शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

व्यसनमुक्तीकरिता समुपदेशनाची गरज

By admin | Updated: February 12, 2017 00:21 IST

बदलती जीवनशैली, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. पण व्यसन हे जसे स्वत:साठी घातक असते. तसेच आपल्या कुटुंबासाठीही. कारण आपल्या

- प्राची सोनवणेबदलती जीवनशैली, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. पण व्यसन हे जसे स्वत:साठी घातक असते. तसेच आपल्या कुटुंबासाठीही. कारण आपल्या व्यसनाचा त्रास हा कुटूंबाला होत असतो. त्यामुळे व्यसन मनापासून सोडणेही आवश्यक असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणेही तितकेच गरजेचे आहे. नवी मुंबई शहरातील अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या पुढाकाराने गेली पाच वर्षे व्यसनमुक्तीकरिता समुपदेशन केले जात आहे. आजमितीस त्यांनी २,३०० लोकांना व्यसनमुक्त केले आहे. समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी अन्वय व्यसनमुक्ती केंद्राने नवी मुंबईतील वाशी महानगरपालिका रुग्णालय, नेरुळमधील डी. वाय. पाटील रुग्णालय, इंदिरानगर झोपडपट्टी परिसर, कळंबोली परिसरात अन्वय संस्थेने सामाजिक कार्याचे जाळे पसरण्यास सुरु वात केली आहे. २०हून अधिक डॉक्टर्स व समुपदेशकांचा चमू नवी मुंबईतील तीन केंद्रांवर त्याकरिता काम करत आहे. केवळ तंबाखूमुळे भारतातील ३० टक्के लोक कॅन्सरग्रस्त झाले आहेत, असा निष्कर्ष निघाला आहे.दारू, अमली पदार्थच नव्हे, तर तंबाखू, तपकीर, गुटखाजन्य पदार्थांमुळे महिलांमधील व्यसनाधीनता गेल्या दहा वर्षांत तिपटीने वाढली आहे. दारूशिवाय तंबाखू, मशेरी, तपकीर, गुटख्याच्या व्यसनातही अनेकजणी अडकल्या आहेत. त्यात कष्टकरी महिलांचे प्रमाण जास्त आहे. ‘गालाच्या कोपऱ्यात तंबाखूची चिमूट ठेवल्याशिवाय कामात उत्साहच येत नाही,’ अशी प्रतिक्रिया या महिला व्यक्त करत असल्याची माहिती स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष वृषाली मगदूम यांनी व्यक्त केली. कचरावेचक महिलांमध्ये दारूचे व्यसन पाहायला मिळत असून, उच्चभ्रू वस्तीतील तरुणींमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण जास्त असल्याचे मगदूम यांनी सांगितलसे. द्रारिद्र्य, अस्वच्छता, अंधश्रद्धा, पुरु षप्रधानता हे सारं घेऊन घर सावरणारी बाईच व्यसनाच्या अधीन झाली, तर समाजातील समतोल राखणे अशक्य आहे. अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने वर्षभर व्यसनांचे दुष्परिणाम, त्यापासून होणारे आजार आदींविषयी जनजागृती केली जाते. ‘व्यसन हा रोग असून तो नियंत्रणात आणला की बरा झाला,’ असे प्रतिपादन अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे अजित मगदूम यांनी केले. हल्ली फॅशन स्टेटस राखण्यासाठी व्यसन केले जाते. महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच विद्यार्थिनींमध्ये दिवसेंदिवस व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. गोवंडी रेल्वे हॉस्पिटल येथे गेल्या तीन महिन्यांपासून अन्वय व्यसनमुक्ती केंद्राला सुरुवात झाली आहे.Þ केंद्राच्या माध्यमातून शहरातील कचरावेचक महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. स्र१ंूँ्र101291@ॅें्र’.ूङ्मेसमुपदेशन महत्त्वाचेव्यसनमुक्तीकरिता सर्वच वयोगटांमध्ये समुपदेशनाची गरज आहे. अन्वय व्यसनमुक्ती केंद्रांने व्यसनमुक्तीच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलत विविध स्तरांमध्ये व्यसनांच्या आहारी गेलेल्या नागरिकांना त्यातून बाहेर काढले आहे. तंबाखूच्या आहारी गेलेल्या नागरिकांना ६ महिन्यांच्या समुपदेशनातून नियंत्रणात आणले जाते आणि हळूहळू व्यसनमुक्त केले जाते. तर ड्रग्जच्या आहारी गेलेल्या माणसाला नियंत्रणात आणण्याकरिता ५ वर्षांचा कालावधी लागतो. दारूपासून सूटका मिळविण्याकरिता किमान १ वर्ष समुपदेशनाचे काम संस्थेच्या वतीने केले जाते. तरुणांनो सावधानहल्ली इंटरनेटवरही डार्क नेट सारख्या साईट्सवर ड्रग्ज मिळत असल्याने तरुणपिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. त्यामुळे मुलांनी तर आपण तोंडात काय घालतो आहे याबाबत जागरूक असणे अतिशय गरजेचे आहे. पालकांनीही आपल्या पाल्याशी अभ्यासाव्यतिरिक्त संवाद साधावा. इंटरनेटवर तासन्तास बसणाऱ्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे.- अजित मगदूम, प्रमुख अन्वय व्यसनमुक्ती केंद