शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

महामंडळाच्या गाड्यांचा राजकारण्यांना लाभ!

By admin | Updated: August 7, 2015 01:26 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या पैशातून कोट्यवधी रुपये किमतीच्या ६४ गाड्यांचे नियमबाह्ण वाटप करण्यात आले. त्यात काही सामाजिक

यदु जोशी, मुंबईलोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या पैशातून कोट्यवधी रुपये किमतीच्या ६४ गाड्यांचे नियमबाह्ण वाटप करण्यात आले. त्यात काही सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपा नेत्यांच्या नातेवाइकांचाही समावेश आहे. वार्षिक एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी वाहने कर्जाऊ देण्याची महामंडळाची योजना आहे. या योजनेचे नियम/निकष धाब्यावर बसवून रमेश कदम महामंडळाचा अध्यक्ष असताना ६४ गाड्या वाटण्यात आल्या. त्यासाठी कोणतेही कर्जप्रकरण करण्यात आली नाहीत. कराड येथील एका प्राध्यापक महोदयांना इनोव्हा गाडी देण्यात आली. रमेश कदमचे जवळचे असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या दिमतीला असलेली एक इनोव्हा गाडी महामंडळाच्या पैशातूनच घेण्यात आली होती. ती आता पोलिसांना परत करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्णातील राष्ट्रवादीचे एक माजी राज्यमंत्री रमेश कदमच्या कृपेने दुसऱ्याच्या नावावर मिळालेली गाडी दोन वर्षे वापरत होते. चार दिवसांपूर्वी या गाडीचे २० लाख रुपये महामंडळात जमा करण्यात आले. लातूर जिल्ह्णातील भाजपाचे माजी आमदार टी.पी.कांबळे यांचे पुत्र राजू कांबळे यांना इनोव्हा गाडी मिळाली. टी.पी.कांबळेंच्या दुसऱ्या मुलाला ट्रॅक्टर मिळाले. तिसरे पुत्र संजय हे महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक आहेत. महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले की, कांबळे यांना देण्यात आलेल्या गाडीबाबत विभागीय व्यवस्थापकांचा चौकशी अहवाल आमच्याकडे आला असून ही गाडी नियमबाह्ण पद्धतीने दिल्याचे त्यात म्हटले आहे. याच अहवालात ट्रॅक्टरबाबतचाही उल्लेख आहे. टी.पी.कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आपल्या मुलांना नियमानुसारच वाहने मिळाल्याचा दावा केला.महामंडळाच्या सहा जिल्हा कार्यालयांमधून आरटीजीएस आणि बेअरर चेकद्वारे ८६ कोटी रुपये काढण्यात आले असून ही अख्खी रक्कम गायब असल्याचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम दिले होते. त्यानुसार या सहा जिल्ह्णांमधील अधिकारी़/ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. महागाई भत्ताही हडपसाठे महामंडळातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची २ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी द्यावयाची होती. कदमचा विश्वासू आणि त्याचा पीए विजय कसबे याने कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्यातील १ कोटी २ लाख रुपये वसूल केले, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.८० लाखांचा भूखंड १८ लाखांत दिला कसा?महामंडळाच्या मालकीचा असलेला नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील भूखंडाची किंमत ६८ लाख रुपये होती. त्यावर संरक्षक भिंतीसह १२ लाख रुपयांची कामे महामंडळाने केलेली होती. ८० लाख रुपयांचा हा भूखंड व्हिजन टेक एंटरप्रायजेसला केवळ १८ लाख रुपयात विकण्यात आला. विशेष म्हणजे हे १८ लाख रुपयेही महामंडळातूनच देण्यात आले. आता हा भूखंड महामंडळाला परत मिळावा यासाठी महामंडळ न्यायालयात धाव घेणार आहे.