शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

कोर्टाचे समन्स आता स्पीड पोस्ट,ई मेल आणि एसएमएसवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 19:40 IST

समन्स, नोटीसा संबंधितांना वेळेत पोहचण्यासाठी आता हायटेक व इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर केला जाणार

जमीर काझी,मुंबई: न्यायालयात दाखल असलेल्या विविध खटल्यात वेळोवेळी लागू करण्यात येणाऱ्या समन्स, नोटीसा संबंधितांना वेळेत पोहचण्यासाठी आता हायटेक व इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे.स्पीड पोस्टबरोबरच ई-मेल व एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे खटल्यातील पंच,साक्षीदारांना सुनावणीसाठी मुदतीत न्यायालयात हजर राहता येणे शक्य होणार आहे.पोलीस महासंचालकांनी या महत्वकाक्षी योजनेचा प्रस्ताव गृह विभागाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने त्यासंबंधी दिलेल्या निर्देशानुसार झटपट कार्यवाहीसाठी ही उपाय योजना राबविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.विविध न्यायालयात दाखल असलेल्या विविध खटल्यामध्ये सुनावणीवेळी आरोपी, फिर्यादीबरोबरच पंच, साक्षीदारांना हजर रहावे लागते. त्याबाबत लागू करण्यात आलेले समन्स, नोटीसा या संबंधित पोलीस ठाण्याच्या मार्फत पाठविण्याची तरतूद आहे. मात्र बहुतांशवेळी त्यांना वेळेवर समन्स, नोटीस न मिळाल्याने ते न्यायालयात हजर रहात नाहीत. आणि खटल्याचे कामकाज रेंगाळते, अशा पद्धतीने हजारो खटले विविध न्यायालयात प्रलंबित राहिले असल्याने त्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना न्यायालयाने दिलेली आहे. त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता,१९९३च्या प्रकरण ६ मध्ये कलम ६१ ते ६९ अन्वये आणि कलम ७० ते ८१ अन्वये वॉरंट्स बजाविण्याबाबत कार्यपद्धतीप्रमाणे लागू केली जात आहे. तात्काळ व कालबद्ध मुदतीमध्ये ते लागू करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे या कामावर समन्वयासाठी पोलीस आयुक्तालयात गुन्हा अन्वेषण शाखेत तर अधीक्षक कार्यालयात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाºयांची नेमणूक केली असून दर महिन्याला घटक प्रमुखाकडून आढावा घेतला जातो. मात्र पोलिसांकडील कामाचे ओझे आणि अपुºया मनुष्यबळामुळे त् वेळेत समन्स, वॉरंट्स मिळत नसल्याची तक्रार कायम राहिल्याने आता या कामासाठी स्पीड पोस्ट व इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर करण्याचा प्रस्ताव महासंचालकांनी बनविला आहे. त्यामध्ये समन्स, वॉरंट्स थेट टपाल विभागाकडे दिले जातील, तर संबंधितांचे ई-मेल, एसएमएस व व्हॉटस्अपद्वारे त्यांना माहिती दिली जाणार आहे. तर मोठ्या निधीची आवश्यकता ;* टपाल विभागाकडून सध्या पासपोर्ट पोहचविले जाते. त्याच धर्तीवर त्यांच्याकडे वॉरंट्स व समन्सचे काम देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या कामासाठी गृह विभागाला किमान ५० कोटीची तरतूद सुरवातीला करावी लागणार असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.* त्याच्या तुलनेत ईमेल,एसएमएस या अद्यावत सुविधाचा वापर कमी खर्चात करता येणार आहे. मात्र त्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये सुधारणा करुन त्यामध्ये याबाबी अतर्भूत करण्याची आवश्यकता आहे.चेक बाऊन्सचे सर्र्वाधिक खटलेन्यायालयात दाखल असलेल्या खटल्यामध्ये ५० हजारावर खटले हे आयपीसी कलम १३८ खोटे धनादेश ( चेक बाऊन्स) देवून फसवणूक केलेले आहेत. एकुण खटल्यामध्ये त्याचे प्रमाणे ५० टक्याहून अधिक असून त्याचे वॉरंट्स व समन्स वेळेवर लागू केले जात नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.