत न्यायालयात हजर राहता येणे शक्य होणार आहे.पोलीस महासंचालकांनी या महत्वकाक्षी योजनेचा प्रस्ताव गृह विभागाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने त्यासंबंधी दिलेल्या निर्देशानुसार झटपट कार्यवाहीसाठी ही उपाय योजना राबविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.विविध न्यायालयात दाखल असलेल्या विविध खटल्यामध्ये सुनावणीवेळी आरोपी, फिर्यादीबरोबरच पंच, साक्षीदारांना हजर रहावे लागते. त्याबाबत लागू करण्यात आलेले समन्स, नोटीसा या संबंधित पोलीस ठाण्याच्या मार्फत पाठविण्याची तरतूद आहे. मात्र बहुतांशवेळी त्यांना वेळेवर समन्स, नोटीस न मिळाल्याने ते न्यायालयात हजर रहात नाहीत. आणि खटल्याचे कामकाज रेंगाळते, अशा पद्धतीने हजारो खटले विविध न्यायालयात प्रलंबित राहिले असल्याने त्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना न्यायालयाने दिलेली आहे. त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता,१९९३च्या प्रकरण ६ मध्ये कलम ६१ ते ६९ अन्वये आणि कलम ७० ते ८१ अन्वये वॉरंट्स बजाविण्याबाबत कार्यपद्धतीप्रमाणे लागू केली जात आहे. तात्काळ व कालबद्ध मुदतीमध्ये ते लागू करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे या कामावर समन्वयासाठी पोलीस आयुक्तालयात गुन्हा अन्वेषण शाखेत तर अधीक्षक कार्यालयात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाºयांची नेमणूक केली असून दर महिन्याला घटक प्रमुखाकडून आढावा घेतला जातो. मात्र पोलिसांकडील कामाचे ओझे आणि अपुºया मनुष्यबळामुळे त् वेळेत समन्स, वॉरंट्स मिळत नसल्याची तक्रार कायम राहिल्याने आता या कामासाठी स्पीड पोस्ट व इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर करण्याचा प्रस्ताव महासंचालकांनी बनविला आहे. त्यामध्ये समन्स, वॉरंट्स थेट टपाल विभागाकडे दिले जातील, तर संबंधितांचे ई-मेल, एसएमएस व व्हॉटस्अपद्वारे त्यांना माहिती दिली जाणार आहे. तर मोठ्या निधीची आवश्यकता ;* टपाल विभागाकडून सध्या पासपोर्ट पोहचविले जाते. त्याच धर्तीवर त्यांच्याकडे वॉरंट्स व समन्सचे काम देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या कामासाठी गृह विभागाला किमान ५० कोटीची तरतूद सुरवातीला करावी लागणार असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.* त्याच्या तुलनेत ईमेल,एसएमएस या अद्यावत सुविधाचा वापर कमी खर्चात करता येणार आहे. मात्र त्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये सुधारणा करुन त्यामध्ये याबाबी अतर्भूत करण्याची आवश्यकता आहे.चेक बाऊन्सचे सर्र्वाधिक खटलेन्यायालयात दाखल असलेल्या खटल्यामध्ये ५० हजारावर खटले हे आयपीसी कलम १३८ खोटे धनादेश ( चेक बाऊन्स) देवून फसवणूक केलेले आहेत. एकुण खटल्यामध्ये त्याचे प्रमाणे ५० टक्याहून अधिक असून त्याचे वॉरंट्स व समन्स वेळेवर लागू केले जात नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.