शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

व्यसनमुक्तीकरिता समुपदेशनाची गरज

By admin | Updated: February 12, 2017 00:21 IST

बदलती जीवनशैली, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. पण व्यसन हे जसे स्वत:साठी घातक असते. तसेच आपल्या कुटुंबासाठीही. कारण आपल्या

- प्राची सोनवणेबदलती जीवनशैली, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. पण व्यसन हे जसे स्वत:साठी घातक असते. तसेच आपल्या कुटुंबासाठीही. कारण आपल्या व्यसनाचा त्रास हा कुटूंबाला होत असतो. त्यामुळे व्यसन मनापासून सोडणेही आवश्यक असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणेही तितकेच गरजेचे आहे. नवी मुंबई शहरातील अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या पुढाकाराने गेली पाच वर्षे व्यसनमुक्तीकरिता समुपदेशन केले जात आहे. आजमितीस त्यांनी २,३०० लोकांना व्यसनमुक्त केले आहे. समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी अन्वय व्यसनमुक्ती केंद्राने नवी मुंबईतील वाशी महानगरपालिका रुग्णालय, नेरुळमधील डी. वाय. पाटील रुग्णालय, इंदिरानगर झोपडपट्टी परिसर, कळंबोली परिसरात अन्वय संस्थेने सामाजिक कार्याचे जाळे पसरण्यास सुरु वात केली आहे. २०हून अधिक डॉक्टर्स व समुपदेशकांचा चमू नवी मुंबईतील तीन केंद्रांवर त्याकरिता काम करत आहे. केवळ तंबाखूमुळे भारतातील ३० टक्के लोक कॅन्सरग्रस्त झाले आहेत, असा निष्कर्ष निघाला आहे.दारू, अमली पदार्थच नव्हे, तर तंबाखू, तपकीर, गुटखाजन्य पदार्थांमुळे महिलांमधील व्यसनाधीनता गेल्या दहा वर्षांत तिपटीने वाढली आहे. दारूशिवाय तंबाखू, मशेरी, तपकीर, गुटख्याच्या व्यसनातही अनेकजणी अडकल्या आहेत. त्यात कष्टकरी महिलांचे प्रमाण जास्त आहे. ‘गालाच्या कोपऱ्यात तंबाखूची चिमूट ठेवल्याशिवाय कामात उत्साहच येत नाही,’ अशी प्रतिक्रिया या महिला व्यक्त करत असल्याची माहिती स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष वृषाली मगदूम यांनी व्यक्त केली. कचरावेचक महिलांमध्ये दारूचे व्यसन पाहायला मिळत असून, उच्चभ्रू वस्तीतील तरुणींमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण जास्त असल्याचे मगदूम यांनी सांगितलसे. द्रारिद्र्य, अस्वच्छता, अंधश्रद्धा, पुरु षप्रधानता हे सारं घेऊन घर सावरणारी बाईच व्यसनाच्या अधीन झाली, तर समाजातील समतोल राखणे अशक्य आहे. अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने वर्षभर व्यसनांचे दुष्परिणाम, त्यापासून होणारे आजार आदींविषयी जनजागृती केली जाते. ‘व्यसन हा रोग असून तो नियंत्रणात आणला की बरा झाला,’ असे प्रतिपादन अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे अजित मगदूम यांनी केले. हल्ली फॅशन स्टेटस राखण्यासाठी व्यसन केले जाते. महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच विद्यार्थिनींमध्ये दिवसेंदिवस व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. गोवंडी रेल्वे हॉस्पिटल येथे गेल्या तीन महिन्यांपासून अन्वय व्यसनमुक्ती केंद्राला सुरुवात झाली आहे.Þ केंद्राच्या माध्यमातून शहरातील कचरावेचक महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. स्र१ंूँ्र101291@ॅें्र’.ूङ्मेसमुपदेशन महत्त्वाचेव्यसनमुक्तीकरिता सर्वच वयोगटांमध्ये समुपदेशनाची गरज आहे. अन्वय व्यसनमुक्ती केंद्रांने व्यसनमुक्तीच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलत विविध स्तरांमध्ये व्यसनांच्या आहारी गेलेल्या नागरिकांना त्यातून बाहेर काढले आहे. तंबाखूच्या आहारी गेलेल्या नागरिकांना ६ महिन्यांच्या समुपदेशनातून नियंत्रणात आणले जाते आणि हळूहळू व्यसनमुक्त केले जाते. तर ड्रग्जच्या आहारी गेलेल्या माणसाला नियंत्रणात आणण्याकरिता ५ वर्षांचा कालावधी लागतो. दारूपासून सूटका मिळविण्याकरिता किमान १ वर्ष समुपदेशनाचे काम संस्थेच्या वतीने केले जाते. तरुणांनो सावधानहल्ली इंटरनेटवरही डार्क नेट सारख्या साईट्सवर ड्रग्ज मिळत असल्याने तरुणपिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. त्यामुळे मुलांनी तर आपण तोंडात काय घालतो आहे याबाबत जागरूक असणे अतिशय गरजेचे आहे. पालकांनीही आपल्या पाल्याशी अभ्यासाव्यतिरिक्त संवाद साधावा. इंटरनेटवर तासन्तास बसणाऱ्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे.- अजित मगदूम, प्रमुख अन्वय व्यसनमुक्ती केंद