शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

CoronaVirus मरकजला परवानगी दिली कोणी? राज्याचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 06:44 IST

दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात हा धागा पकडून महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच मरकजबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिल्लीतील तबलिगीच्या मरकजमधील आयोजनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का दिली? या मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव सर्व राज्यात झाला त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मध्यरात्रीनंतर २ वाजता या मरकजमध्ये का गेले होते?, असे सवाल करीत गृहमंत्री अनिलदेशमुख यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात हा धागा पकडून महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच मरकजबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशमुख यांनी बुधवारी एक पत्रक प्रसिद्धीला दिले, त्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित करीत मरकजबाबत केंद्राला आरोपीच्या पिंजऱ्यात उभेकेले. मुंबईनजीकच्या वसई येथे तबलिगीचे संमेलन होणार होते. मात्र महाराष्ट्र सरकारने त्याला परवानगी नाकारुन ते रोखले.

बैठकीनंतर गायब कसे?याच मरकजमध्ये रात्री २ वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तबलिगीचे पुढारी मौलाना साहेब हे कोणती गुप्त चर्चा करत होते? डोवाल आणि दिल्लीचे पोलीस आयुक्तया दोघांनीही या विषयावर बोलायचे का टाळले आहे, असे मुद्दे देशमुख यांनी मांडले. तबलिगीचे नेते मौलाना साहेब हे अजित डोवाल यांच्याशी भेट झाल्यानंतर लगेच दुसºया दिवशी गायब झाले. ते अद्याप फरार असून या संपूर्ण प्रकरणात केंद्राचे सारेच वर्तन संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.तबलिगींमुळे कोरोनाचा फैलाव वाढल्याने जनक्षोभ आहे. यावरून लक्ष वळविण्यासाठी देशमुख हे केंद्रावरबिनबुडाचे आरोप करीत आहेत.- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेकेंद्राने राज्य सरकारचा आरोप फेटाळलानवी दिल्ली: तबलिगी जमातच्या दिल्लीतील निझामुद्दीनस्थित मुख्यालयात आयोजित परिषदेच्या वादात न अडकता केंद्र सरकारने महाराष्टÑ सरकारचे आरोप फेटाळून लावत दिल्ली सरकारलाच हे प्रकरण हाताळले पाहिजे होते, असे स्पष्ट केले.याबाबत दिल्ली सरकारचे म्हणणे आहे की, ही परिषद निझामुद्दीन भागातील स्वत:च्या इमारतीमध्ये घेतली होती. त्यामुळे परवानगीची गरज नव्हती.केंद्रीय गृहमंत्रालयाचा संबंध विदेशातून विविध प्रकारच्या व्हिसावर भारतात आलेल्या व्यक्तींशीसंबंधितच येतो. अशा परिषदांच्या आयोजकांमार्फत नोंदणी केलेल्या विदेशी व्यक्तींच्या नोंदवहीच्या माध्यमातून गृहमंत्रालय विशेष पोलिस शाखेमार्फत लक्ष ठेवते, या परिषदेसाठी पोलिसांकडून परवानगी घेण्याची गरज नसल्याने परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही.या वादात न अडकता केंद्राने महाराष्टÑ सरकारवर उलट निशाणा साधला. तबलिगी जमातला खुल्या जागेत परिषद घ्यायची असल्याने महाराष्टÑ सरकारने परवागी नाकारली, असे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या २७ व २८ फेब्रुवारी रोजी ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलग्रस्त भागांना भेट देणारे डोवाल हे खूपच वरिष्ठ अधिकारी होते. गृहमंत्री अमित शहा काही कारणांनी करू शकणार नव्हते म्हणून मोदी यांनी डोवाल यांच्याकडे ते काम दिले.

डोवालांच्या प्रयत्नांबाबत बोलण्यास नकार 

गृहमंत्रालयातील सूत्रांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मरकजचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. तथापि, पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांसाठी विशेषत: अल्पसंख्याकांशी संबंधित गुंतागुंतीचे विषय असतात तेव्हा ते हाताळण्यासाठी डोवाल हे नेहमीच पडद्यामागे भूमिका बजावत असतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये अल्पसंख्यांकांची मने जिंकणे गरजेचे होते तेव्हा अजित डोवाल यांना तेथेच मुक्कामी राहून तीन दिवसांचा व्यापक वैयक्तिक दौरा करण्याची जबाबदारी दिली गेली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnil Deshmukhअनिल देशमुख