शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

देशाला जलस्वंयपूर्ण करणार  : जलशक्ती मंत्री गजेद्रंसिंग शेखावत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 19:20 IST

देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू

ठळक मुद्देपुण्यात शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.त्यामुळे पुढील काळात जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण केले जाईल,असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी केले.  जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पाअंतर्गत पुण्यात शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्धाटनप्रसंगी शेखावत बोलत होते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, जलशक्तीचे सचिव यु. पी सिंग, जलसंसाधन विकासचे प्रधान सचिव आय. एस. चहाल, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे वरिष्ठ सहआयुक्त राकेश कश्यप, जलशक्ती मंत्रालयाचे प्रकल्प समन्वयक अखील कुमार, आँस्ट्रेलियन दूतावास टोनी हुबेर, दिपक कुमार, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक एन. व्ही. शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता वी.जी. रजपूत, राजेंद्र मोहिते, जल विज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता श. द भगत आदी उपस्थित होते.शेखावत म्हणाले, पाण्याचा विषय लक्षात घेऊन  जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात आले असून त्यामुळे पाण्याचे महत्व आणखी वाढले आहे. पाण्याशिवाय जीवन हे अशक्य आहे.बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचे महत्व आणखी वाढले आहे.देशात प्रदेशनिहाय पाण्याची स्थिती बदलत असून बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रात दिवाळीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.  देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू असून मार्च 2020 पर्यंत पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण होणार आहे.तसेच उर्वरित काम दोन वर्षात पुर्ण होईल,असे नमूद करून शेखावत म्हणाले, येत्या 2024 पर्यंत शासनाने घराघरांत पिण्याचे पाणी देण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे. शेतीखालील पाण्याची बचत करण्यासाठी ठिंबक सिंचनाला महत्व दिले आहे. त्यावर शासन काम करत आहे.तसेच पाणी हा विषय फक्त राज्याचा राहिला नाही.यावेळी टोनी हुबेर,यु. पी सिंग यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.प्रधान सचिव आय. एस. चहाल यांनी प्रास्तविक केले. तर खलील अन्सारी यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीIndiaभारत